३० हजार शिक्षकांची पदभरती पूर्ण
इंग्लंडने पहिल्या दिवशीच घोषित केला डाव -
जो रूटने झळकावले शतक -
बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संघात आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदरबादकडून खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही समावेश करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, संजू सॅमसन अशा दिग्गज युवा खेळाडूंचादेखील या संघात सावेश करण्यात आला आहे.
येत्या २६ आणि २८ जून रोजी भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने एकूण १७ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स या संघाचे नेतृत्व केले होते. आपल्या नेतृत्वात त्याने संघाच्या पदार्पणातच जेतेपद पटकावले होते. तसेच या स्पर्धेत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात दिमाखदार कामगिरी करुन दाखलेली होती. याच कारणामुळे बीसीसीआयने त्याच्यावर आता भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी टाकली आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी पटेल. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी २० मालिकेमध्ये भारतीय सलामीवीर ईशान किशनने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. तीन सामन्यांमध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. या कामगिरीच्या बळावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी ट्वेंटी क्रमवारीत ६८ स्थानांची झेप घेतली आहे. आयसीसीच्या टी ट्वेंटी फलंदाजी क्रमवारीत ईशान सध्या सातव्या स्थानावर पोहचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा टी २० आणि एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत ईशान किशनने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये १६४ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो टी २० फलंदाजांच्या यादीत पहिल्या १०जणांच्या यादीमध्ये प्रवेश करू शकला. पहिल्या १० फलंदाजांमध्ये किशन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल १४व्या स्थानावर आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांची प्रत्येकी एका स्थानाने घसरण झाली असून ते अनुक्रमे १६व्या आणि १७व्या स्थानावर आहेत. माजी कर्णधार विराट कोहली दोन स्थानांनी घसरून २१व्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजी क्रमवारीमध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची सात स्थानांनी सुधारणा झाली आहे. तो सध्या ११व्या स्थानावर पोहचला आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलने चार स्थानांनी प्रगती करत २६वे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने टी २० गोलंदाजी पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे.
अमेरिकेत पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या लसीकरण सल्लागारांनी यासाठी फायझर आणि मॉडर्ना यांच्या लशींना त्यासाठी संमती दिली आहे.
पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लशीच्या एका मात्रेचा परिणाम हा करोनाचा धोका कमी करतो, असे मत तज्ज्ञांनी सर्वानुमते व्यक्त केले. अमेरिकेत या वयोगटातील एक कोटी १८ लाख मुले आहेत. या देशात लसीकरणासाठी मंजुरी मिळवणारा हा अंतिम गट आहे. संबंधित सर्व शासकीय विभागांनी मंजुरी दिली तर पुढील आठवडय़ात हे लसीकरण सुरू होईल.
कॅन्सस येथील मुलांच्या रुग्णालयातील जे. पोर्टनॉय यांनी सांगितले की, या वयोगटातील मुलांना दीर्घकाळापासून लशीची प्रतीक्षा आहे. अनेक आई-वडील हे त्यांच्या मुलांच्या लसीकरणासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना हा पर्याय देणे आवश्यक आहे. फायझरची करोना प्रतिबंधक लस ही सहा महिन्यांपासून चार वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे. तर मॉडर्नाची लसी ही सहा महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे.
कोव्हॅक्सिनची वर्धक मात्रा करोनाच्या डेल्टा उत्प्रेरित रूपावर प्रभावी ठरत असून ओमायक्रॉनच्या बीए १.१ आणि बीए २ या उपप्रकारांपासून संरक्षण देते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि भारत बायोटेकच्या आभ्यासात हे स्पष्ट झाले.
सीरियन हॅमस्टर मॉडेलनुसार (मानवाशी संबंधित आजारांचा आभ्यास करणारे पशू मॉडेल) डेल्टाविरोधात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या दोन किंवा तीन मात्राच्या क्षमतेचा आणि ओमिक्रॉनच्या उपप्रकारांविरोधातील प्रभावाचा अभ्यास करण्यात आला. त्याची माहिती मंगळवारी ‘बायोआरक्सिव’मध्ये प्रकाशित करण्यात आली.
डेल्टा संसर्गाच्या आभ्यासात लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मात्रेदरम्यानचा अभ्यास केला. त्यावेळी वर्धक मात्रेची उपयुक्तता लक्षात आली, असे आयसीएमआर आणि भारत बायोटेकने स्पष्ट केले. लशीच्या तिसऱ्या मात्रेनंतर फुप्फुसाच्या आजाराची तीव्रता कमी होती, असेही सांगितले.
दुसऱ्या आभ्यासानुसार ओमायक्रॉनच्या बीए १ आणि बीए २ या उपप्रकाराच्या विरोधात सुरक्षेबाबत अभ्यास करण्यात आला. ‘प्लेसीबो’ गटापेक्षा लस घेणाऱ्या गटात संसर्गाची तीव्रता कमी होती. फुप्फुस संसर्गही कमी प्रमाणात होता. त्यामुळे आताच्या अभ्यासानुसार कोव्हॅक्सिनची वर्धक मात्रा डेल्टा आणि ओमायक्रॉन उपप्रकारांसंबंधी आजाराची तीव्रता कमी करते, असेही आयसीएमआर आणि भारत बायोटेकने स्पष्ट केले.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणाऱ्याला ५०० रुपये देण्यासंबंधी नवा कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आयोजित इंडस्ट्रियल डेकार्बोनायझेशन समिटमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पार्किंग ही फार मोठी समस्या असल्याचं सांगितलं. दरम्यान नितीन गडकरी यांनी केलेलं हे वक्तव्य उपहासात्मकपणे होतं की खरंच गांभीर्याने विचार सुरु आहे याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही.
गडकरी काय म्हणाले - “प्रत्येक व्यक्ती गाडी घेत आहे. माझ्या नागपुरातील घऱी स्वयंपाक करणाऱ्याकडेही दोन गाड्या आहेत. याआधी अमेरिकेत सफाई करणारी महिला गाडीतून यायची तेव्हा आपण आश्चर्याने पाहायचो. पण आता आपल्याकडेही तेच होत आहे. कुटुंबात चार माणसं आणि सहा गाड्या असतात. दिल्लीवाले तर नशिबवान आहेत, कारण आम्ही रस्ते त्यांच्या पार्किगसाठी तयार केले आहेत. कोणीही पार्किंग तयार करत नाही, सगळे रस्त्यावर गाडी उभी करतात,” अशी खंत यावेळी गडकरींनी बोलून दाखवली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी एक कायदा आणणार आहे. रस्त्यावर जो गाडी उभी करणार त्याचा मोबाइलवरुन फोटो काढून पाठवल्यास दंडातील १००० रुपयांपैकी ५०० रुपये त्याला दिले जातील”. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
मोठं घर बांधल्यानंतर खाली पार्किंगसाठीही जागा बनवा असा सल्ला यावेळी गडकरींनी दिला. माझ्या नागपुरातील घरी १२ गाड्यांसाठी अंडरग्राऊंड पार्किंग आहे. मी रस्त्यावर गाडी उभी करत नाही अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली.
नितीन गडकरी यांनी आपल्या युट्यूब अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर गरजेचा असल्याचं सांगितलं.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर विरोधी पक्ष या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र असे असताना केंद्रासह अनेक राज्य सरकारांनी अग्निपथ योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या अग्नीवीरांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये अग्निवीर सैनिकांना प्राधान्य दिले जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या योजनसंदर्भात आता हरिणाया सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लष्कर, नौदल आणि हवाई दलात विशेष ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत अल्प-मुदतीच्या करारावर भरती झालेल्या ‘अग्नीवीर’ सैनिकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये प्राधान्य मिळेल. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी ही घोषणा केली. मंत्रालयाने सांगितले की, या योजनेंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.
हरियाणात अग्निवीरांना प्राधान्य - हरियाणा सरकारनेही अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, मी सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की ७५ टक्के अग्निवीरांना (चार वर्षांच्या सेवेनंतर) सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे त्यांना इतर नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल.
योगी आदित्यनाथ सरकारची मोठी घोषणा - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी जाहीर केले की उत्तर प्रदेश सरकार पोलीस आणि संबंधित सेवांमध्ये भरतीसाठी ‘अग्निवीरांना’ प्राधान्य देईल. आदित्यनाथ यांनी ट्विट करत म्हटले की, “भारत मातेच्या सेवेनंतर उत्तर प्रदेश सरकार राज्य पोलीस आणि इतर संबंधित सेवांमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देईल. युवकांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी भाजपाचे डबल इंजिन सरकार काम करेल.”
मध्य प्रदेशातही अग्निवीरांना प्राधान्य - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली की अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात अल्प-मुदतीच्या कराराच्या आधारावर भरती झालेल्या सैनिकांना मध्य प्रदेश पोलिसांच्या भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल. या योजनेचे स्वागत करताना चौहान म्हणाले, “अग्निपथ योजनेत काम केलेल्या अशा जवानांना मध्य प्रदेश पोलिसांच्या भरतीत प्राधान्य दिले जाईल.”
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.