चालू घडामोडी आणि दिनविशेष - 07 नोव्हेंबर 2023

Date : 7 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विराट कोहलीने केले फिंगर क्रॉस, सेमीफायनल किंवा फायनलमध्ये सचिनची इच्छा होईल पूर्ण? जाणून घ्या
  • विराट कोहली म्हणाला की, “२०२३च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे.” कोहलीने रविवारी ३५व्या वाढदिवसानिमित्त विश्वचषकातील सामन्यात १२१ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४९वे शतक होते, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सचिनची बरोबरी केली आहे. या विक्रमानंतर सचिनने विराट कोहलीचे ट्वीट करून अभिनंदन केले होते आणि कोहली लवकरच आपले ५०वे शतक झळकावेल आणि त्याचा विक्रम मोडेल अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
  • सामन्यानंतर कोहलीने बीसीसीआयच्या एका व्हिडीओमध्ये सचिनच्या विक्रमाची बरोबरी केल्यानंतर सांगितले की, “माझ्यासाठी ही खूप भावनिक गोष्ट आहे. मी त्यांना आदर्श मानून मोठा झालो, भारतासाठी खेळण्याचे माझे स्वप्न होते. त्यांना खेळताना पाहणे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांच्या विक्रमाची बरोबरी करणे हा माझ्यासाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. इथपर्यंत पोहोचेन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी स्वतःला भाग्यवान समजतो.”
  • ४९ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी केल्यानंतर, कोहली म्हणाला की, सचिन तेंडुलकर त्याच्यासाठी नेहमीच नंबर वन असेल. माझे करिअर इथपर्यंत पोहोचले याचा मला आनंद आहे. कोहली म्हणाला, “मी सामन्यानंतर म्हटल्याप्रमाणे, काहीही झाले तरी माझ्यासाठी ते नेहमीच नंबर वन असतील. माझा आजवरचा प्रवास हा त्यांच्यामुळेच झाला आहे. मी इथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो याचा मला आनंद आहे. मी माझ्या देशासाठी सामने जिंकत आहे, जसे त्यांनी (सचिन तेंडुलकर) कौतुक केले.”

विराट कोहलीने केले फिंगर क्रॉस, सेमीफायनल किंवा फायनलमध्ये सचिनची इच्छा पूर्ण करायची आहे

  • विराट कोहलीचे अभिनंदन करताना सचिन तेंडुलकरने लिहिले होते, “विराट खूप चांगला खेळला. ९९चे १०० करण्यासाठी मला ३६५ दिवस लागले होते. मला आशा आहे की, तू ४९ वरून ५० करण्यासाठी पुढील काही दिवसात माझा विक्रम मोडणार. अभिनंदन!”
नेट परीक्षा डिसेंबरमध्ये; ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी
  • वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषदेसाठी (सीएसआयआर) विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) द्वारे आयोजित करण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) यंदा २६ ते २८ डिसेंबर अशी तीन दिवस देशभर पार पडणार आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची व शुल्क जमा करण्याची मुदत आहे.
  • अर्जांच्या दुरुस्तीसाठीही युजीसीने २ ते ४ डिसेंबरदरम्यान एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. दरम्यान डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेचा निकाल पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये घोषित केला जाणार असल्याची नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जाहीर केलेल्या वेळापत्रकात नमूद आहे. परीक्षा सीबीटी पद्धतीने म्‍हणजे संगणक आधारित असेल. अर्ज भरण्यासह अधिक माहितीसाठी csirnet.nta.ac.in या संकेतस्थळावर भेट देता येईल.
  • एमसीक्यू पध्दतीचे प्रश्न, ३ तासांची परीक्षा सीएआयआर नेट परीक्षा ही १८० मिनिटे म्हणजे ३ तासांची असणार आहे. त्यात एमसीक्यू म्हणजे ऑब्जेक्टीव्ह स्वरुपात बहुपर्यायी प्रश्न म्हणजे संगणक आधारित असेल. असतील, विशेष म्हणजे परीक्षेत अधिक निगेटीव्ह माकींग नसेल. तसेच परीक्षा ही हिंदी आणि इंग्रजी स्वरुपात होईल.

प्रवर्गनिहाय शुल्क असे….

  • परीक्षेचे शुल्क हे प्रवर्गनिहाय भिन्न आहे. सर्वसाधारण गटासाठी ११०० रुपये आकारले जातील. तर इडब्ल्यूएस, ओबीसींसाठी ते निम्मे म्हणजे ५५० रुपये आणि एससी, एसटी आणि तृतीय पंथीयांसाठी मात्र २७५ रुपये शुल्क आकारले जाईल. दिव्यांग अर्थात पीडब्ल्यूडी उमेदवारांना कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यासाठी जातीचे आणि जातप्रमाणपत्र तसेच दिव्यांगांना आपले दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
मालमत्तांचे योग्य मूल्य उघड केले नसल्याची ट्रम्प यांची कबुली 
  • आर्थिक फसवणूक प्रकरणात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा न्यूयॉर्क न्यायालयात सोमवारी जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली. आपण आपल्या अनेक मालमत्तांचे योग्य मूल्य उघड केले नाही असे त्यांनी यावेळी कबूल केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे भरकटलेले आणि उद्धटपणाचे होते.
  • आपल्या कंपनीने फ्लोरिडामधील मार-ए-लागो आणि डोराल गोल्फ कोर्स या मालमत्तांचे मूल्य कमी करून सांगितले आणि अन्य काही मालमत्तांसह ट्रम्प टॉवरचे मूल्य वाढवून सांगितले, अशी कबुली ट्रम्प यांनी दिली. मात्र, ही कबुली देतानाच मालमत्तांचे अंदाजे मूल्य ही फारशी महत्त्वाची बाब नसल्याचा दावा त्यांना केला.
दिल्लीत सम-विषम नियम लागू, बांधकामं बंद, शाळा आणि कार्यालयांसाठी नवे नियम
  • दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना राबवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक काही वेळापूर्वी पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दिल्ली सरकारने १३ ते २० नोव्हेंबर या आठ दिवसांसाठी राज्यात वाहनांसाठी सम आणि विषम (ऑड अँड इव्हन) नियम लागू केले आहेत. त्याचबरोबर दिल्लीत पुढचे काही दिवस बांधकामं बंद ठेवली जातील. १० नोव्हेंबरपर्यंत १० वी आणि १२ वी या दोन इयत्ता वगळता इतर सर्व वर्गांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दिल्लीत बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल वाहनांवरील बंदी कायम राहील.
  • दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पत्रकार परिषद घेऊन आजच्या उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. दिल्लीत ३० ऑक्टोबरपासून प्रदूषण वाढलं आहे. या प्रदूषणाचं विश्लेषण करणाऱ्या संशोधक आणि तज्ज्ञांनी सांगितलं की दिल्लील्या हवेचा वेग मंदावला आहे. दुसऱ्या बाजूला तापमानही वेगाने घटलं आहेच. त्यामुळे दिल्लीतल्या समर-व्हिंटर अ‍ॅक्शन प्लानवर (हिवाळा आणि उन्हाळ्यातील वातावरणीय आव्हानांशी लढण्यासाठीची कृती योजना) ३६५ दिवस काम केलं जात आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत दिल्लीत सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्याबाबत (वर्क फॉर्म होम) निर्णय घेतला नाही. याबाबत विचार करून आगामी काळात निर्णय घेतला जाईल.
  • दिल्लीतील प्रदूषणाने अतिधोकादायक स्तर ओलांडला असून राजधानी परिक्षेत्रात शुक्रवारी काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५०० या चिंताजनक पातळीवर पोहोचला होता. दिल्लीच्या सीमेवरील गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद भागांमध्ये तर शुक्रवारी प्रदूषणाचा स्तर सुमारे ७०० पर्यंत गेला होता. धूर-धुळीमुळे दिल्लीचे आकाश पूर्णपणे झाकोळले गेले आहे. पुढील दोन आठवडे तरी हीच परिस्थिती कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
  • दिल्ली शहरातील वाहनांच्या प्रदूषणामध्ये पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेत जाळण्याच्या घटनांमुळे होणाऱ्या प्रचंड धुराची भर पडली आहे. पंजाबमध्ये गुरुवारी एका दिवसामध्ये शेतातील खुंट जाळण्याचे सुमारे दोन हजार प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पुढील काही दिवसांमध्ये त्यांत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने दिल्लीकरांना गंभीर प्रदूषणाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा केंद्रीय यंत्रणांनी दिला आहे.
इस्रायलकडे जाणारी प्रवासी वाहतूक एअर इंडियाकडून स्थगित; ‘या’ तारखेपर्यंत सेवा राहणार बंद!
  • इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहेत. इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीवर हवाई हल्ले होत असून मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी होत आहे. इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव शहरातही याचे पडसाद उमटत आहे. परिणामी या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी नियोजित उड्डाणे काही काळासाठी स्थगित केली आहेत. या विमान कंपनीने ७ ऑक्टोबरपासून तेल अवीवला जाण्यासाठी आणि तेथून भारतात येणारी नियोजित उड्डाणे रद्द केली होती.
  • रविवारी एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, तेल अवीवची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. साधारणपणे, दिल्लीतून तेल अवीवला जाण्यासाठी आठवड्यातून पाच वेळा उड्डाणे असतात. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी अशी ही सेवा असते. परंतु, आता वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
  • दरम्यान, इस्रायलमध्ये अडकेलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याकरता सरकारकडून ऑपरेशन अजय राबवण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात ऑपरेशन अजय अंतर्गत हजारो भारतीय भारतीय मायदेशी परतले. ऑपरेशन अजयसाठी एअर इंडियाने चार्टर्ड सेवा पुरवली होती.

४८ तासांत युद्ध भडकणार?

  • पुढील ४८ तासांत इस्रायल लष्कर गाझा पट्टीवर आक्रमण करणार असल्याचं वृत्त इस्रायल माध्यमांनी दिलं आहे. तसंच, दक्षिण आणि उत्तर गाझा असे गाझा पट्टीचे दोन भाग झाल्याचेही वृत्तांमध्ये आहे. त्यामुळे येत्या काळात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

 

ला लिगा फुटबॉल - बार्सिलोनाचा अर्मेनियावर विजय :
  • दुसऱ्या सत्रात खेळाडूंनी केलेल्या गोलच्या जोरावर ला लिगा फुटबॉलमध्ये बार्सिलोनाने अर्मेनियावर २-० असा विजय साकारला. हा सामना बार्सिलोनासाठी संस्मरणीय राहिला, कारण गेरार्ड पिक्यूला निरोप देण्यात आला.

  • सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. पहिल्या सत्रात गोल करण्याचे प्रयत्न झाले, मात्र कोणालाही यश न मिळाल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता.

  • दुसऱ्या सत्रात बार्सिलोनाच्या ओउस्माने डेम्बेलेने (४८व्या मिनिटाला) गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर फ्रेंकि डी जोंगने (६२व्या मि.) प्रतिस्पर्धी संघाच्या बचावाला भेदत गोल झळकावत संघाला २-० अशा सुस्थितीत पोहोचवले. संघाने अखेपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय नोंदवला.

‘आयओए’मध्ये आता महिलांना समान अधिकार; नव्या घटनेला ‘आयओसी’ची मंजुरी, १० डिसेंबरला निवडणूक :
  • घटनेच्या बदलावरून अडकून राहिलेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महिलांनाही पुरुषांबरोबर समान अधिकार मिळणारी ‘आयओए’ची नवी घटना तयार झाली असून, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) या नव्या घटनेस मंजुरी दिली आहे.

  • ‘आयओए’च्या निवडणुकीत आता महिलांना समाधान अधिकार तर मिळणार आहेच, बरोबरीने खेळाडूंनाही स्थान देण्यात येणार आहे. ‘आयओए’ने घटनेत आजपर्यंत केलेला हा सर्वात ऐतिहासिक बदल आहे. घटनेत राज्य ऑलिम्पिक संघटनांचा मताधिकारही काढून घेण्यात आला आहे. खेळाडूंची मते दोन गटात विभागण्यात आली आहेत. एक गट खेळाडू आयोग (अ‍ॅथलिट्स कमिशन) आणि दुसरा गट सर्वोच्च ८ खेळाडूंचा असेल. त्याचबरोबर सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ही दोन महत्त्वाची पदे पूर्णपणे व्यवस्थापन कौशल्यावर निवडली जातील. अर्थात, त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.

  • ही घटना १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘आयओए’च्या विशेष सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. सभेमध्ये घटनेची मंजुरी घेतल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या एकसदस्यीय निवड समितीने निवडणूक १० डिसेंबर रोजी निश्चित केली आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे माजी सरचिटणीस उमेश सिन्हा हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील.

भारतीयांना ‘ट्विटर ब्ल्यू’साठी पैसे कधीपासून भरावे लागणार? एलॉन मस्क यांनी दिलं उत्तर, म्हणाले :
  • भारतीयांनाही लवकरच ट्विटरवर ‘ब्ल्यू टिक’साठी पैसे भरावे लागणार आहेत. ‘ट्विटर’चे नवे मालक एलॉन मस्क यांनी एका महिन्यात भारतात ही सेवा सुरु होईल असं स्पष्ट केलं आहे. एका भारतीय युजरने मस्क यांच्याकडे यासंबंधी शंका उपस्थित केल्यानंतर, त्यांनीच याचं उत्तर दिलं. नुकतंच मस्क यांनी ट्विटवरील ‘ब्ल्यू टिक’साठी ८ डॉलर भरावे लागणार असल्याचं जाहीर केलं असून, काही ठिकाणी याची अंमलबजावणी सुरु केली आहे.

  • सध्या ‘ट्विटर ब्ल्यू’ सेवा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमध्ये सुरु करण्यात आली आहे. भारतातही महिन्याभरात ही सेवा सुरु होईल असं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे.

  • ट्विटरवर प्रभू नावाच्या युजरने ‘ट्विटर ब्ल्यू’ भारतात कधी सुरु होणं अपेक्षित आहे? अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना मस्क यांनी, महिनाभराच्या आत सुरु होईल अशी आशा असल्याचं सांगितलं.

  • आयफोनमधील ट्विटर अॅपवर एक नोटिफिकेशन दिसत आहे. यामध्ये आम्ही आजपासून ‘ट्विटर ब्ल्यू’मध्ये नवे फिचर समविष्ट करत असून, लवकरच आणखी नवे फिचर्स दाखल होतील. आता साइन अप केल्यानंतर महिन्याला ८ डॉलर भरत ट्विटर ब्ल्यू मिळवा, असं सांगण्यात आलं आहे.

निवृत्ती वेतन योजनेबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नोकरदारांना दिलासा :
  • सर्व नोकरदार आणि मालकांना निवृत्ती वेतन योजनेतील तरतुदींबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्रालयातून देण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधी कायद्यातील २०१४ साली झालेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वैध ठरवली. या निकालामुळे १५ हजारांपेक्षा जास्त वेतन असलेले कर्मचारीही निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरणार आहेत.

  • २०१४ साली झालेली घटनादुरुस्तीमधील १५ हजारांपेक्षा जास्त वेतन असलेल्यांना पगाराच्या १.८६ टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीसाठी देण्याची अट न्यायालयाने रद्द ठरवली. तर भविष्य निर्वाह निधीसाठी १९५२च्या कायद्यातील ६ हजार ५०० रुपयांच्या किमान वेतनाची मर्यादा १५ हजार करण्याची दुरुस्ती मात्र न्यायालयाने मान्य केली.

  • शुक्रवारी सरन्यायाधीश उदय उमेश लळित, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. सुधांशू परडीवाला यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालाचा केंद्र सरकारसह भविष्य निर्वाह निधी कार्यालय (ईपीएफओ), कर्मचारी आणि मालकांच्या संघटनांनी अभ्यास सुरू केला आहे. निकालाला अनुसरून नव्या तरतुदी आणि प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील, अशी माहिती कामगार मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

  • ईपीएफओमधील कर्मचारी आणि मालकांच्या प्रतिनिधींनी निकालाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असून अधिक अभ्यासाअंती विश्लेषण करणे शक्य असल्याचे म्हटले आहे. ईपीएफओसह सर्व संबंधितांना प्रणालीमध्ये सुधारणेसाठी वेळ देत न्यायालयाने आपल्या आदेशाला सहा महिन्यांची स्थगिती दिली आहे. येत्या चार महिन्यांमध्ये यासंदर्भात अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुतिन यांच्याकडून भारतीयांची स्तुती; नागरिक प्रतिभावान, ध्येयवादी असल्याचे उद्गार :
  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा भारताविषयी गौरवोद्गार काढले आहेत. भारताच्या विकासातील यशोकथेची प्रशंसा करताना त्यांनी म्हटले, की भारतीय अत्यंत प्रतिभावान आणि ध्येयवादी आहेत. आपल्या देशाच्या विकासासाठी ते आपले योगदान सातत्याने देत आहेत.

  • परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ७ आणि ८ नोव्हेंबरला रशियाचा दौरा करणार आहेत. त्याआधी पुतिन यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. शुक्रवारी रशियाच्या राष्ट्रीय एकता दिनी ‘रशियन हिस्टॉरिकल सोसायटी’च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या बैठकीत बोलताना पुतिन म्हणाले, की भारताकडे पहा. अतिशय प्रतिभावान, ध्येयवादी आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध नागरिकांमुळे भारत आपल्या विकासामध्ये नवी उंची निश्चित गाठेल. भारताची दीड अब्ज लोकसंख्या निश्चितच विकासाचे ध्येय गाठेल, यात शंका नाही.

  • रशियन सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की पुतिन यांनी वसाहतवाद आणि रशियाच्या संस्कृतीबद्दलही भाष्य केले. पुतिन यांनी गेल्या गुरुवारीही रशियाच्या भारतासोबतच्या मैत्रीचा पुनरुच्चार केला होता. ते म्हणाले होते, की आमचे भारतासोबत विशेष संबंध आहेत. जे अनेक दशकांपासून घनिष्ठ आहेत. भारतासह रशियाच्या संबंधांत कधीही कोणतेही वादग्रस्त मुद्दे नव्हते.

  • आम्ही नेहमीच एकमेकांना पाठिंबा दिला आहे. हे संबंध भविष्यातही ते असेच राहतील. आपल्या देशाच्या हितासाठी ‘स्वतंत्र परराष्ट्र धोरण’ अवलंबल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रशंसा केली होती. भारताने ब्रिटिश वसाहत ते आधुनिक राष्ट्र असा विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे, असेही पुतिन म्हणाले होते.

07 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.