स्टंपवर बॅट फेकून मारणे कर्णधार हरमनप्रीत कौरला पडले महागात, आयसीसीने ठोठावला ‘हा’ दंड
शहर गुन्ह्यांची संख्या
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस यांनी मूळ भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर २८ मतांनी आघाडी मिळवली आहे. विदा विश्लेषण संस्था ‘योगोव्ह’च्या ताज्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली.
बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी सत्ताधारी हुजूर (काँझव्र्हेटिव्ह) पक्षाच्या इच्छुक ११ उमेदवारांमधून काही निवडफेऱ्यांनंतर संसदीय हुजूर पक्षाच्या सदस्यांनी सुनक आणि ट्रस या दोघांचीही पक्षाचे नेतृत्वपद व पंतप्रधानपदासाठीच्या स्पर्धेतील अंतिम टप्प्यासाठी मतदानाद्वारे निवड केली. ‘योगोव्ह’च्या सर्वेक्षणानुसार, ४ ऑगस्ट ते सप्टेंबरच्या प्रारंभापर्यंत ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे सर्वसाधारण सदस्य यापैकी एकाची निवड करतील.
या आठवडय़ाच्या सुरुवातीच्या आकडेवारीवरून असे दिसते, की ४६ वर्षीय ट्रस, हे ४२ वर्षीय सुनक यांच्यापेक्षा सुमारे १९ गुणांची आघाडी घेतील, अशी अपेक्षा आहे. बुधवार आणि गुरुवारी ७३० पक्ष सदस्यांपैकी ६२ टक्के सदस्यांनी ट्रस यांच्या नावाला, तर ३८ टक्के सदस्यांनी सुनक यांना पसंती दिली.
सदस्यांची ट्रुस व संसद सदस्यांची सुनक यांना पसंती! मतदान करणार नाही, असे सांगणारे किंवा आपले मतच न सांगणाऱ्यांचा यात समावेश नाही. ट्रुस यांनी २४ टक्के गुणांची आघाडी घेतली. दोन दिवसांपूर्वीच्या २० वाढीव गुणांपेक्षा हे जास्त आहेत. ‘स्काय न्यूज’च्या दिलेल्या वृत्तानुसार ‘ब्रेक्झिट’ला अनुकूल मतदान करणाऱ्या सर्व वयोगटांतील पुरुष आणि महिला पक्षसदस्यांनी ट्रुस यांना पसंती दिली असून, सुनकला ट्रुसच्या पिछाडीवर आहेत. मात्र, सुनक यांना संसदीय पक्ष सदस्यांची सर्वाधिक पसंती आहे. काँझव्र्हेटिव्ह खासदारांतील मतदानात ट्रुस यांच्या ११३ मतांच्या तुलनेत सुनक यांनी १३७ मते मिळविली आहेत.
ज्येष्ठ नेते आणि राजपक्षे कुटुंबीयांचे निकटवर्तीय दिनेश गुणवर्धने यांची शुक्रवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील १८ सदस्यांचा शपथविधी शुक्रवारी झाला. पंतप्रधान गुणवर्धनेंशिवाय मंत्रिमंडळात इतर १७ मंत्री आहेत. पूर्वी अर्थमंत्री असलेल्या अली साबरी यांना परराष्ट्र खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे.
गोताबया राजपक्षे यांना जनतेच्या असंतोषाच्या उद्रेकामुळे राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांची बुधवारी संसद सदस्यांनी अध्यक्षपदी निवड केली. ७३ वर्षीय विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधानपद रिक्त झाले होते. गुणवर्धनेंचा ‘एमईपी’ पक्ष १९५६ मध्ये तत्कालीन सत्ताधारी आघाडीत सर्वप्रथम सहभागी झाला होता. गुणवर्धने यांनी १९८३ मध्ये कोलंबोच्या उपनगरातील महारागामा येथून विजय मिळवून संसदेत प्रवेश केला आणि त्यांनी १९९४ पर्यंत प्रमुख विरोधी नेता म्हणून काम केले. गुणवर्धने २००० मध्ये पहिल्यांदा मंत्रिमंडळात सहभागी झाले. ते २०१५ पर्यंत मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. गुणवर्धने यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा संसदसदस्य आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या कार्यकाळात एप्रिलमध्ये ७३ वर्षीय दिनेश गुणवर्धने यांना गृहमंत्रिपद देण्यात आले होते. त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. गुणवर्धने हे महाजन एकसाथ पेरामुना (एमईपी) या पक्षाचे नेते आहेत. त्यांचा पक्ष सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना (एसएलपीपी) पक्षाचा मित्रपक्ष आहे. १९४९ मध्ये जन्मलेल्या गुणवर्धने यांनी नेदरलँड्समध्ये उच्च शिक्षण पूर्ण करून १९७९ मध्ये परतल्यानंतर त्यांनी वडील फिलिप गुणवर्धने यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचे नेतृत्व केले. त्यांचे वडील देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश काळात डाव्या समाजवादी चळवळीचा एक प्रमुख चेहरा होते.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. त्यात दहावीचा निकाल ९४.४० टक्के, तर बारावीचा ९२.७१ टक्के लागला असून, महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा दहावीचा निकाल ९७.४१ टक्के, तर बारावीचा निकाल ९०.४८ टक्के लागला. राज्याचा दहावीचा निकाल ९७.४२ टक्के आणि बारावीचा निकाल ९०.२९ टक्के लागला. देशपातळीवरील दहावीच्या निकालात २ लाख ३६ हजार ९९३ विद्यार्थ्यांना, तर बारावीच्या १ लाख ३४ हजार ७९७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएससीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पद्धतीत बदल करून दोन सत्रांची परीक्षा घेतली. दरवर्षीच्या तुलनेत निकाल यंदा लांबला. या पार्श्वभूमीवर सीबीएससीचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर केला. देशपातळीवरील एकूण निकालाचा गेल्या वर्षीच्या तुलनेत आढावा घेतला असता दहावीचा निकाल ४.६४ टक्के, तर बारावीचा निकाल जवळपास सहा टक्क्यांनी घटला आहे. विद्यार्थ्यांमधील गुणांच्या स्पर्धेमुळे निर्माण होणारी अस्वस्थता लक्षात घेऊन गुणवत्ता यादी आणि विद्यार्थ्यांना श्रेणी न देण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला. पुणे विभागामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसह दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो.
सीबीएससीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रांत स्वतंत्रपणे घेतल्या असल्या, तरी अंतिम निकालात लेखी परीक्षेला पहिल्या सत्रात ३० टक्के आणि द्वितीय सत्राला ७० टक्के गुणभार देण्यात आला. तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दोन्ही सत्रांना समान महत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सत्र परीक्षेतील गुणांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन करून घेतल्यास पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांचे गुण वाढले असल्यास वाढीव गुण आणि गुण कमी झाले असल्यास पूर्वीचे गुण विचारात घेण्यात आले. त्यानुसार दोन्ही सत्रांचा निकालातील गुण विचारात घेऊन अंतिम निकाल तयार करण्यात आल्याचे सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भालाफेक करून प्रथमच जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजसह रोहित यादवनेही पदकाच्या फेरीत स्थान मिळवल्याने भारतासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.
स्पर्धेच्या अ-गटात समावेश असलेला भारताचा तारांकित खेळाडू नीरजने कारकीर्दीतील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी साकारली. याच गटातून ८९.९१ मीटर अंतरावर भाला फेकत एकंदर अग्रस्थान मिळवणाऱ्या ग्रेनाडाच्या गतविश्वविजेत्या अँडरसन पीटर्सनंतर नीरजला दुसरा क्रमांक मिळवता आला. नीरजने पहिल्याच प्रयत्नात थेट पात्रतेचे अंतर गाठल्यामुळे उर्वरित दोन प्रयत्न करण्याची आवश्यकताच भासली नाही. पात्रता फेरीत प्रत्येक स्पर्धकाला तीनदा भालाफेक करता येते. यापैकी सर्वोत्तम कामगिरी ही ग्राह्य धरली जाते.
भारताच्या रोहितने पहिल्या प्रयत्नात ८०.४२ मीटर अंतरावर भालाफेक करीत ब-गटात सहावा आणि एकंदर ११वा क्रमांक मिळवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. त्याचा दुसरा प्रयत्न हा सदोष ठरला, तर तिसऱ्या प्रयत्नात ७७.३२ मीटर अंतर गाठता आले. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय आंतर-राज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत २१ वर्षीय रोहितने ८२.५४ मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना रौप्यपदक जिंकले होते.
दोन्ही गटांतून ८३.५० मीटर अंतर गाठणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी पात्र होता आले. अंतिम फेरी रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.०५ वाजता होणार आहे.
करोना काळात थांबवलेली भरती प्रक्रिया कोकण रेल्वे प्रशासनाने पुन्हा चालू करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त कृती समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी या संदर्भात सांगितले की, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने यापूर्वीच जनता दरबार लावण्याची मागणी कोकण रेल्वे प्रशासनाकडे केलेली आहे. पण त्याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनसुद्धा महामंडळाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेत सामावून घेण्यासाठी अन्य कोणतेही पाऊल उचललेले नाही. करोनाच्या कालावधीत कोकण रेल्वेने कंत्राटदारामार्फत भरती करतानाही प्रकल्पग्रस्तांना डावलण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कार्यकारी संचालक संजय गुप्ता यांना वेळोवेळी निवेदने दिली. पण त्यावर कार्यवाही झालेली नाही.
कोकण रेल्वे प्रकल्प उभारणीच्या वेळी शेतक-यांच्या जमिनी घेण्यासाठी आटापिटा केला गेला. या जमिनी कवडीमोल दराने घेऊन प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर, मनुष्यबळाची गरज असताना कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमले जात आहेत. यापूर्वी एकाच सात-बारावरील ८ ते ९ लोक नोकरीत घेण्यात आले. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. प्रकल्पग्रस्तांना कुशल असे प्रशिक्षण देऊन सेवेत रुजू करून घेतले पाहिजे.
प्रकल्पग्रस्तांना वेगळा कोटा देऊन भरती तुंबवली आहे. ती खुली करून सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी करून चव्हाण म्हणाले की, लोटे येथे रेल्वेच्या सुट्टय़ा भागांचा कारखाना उभारला जात आहे. तेथे तरी प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजू करून घेतले पाहिजे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक, लोक प्रतिनिधी, विशेष भूसंपादन कोकण रेल्वे वर्ग (२) आणि कृती समिती यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार होती. मात्र करोनाचे निमित्त करून व्यवस्थापकीय संचालकांनी ती टाळली. ही प्रक्रिया तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत मोदींनी ट्वीट केले आहे.
पहिल्या तिरंगा फोटो शेअर - या वर्षी आपण ‘आझादी का अमृत’ उत्सव साजरा करत असताना ‘हर घर तिरंगा’ चळवळीला बळ देऊया. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केले आहे.
२० कोटी लोकांच्या घरात तिरंगा फडकणार भाजपचा दावा - भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीमेची योजना आखली आहे. या अंतर्गत सुमारे २० कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवला जाईल, असा दावा भाजपाने केला आहे. याबाबत ट्विटरवर माहिती देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या मोहिमेद्वारे देशभरातील सुमारे २० कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, जो प्रत्येक नागरिकाच्या मनात विशेषतः तरुणांच्या मनात देशभक्तीची अखंड ज्योत अधिक प्रज्वलित करण्याचे काम करेल.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.