सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत अजिंक्य ७ व्या क्रमांकावर -
मिझोराममध्येही आनंद सरी
दोन दिवसांत बंगाल, कर्नाटकमध्येही
मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या १० कार्स
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण १० पदके मिळवली. कुस्ती, ॲथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, वेटलििफ्टगमधील पदकांचा यात समावेश आहे. हरयाणाने बुधवारी ८७ पदकांसह (३० सुवर्ण, २३ रौप्य, ३४ कांस्यपदक) अव्वल स्थान गाठले असून, महाराष्ट्र ७३ पदकांसह (२६ सुवर्ण, २५ रौप्य, २२ कांस्य) दुसऱ्या स्थानी आहे.
जलतरणात ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात आर्यन वर्णेकरने कांस्यपदक पटकावले. मुलींच्या २०० मीटर व ८०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये मुंबईच्या आन्या वालाने रौप्यपदके कमावली. ॲथलेटिक्सच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत मुंबईच्या प्रांजली पाटीलने १४.३८ सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले, तर तिहेरी उडीत पूर्वा सावंतने १२.६९ मीटर अंतर पार करत सुवर्णपदक पटकावले. मल्लखांबमध्ये राज्याला सांघिक रौप्यपदक मिळाले.
वेटलिफ्टिंगमध्ये प्रतिक्षा कडूने मुलींच्या ७६ किलो वजनीगटात १५९ किलो वजन उचलत कांस्यपदक जिंकले. कुस्तीत मुला-मुलींच्या संघांनी सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. मुलांच्या ५५ किलो फ्रीस्टाईलमध्ये कोल्हापूरच्या वैभव पाटीलने सुवर्णपदक मिळवले. मुलींच्या ५३ किलो वजनी गटात कल्याणी गादेकरने रौप्यपदक मिळवले, तर ६५ किलो वजनी गटात पुण्याच्या पल्लवी पोटफोडेने कांस्यपदक जिंकले.
भारताची दिग्गज क्रिकेटपटू मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत तिने महिला क्रिकेटला लोकप्रिय करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.मितालीने २३२ एकदिवसीय सामन्यांत ७,८०५ धावा केल्या आहेत.
याचप्रमाणे एकूण १०,८६८ धावांसह महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकंदर धावा करणारी खेळाडू ठरली आहे. तिने ८९ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले, तर आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत तिला केवळ १२ कसोटी सामने खेळायला मिळाले. क्रिकेटच्या या पारंपरिक प्रकारात द्विशतक झळकावणारी ती भारताची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. मितालीने २०१९ मध्येच ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्ती घेतली होती आणि मार्चमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत मितालीच्या नेतृत्वाखाली भारताने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्ती घेण्याची शक्यता तिच्याबाबत वर्तवण्यात आली होती.
‘‘भारतीय संघाचा निळय़ा रंगाचा पोशाख परिधान करण्याच्या निश्चयाने एका लहान मुलीच्या प्रवासाला सुरुवात झाली. देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हे अभिमानास्पद आहे. या प्रवासात अनेक चढ-उतारही पाहायला मिळाले,’’ असे मितालीने ‘ट्विटर’वरील आपल्या निवेदनात म्हटले.
‘‘प्रत्येक स्पर्धेतून खूप काही शिकायला मिळाले आणि माझ्या आयुष्यातील गेली २३ वर्षे ही परिपूर्ण, आव्हानात्मक आणि आनंदी होती. सर्व प्रवासाप्रमाणे हादेखील कधी तरी थांबणार होता. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे,’’ असे मितालीने म्हटले आहे. मितालीने सहा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय हरिणी लोगन या भारतीय वंशाच्या मुलीने कडव्या लढतीनंतर यंदाची ‘स्क्रिप्स स्पेिलग बी’ स्पर्धा जिंकली. पहिल्यांदाच स्पर्धेचा निकाल ९० सेकंदांच्या ‘स्पेल ऑफ’ (टायब्रेकरद्वारे) लागला. ज्यामध्ये २६ पैकी २२ शब्दांची योग्य स्पेलिंग अचूक सांगत तिने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकला.
२ जूनला घेण्यात आलेल्या ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत अमेरिकेसह जगभरातील २३४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
ही स्पर्धा जिंकण्यासाठी अखेरीस आठवीत शिकणाऱ्या हरिणी हिने ‘मुरहेन’ या शब्दाची स्पेलिंग सांगितली. एका सुंदर लहान पक्ष्याचे हे नाव आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील दोन्ही अंतिम स्पर्धक हे भारतीय मूळ वंशाचे होते. उपविजेता विक्रम राजू हासुद्धा भारतीय वंशाचा आहे.
हरिणीला पियानो, गिटारची आवड - हरिणीला रचनात्मक लेखन आवडते. शाळेत एक पुस्तक प्रकाशित करण्याचाही तिचा मनोदय आहे. वेगवेगळे शब्द शिकण्याबरोबरच तिला पियानो आणि गिटार वाजवणे आवडते.
५० हजार डॉलरचे बक्षीस - ‘स्क्रिप्स स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्या हरिणी हिला ५० हजार डॉलर (सुमारे ३८ लाख ८० हजार रुपये) आणि १२ वर्षीय विक्रम राजू याला २५ हजार डॉलर (सुमारे १९ लाख ४० हजार रुपये) बक्षीस म्हणून देण्यात आले. २०२० मध्ये करोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती, तर गेल्या वर्षी २०२१ मध्ये ऑनलाइन घेण्यात आली होती.
MSBSHSE 12th Result 2022 : महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी रिझव्र्ह बँकेने बुधवारी अपेक्षेनुरूप व्याजदरात अर्धा टक्क्याची वाढ केली. महिनाभरात झालेल्या दुसऱ्या तर दशकभरातील सर्वात मोठय़ा दरवाढीमुळे गृह, वाहन तसेच अन्य कर्जदारांवर मासिक हप्त्याचा भार वाढणार आहे. या निर्णयाच्या अपेक्षेने अनेक बँकांनी कर्ज व्याजदरात पतधोरणापूर्वीच वाढ केली.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) तीन दिवसीय बैठकीअंती व्याजदर वाढीचा हा निर्णय
एकमताने घेण्यात आला. रेपो दरातील सलग दुसऱ्या वाढीनंतरही, हे दर करोनापूर्व ५.१५ टक्क्यांच्या पातळीपेक्षा कमीच आहेत, असे गव्हर्नर दास यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. शिवाय करोना साथीच्या काळात स्वीकारलेल्या ‘परिस्थितीजन्य उदारते’च्या भूमिकेत बदल करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आगामी काळात व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेच त्यांनी सूचित केले.
रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण समितीने महागाई दरातील वाढीचा अंदाज कायम ठेवत चालू आर्थिक वर्षांसाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ५.७ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. मात्र सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज ७.२ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. महागाई दरासंबंधी अंदाजातील एका टक्क्याची वाढ ही युक्रेनमधील युद्धामुळे खाद्यपदार्थाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे असल्याचे नमूद करताना, ‘युद्धामुळे महागाईचेच जागतिकीकरण झाले आहे,’ असे ते म्हणाले.
गेल्यावर्षी सर्वाना उत्तीर्ण करण्याचे धोरण बाळगून जाहीर झालेल्या बारावीच्या शंभर टक्के निकालानंतर पदवी अभ्यासक्रमांच्या वाढवून दिलेल्या जागा यंदा कशा भरायच्या हा महाविद्यालयांसमोरील प्रश्न यंदाच्या बारावीच्या निकालाने सोडवल्याचे दिसत आहे. यंदा पारंपरिक पद्धतीने झालेल्या बारावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला. करोनामुळे गेल्यावर्षी रद्द झालेल्या परीक्षेचा निकाल वगळता यंदाचा निकाल हा आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी निकाल जाहीर केला. मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा परीक्षा होणार की नाही या बाबत साशंकता होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची भूमिका घेऊन राज्य मंडळाने परीक्षेचे नियोजन केले. यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र या धर्तीवर परीक्षेचे नियोजन करून परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली होती.
यंदा परीक्षा दिलेल्या नियमित विद्यार्थ्यांपैकी ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा परीक्षा न दिलेल्या साधारण ९३ हजार विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळणार असून यातील बहुतेक विद्यार्थी यंदा पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतील. त्यामुळे गेल्यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी महाविद्यालयांना वाढवून दिलेल्या जागा यंदाही भरणार असल्याचे दिसते आहे.
यंदा विज्ञान शाखेतील ६ लाख २४ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ६ लाख २२ हजार ७४९ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख १२ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतील ४ लाख २० हजार ३९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या ४ लाख १५ हजार १२९ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७५ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून नोंदणी केलेल्या ३ लाख ५५ हजार ६२४ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५३ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ३ लाख २४ हजार ६२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ४७ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
४६ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ४३ हजार ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर आयटीआयच्या नोंदणी केलेल्या ९२७ विद्यार्थ्यांपैकी ९२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणेच मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या. राज्यातील विज्ञान शाखेतील आठ, कला शाखेतील सात, वाणिज्य शाखेतील सहा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.