व्याजदर कपात शक्य?
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्णपदके पटकावली. मात्र हरयाणाच्या बॉक्सिंगपटूंनी महाराष्ट्राच्या तुलनेत दर्जेदार कामगिरी केली. त्यामुळे स्पर्धेअंती महाराष्ट्राला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर हरयाणाने बाजी मारली.
या स्पर्धेतील अग्रस्थानासाठी महाराष्ट्र आणि हरयाणा यांच्यात अखेरच्या दिवसापर्यंत चढाओढ सुरू होती. मात्र यजमान हरयाणाला अखेरीस वरचढ ठरण्यात यश आले. अंतिम पदकतालिकेत अग्रस्थान पटकावणाऱ्या हरयाणाच्या खात्यावर ५२ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४६ कांस्य अशी एकूण १३७ पदके होती. तर दुसऱ्या स्थानावरील महाराष्ट्राने ४५ सुवर्ण, ४० रौप्य आणि ४० कांस्यपदकांसह एकूण १२५ पदके पटकावली.
एकीकडे रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये युद्ध सुरु असताना भारत देशाला रशियाकडून एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम वेळेवर आणि कोणताही अडथळा न येऊ देता पुरवल्या जातील असे विधान रशियन राजदूत डेनिस अलिपोव यांनी केले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील राजनैतिक संबंधाला या वर्षी ७५ वर्षे झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर रशियामधील डायजेस्ट या नियतकालीकामध्ये अलिपोव यांनी वरील भाष्य केले आहे.
भारताने २०१८ साली एस-४०० एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्सच्या खरेदीसाठी पाच मिलियन अमेरिकी डॉलर्सचा रशियासोबत करार केला होता. या करारांतर्गत भारताला ५ एस-४०० एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स मिळणार होत्या. मात्र मागील काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु आहे. तसेच अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर आर्थिक तसेच विविध निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या मिसाईल सिस्टिम्सचा भारताला पुरवठा होण्यास विलंब होऊ शकतो अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र आता रशियाचे राजदूत अलिपोव यांनी भारताला या एस-४०० एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम्सचा पुरवठा वेळेत होईल असे सांगितले आहे.
तसेच अलिपोव यांनी डायजेस्ट या मासिकात लिहिलेल्या लेखामध्ये भारत आणि रशिया यांच्यातील आर्थिक तसेच अन्य संबंधावरही विस्तृत भाष्य केलं आहे. त्यांनी १९५०-६० या काळात भारत देशातील औद्योगिकीकरण तसेच उर्जा प्रकल्प उभारणी याचा उल्लेख केला. तसेच त्यांनी १९६० साली मुंबई येथे आयआयटीची स्थापना, १९७१ साली शांतता, मैत्री आणि सहकार्याचा करण्यात आलेला करार, १९८४ साली सोयुझ टी-११ अंतराळ यानामधून पहिल्या भारतीय अंतराळवीराचे उड्डाण, २००० साली भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या धोरणात्मक भागिदारीचा करार या सर्वांचा उल्लेख केला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे येत आहेत. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. समारंभात संत तुकाराम पगडीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत.
दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे ते प्रयाण करतील. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होईल. दोन वाजून १० मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून सभामंडपात वारकरी आणि भाविकांशी ते संवाद साधणार आहेत.
राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत २०२० च्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेत मराठी माध्यम निवडलेल्या विद्यार्थिसंख्येत सुमारे २० हजारांनी वाढ झाली आहे. तर यंदा विज्ञान शाखेचा मराठी आणि इंग्रजी माध्यमाचा निकाल जवळपास सारखाच आहे.
यंदा विज्ञान शाखेत ६ लाख २४ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. परीक्षा दिलेल्या ६ लाख २२ हजार ७४९ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख १२ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्रजी माध्यमातून ४ लाख १९ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील ४ लाख १८ हजार १४७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर ४ लाख १० हजार १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.०९ आहे. तर मराठी माध्यमातून नोंदणी केलेल्या १ लाख ८८ हजार ८१० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८८ हजार १२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ९८.८६ टक्के, म्हणजेच १ लाख ८६ हजार ९७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत विज्ञान शाखेत एकूण ५ लाख ६० हजार ५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ५ लाख ५८ हजार ६०९ विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ४१ हजार ४०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. इंग्रजी माध्यम घेतलेल्या ३ लाख ७६ हजार ४१२ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७५ हजार ५०८ जणांनी परीक्षा दिली. त्यातील ३ लाख ६३ हजार ९६५ विद्यार्थी, म्हणजेच ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर मराठी माध्यमातून १ लाख ६८ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ६८ हजार २१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ९७.२४ टक्के, म्हणजे १ लाख ६३ हजार ५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०२० मध्ये वाणिज्य शाखेत इंग्रजी माध्यमातून २ लाख ४ हजार ८११, तर मराठी माध्यमातून १ लाख २७ हजार ८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत इंग्रजी माध्यमातून १६ हजार ३३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर मराठी माध्यमातून ३ लाख २४ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०२२ मध्ये वाणिज्य शाखेत इंग्रजी माध्यमातून २ लाख ७ हजार ५१८, तर मराठी माध्यमातून १ लाख १३ हजार १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेत इंग्रजी माध्यमातून १९ हजार १४५ आणि मराठी माध्यमातून ३ लाख ३४ हजार ८३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे वाणिज्य शाखेतील मराठी माध्यमात २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये मराठी माध्यमाचे १४ हजार विद्यार्थी कमी झाले. तर कला शाखेतील मराठी माध्यमाचे जवळपास १० हजार विद्यार्थी वाढल्याचे दिसून येते.
भारताची युवा पॅरानेमबाज अवनी लेखराने फ्रान्स येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा क्रीडा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. अवनीने महिलांच्या आर८ गटातील ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन एसएच१ गटात सुवर्ण कामगिरी केली.
अवनीने ४५८.३ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. तर व्हेरॉनिका व्हादोव्हिकोव्हा (४५६.६ गुण) आणि स्वीडनची अॅना नॉर्मन (४४१.९ गुण) या अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवण्यात यशस्वी ठरल्या.
राजस्थानच्या अवनीला अंतिम फेरीच्या सुरुवातीला अपेक्षित खेळ करता आला नाही. मात्र, अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये सलग १० गुणांवर लक्ष्य साधत त्याने विजय साकारला. लेखराने यापूर्वी महिलांच्या आर२ गटातील १० मीटर एअर रायफल एसएच१ प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.
दुसरीकडे, भारताची युवा पॅरानेमबाज रुबीना फ्रान्सिसने महिलांच्या पी२ गटातील १० मीटर एअर पिस्तूल एसएच१ प्रकारात कांस्यपदक पटकावले.
आकांक्षा व्यवहारे (४० किलो) आणि विजय प्रजापती (४९ किलो) या भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी चमकदार कामगिरी करताना रविवारी युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात रौप्यपदकाची कमाई केली.
मेक्सिको येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षाने एकूण १२७ किलो (५९ किलो व ६८ किलो), तर विजयने १७५ किलो (७८ किलो व ९७ किलो) वजन उचलत दुसरे स्थान पटकावले. आकांक्षा आणि विजय हे अनुक्रमे औरंगाबाद आणि पतियाळा येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलंसमध्ये सराव करतात.
युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वेटलिफ्टिंगपटूंनी केलेल्या कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन. राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षकांनी कमी वेळेमध्ये वेटलििफ्टगपटूंची तयारी करून घेतली. त्यामुळे त्यांनाही या दर्जेदार कामगिरीचे श्रेय जाते, असे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी सांगितले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.