चालू घडामोडी आणि दिनविशेष - 10 जून 2023

Date : 10 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीयांची व्हिसा प्रतीक्षा कमी करावी; अमेरिकी सिनेटरची राष्ट्राध्यक्षांना विनंती
  • भारतीय नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अध्यक्ष जो बायडेन यांनी प्राधान्याने लक्ष घालावे, अशी आग्रही विनंती सिनेटर बॉब मेनेंडेझ आणि काँग्रेसमन मायकेल वॉल्ट्झ यांनी केली आहे.
  • अमेरिकेच्या व्हिसासाठी पहिल्यांदा मुलाखतीची वेळ मिळण्यास भारतीय नागरिकांना सध्या सरासरी ४५० ते ६०० दिवस प्रतीक्षा करावी लागते. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असून लोकांच्या एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्काने त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाते, याकडे मेनेंडेझ आणि वॉल्ट्झ यांनी बायडेन प्रशासनाचे लक्ष वेधले. मेनेंडेझ हे सिनेटच्या परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष आहेत, तर वॉल्ट्झ हे अमेरिकेचे कायदेमंडळ असलेल्या काँग्रेसच्या भारतविषयक धोरणांकडे लक्ष देणाऱ्या हाऊस इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष आहेत. या दोघांनी काँग्रेसच्या दोन स्वतंत्र चर्चादरम्यान भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी ६०० दिवसांपर्यंत प्रतीक्षा का करावी लागते, असा प्रश्न उपस्थित केला.
  • २१ व्या शतकातील अमेरिकेचे भारताशी असलेले आर्थिक, धोरणात्मक, सुरक्षाविषयक संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत असे मेनेंडेझ म्हणाले. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असताना आपण ही समस्या सोडवण्यासाठी काय करणार आहोत, असा प्रश्न वॉल्ट्झ यांनी विचारला.
  • ही समस्या सोडवण्यासाठी परराष्ट्र विभाग परिश्रम घेत असून त्यासाठी अनेक उपाय करण्यात आल्याचे परराष्ट्र साहाय्यकमंत्री रेना बिटर यांनी मेनेंडेझ आणि वॉल्ट्झ यांना सांगितले.
  • भारतामधून व्हिसासाठी नेहमीच जास्त मागणी राहिली आहे. आम्ही या वर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा देणार आहोत. यासाठी आम्ही अत्यंत कार्यक्षमतेने पावले टाकत आहोत.
एमपीएससी संयुक्त परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर; विद्यार्थ्यांचा ‘या’ प्रश्नांवर आक्षेप कायम
  • महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ही उत्तरतालिका पाहून आपल्या निकालाचा अंदाज बांधता येणार आहे.
  • आश्चर्य म्हणजे, या उत्तरतालिकेमध्ये आयोगाने पुन्हा एकदा चुकीचे प्रश्नोत्तरे दिल्याची उमेदवारांची ओरड सुरू झाली आहे. यात दोन प्रश्न चूक असून तीन प्रश्न रद्द करावे लागणार, अशी मागणी आहे. एमपीएससीच्या वतीने मागील काही वर्षांत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये चुकांचे प्रमाण वाढले आहे. शून्य चुका ही संकल्पना राहिलीच नाही असे चित्र आहे.
  • ३० एप्रिलला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ ही परीक्षा घेण्यात आली. त्याच्या उत्तरतालिकेवर हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही चुका कायम असल्याची उमेदवारांची ओरड आहे. दोन प्रश्न रद्द तर चार प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत. त्यामुळे आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
ChatGpt चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी घेतलेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट; म्हणाले, “भारताची टेक…”
  • OpenAI ने गेल्या वर्षी नोहेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले होते. ओपनएआयचे सीईओ आणि चॅटजीपीटीचे निर्माते सॅम ऑल्टमन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सॅम ऑल्टमन यांनी आपल्या भारत भेटीतील दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सॅम ऑल्टमन यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत सॅम ऑल्टमन यांना धन्यवाद दिले आहेत.
  • ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन हे गेले काही दिवसांपासून भारतामध्ये आहेत. त्यांनी आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच G20 शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांची देखील भेट घेतली आहे. आयआयटी दिल्लीमधील एका कार्यक्रमात भाग घेऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.
  • गुरूवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ऑल्टमन यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यावर या भेटीत कशावर चर्चा झाली हे उघड केले. ऑल्टमन म्हणाले, ” देशमसमोर असणाऱ्या संधी, त्यासाठी देशाने काय काय केले पाहिजे तसेच उतार चढाव रोखण्यासाठी जागतिक नियमनाबद्दल विचार करणे आवश्यक आहे. या विषयांवर चर्चा झाली. ” तसेच त्यांनी पुढे खुलासा केला की, पंतप्रधान मोदी यांनी AI ची क्षमता, भारतात याद्वारे लॉन्च केल्या जाणाऱ्या किंवा निर्माण केल्या जाणाऱ्या संधी व त्यासाठीचे आवश्यक असणारे नियम यावर चर्चा केली. तसेच त्यांनी या नवीन टेक्नॉलॉजीच्या नकारत्मक बाजूबद्दल देखील काही गोष्टींवर चर्चा केली.
  • तसेच या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी देखील ऑल्टमन यांना ट्विट करून धन्यवाद दिले आहे. त्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, ” ” भारताची टेक इको सिस्टीम वाढवण्यासाठी AI मध्ये खूप मोठी क्षमता आहे. तसेच ती क्षमता विशेषतः तरुणांमध्ये आहे. आम्ही अशा सर्व गोष्टींचे स्वागत करू ज्या आमच्या डिजिटल परिवर्तनाला गती देऊ शकतात.”
Reliance Jio ने एकाच वेळी लॉन्च केले ५ प्रीपेड प्लॅन्स, बरोबर मिळतेय ‘या’ अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन
  • Reliance Jio ही भारतातील एक प्रमुख आणि सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीने सर्वात पहिल्यांदा आपले ५ जी नेटवर्क देशामध्ये सुरू केले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन रीचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. आता देखील कंपनीने आपले ५ नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. ते प्लॅन किती रुपयांचे आहेत व त्यामध्ये ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते जाणून घेऊयात.
  • रिलायन्स जिओने गाण्यांची आवड असणाऱ्यांसाठी ‘Jio Saavan Pro’ सब्स्क्रिप्शनसह नवीन bundled प्रीपेड मोबाईल रिचार्ज प्लान लॉन्च केले आहेत. ग्राहकांची मोबाइल कनेक्टिव्हीटी आणि म्युझिक सब्स्क्रिप्शनची गरज हे प्लॅन पूर्ण करतील असे कंपनीचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त economictimes ने दिले आहे.
  • रिलायन्स जिओच्या पाच प्रीपेड रिचार्ज प्लॅनपैकी २६९ , ५२९ आणि ७३९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि sms चे फायदे मिळतात. याची वैधता २८ दिवसांपासून ८४ दिवसांपर्यंत आहे. तर जिओच्या ५८९ आणि ७८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनुक्रमे ५६ आणि ८४ दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि SMS ची मिळते.
  • JioSaavn Pro सबस्क्रिप्शनची किंमत सामन्यतः ९९ रुपये इतकी प्रति महिना इतकी आहे. वापरकर्ते जाहिरातीशिवाय गाणी, अमर्यादित डाउनलोड आणि अमर्यादित जिओ ट्यून्सचा आनंद घेऊ शकतात आणि चांगल्या क्वालिटीची गाणी ऑफलाईन पद्धतीने ऐकू शकतात.वरील पाचपैकी कोणत्याही प्लॅनचे रिचार्ज केल्यावर वापरकर्ते जिओ सावन डाउनलोड किंवा साइन इन करू शकतात. तसेच जाहिराती शिवाय गाणी ऐकणे सुरू ठेवण्यासाठी आपली जिओ मोबाइल नंबरच्या मदतीने म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिसमध्ये साइन इन करू शकतात.
  • ज्यांच्याकडे जीओचा प्लॅन आहे ते जिओ सावनवर स्विच करू शकतात. नवीन रिचार्ज प्लॅन माय जिओ App किंवा जिओच्या वेबसाइटवरून अ‍ॅक्टिव्ह करता येऊ शकतो.
आता मोबाइलवर मोफत पाहता येणार आशिया कप, विश्वचषक स्पर्धा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मने केली घोषणा
  • नुकतीच IPL 2023 ही स्पर्धा पार पडली. यावर्षीचे विजेतेपद हे चेन्नई सुपर किंग्स या टीमने पटकावले. संपूर्ण आयपीएल स्पर्धा JioCinema वर पाहता येत होती. मोफत स्पर्धा दाखवल्यामुळे जिओसिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यापाठोपाठ आता डिस्नी + हॉटस्टार प्लॅटफॉर्मने देखील आशिया काप आणि ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपचे मोबाइलवर मोफत स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • डिस्नी + हॉटस्टारने या OTT प्लॅटफॉर्मने हे जाहीर केले आहे, ज्यांच्याकडे डिस्नी + हॉटस्टार असलेल्या सर्व मोबाईल वापरकर्त्यांना या दोन्ही स्पर्धा मोफत पाहता येणार आहेत. क्रिकेट या खेळाचे लोकशाहीकरण करणे आणि भारतातील जास्तीत जास्त मोबाईल वापरकर्त्यांना ते उपलब्ध करून देणे हा कंपनीने घेतलेल्या निर्णयाचा उद्देश आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.
  • डिस्नी + हॉटस्टारचे प्रमुख साजिथ शिवनंदन यांच्या अधिकृत विधानानुसार, ” डिस्नी+ हॉटस्टार भारतात वेगाने विकसित होत असलेल्या ओटीटी व्यवसायामध्ये आघाडीवर राहिले आहे. तसेच दर्शकांना चांगला अनुभव मिळावा म्हणून आम्ही अनेक नवीन कल्पना सुरू केल्या आहेत. त्या विविध नवकल्पनांमुळे आम्हाला आमच्या दर्शकांना खुश करता आले आहे. आशिया कप आणि ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप या स्पर्धा मोबाइल वापरकर्त्यांना मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला इको सिस्टीम विकसित करण्यासाठी मदत मिळेल. ”
  • जिओसिनेमावर आयपीएल २०२३ संपल्यानंतर आणि डिस्नी + हॉटस्टारवर WTC फायनल सुरू झाल्यानंतर दर्शक या प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. जिओ सिनेमावर तब्बल ३.२ कोटींपेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा अंतिम सामना पहिला आहे. या संख्येने आधीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले असून जिओसिनेमाने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. अंतिम सामन्याआधी झालेल्या क्वालिफायर २चा सामना जो मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये खेळला गेला त्यामध्ये २.५७ कोटी लोकांनी जिओसिनेमावर हा सामना पाहिला. ज्यामध्ये गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने १२९ धावांची शानदार खेळी केली होती.

 

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घोषित ; १८ जुलैला मतदान, २१ जुलैला मतमोजणी :
  • राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. १५ व्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होईल. नवनियुक्त राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील. या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांची मुदत २४ जुलै रोजी संपत असून त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली जाण्याची शक्यता नाही. नवे राष्ट्रपती बिनविरोध निवडले जावेत यासाठी केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) प्रयत्न केले जाऊ शकतात.

  • मात्र विरोधकांकडून उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची अधिक शक्यता असल्याने दोन्ही बाजूंकडील संभाव्य उमेदवारांबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभेत प्रचंड बहुमत असलेल्या भाजपकडून ‘एनडीए’च्या उमेदवाराची सहमतीने निवड केली जाईल. विरोधकांमध्ये मात्र काँग्रेस तसेच, अन्य प्रादेशिक पक्षांमध्ये असलेल्या मतभेदामुळे सहमतीच्या उमेदवाराची निवड करणे जिकिरीचे होऊ शकते.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा :ॲथलेटिक्स, जलतरणात छाप; पाच सुवर्णपदकांसह एकूण आठ पदकांची कमाई :
  • महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्यपदक तर, जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्यपदके मिळवली. महाराष्ट्राच्या पदकांमध्ये गुरुवारी पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्यपदकांची भर पडली. परंतु हरयाणा ९६ पदकांसह (३३ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य) पदकतालिकेत अग्रस्थानी असून महाराष्ट्र ८५ पदकांसह (३२ सुवर्ण, २८ रौप्य, २५ कांस्य) दुसऱ्या स्थानी आहे.जलतरणातील ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये मुंबईच्या आन्या वालाने सुवर्णपदक मिळवले, तर १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात अपेक्षा फर्नाडिसनेही सुवर्ण कामगिरी केली. १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुण्याच्या उत्कर्ष गौर व मुंबईच्या पलक जोशीने कांस्यपदक मिळवले. ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी ४ मिनिट आणि ३ सेकंद वेळ नोंदवत विक्रम रचला.

  • २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत साताऱ्याच्या सुदेष्णा शिवणकरने २४.२९ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. अवंतिका नराळेने (२४.७५ सेकंद) याच प्रकारात रौप्यपदक मिळवले. मुलांमध्ये पुण्याच्या आर्यन कदमने २०० मीटर शर्यतीत २१.८२ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या ४ बाय ४०० रिलेच्या संघाने ४:०२.७६ सेकंद वेळेची नोंद करत विजेतेपद उंचावले. ॲथलेटिक्समध्ये राज्याने आठ सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले.

  • वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. खो-खो मध्ये श्वेता वाघ व संपदा मोरेने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने तमिळनाडूचा एक डाव आणि आठ गुणांनी पराभव केला. तर, नरेंद्र कातकडे आणि रामजी कश्यप यांच्या खेळीच्या जोरावर मुलांनी तेलंगणावर एक डाव आणि ४ गुणांनी विजय मिळवत आगेकूच केली.

‘सातवा’ कोण? ; राज्यसभेसाठी आज मतदान, निकालाकडे लक्ष :
  • राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजप, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यांना उच्च न्यायालयात दिलासा मिळावा, असे प्रयत्न आहेत़  परंतु, आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते मिळण्याचा महाविकास आघाडीला अंदाज होता, परंतु ठाकूरही साथ देण्याबाबत साशंकता आह़े

  • ‘एमआयएम’ची दोन मते शिवसेनेसाठी अडचणीची ठरणारी आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. शिवसेना व भाजपला अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष व छोटय़ा पक्षांची गरज लागणार आहे. अपक्ष व छोटय़ा पक्षांचे २९ आमदार असून, ते कोणती भूमिका घेतात यावर शिवसेना व भाजपचे भवितव्य अवलंबून आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मतांचे नियोजन करताना परस्परांना फायदा होईल, अशी व्यवस्था केली आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांनी दुसऱ्या पसंतीची मते शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला द्यावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांनी गुरुवारी सायंकाळी पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते कोणाला द्यायची याचे प्रशिक्षण आमदारांना देण्यात आले.

  • शिवसेना आणि भाजपमध्ये अतिरिक्त जागेवरून चुरस निर्माण झाली असतानाच, दुसरीकडे भाजपने काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणे, हे भाजपसाठी अधिक फायद्याचे आहे. त्यातून राज्यसभेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊ शकेल. मात्र, बाहेरचा उमेदवार आणि आमदारांमधील नाराजी यातून काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. नाराज आमदारांशी पक्षाच्या नेत्यांनी वैयक्तिक चर्चा केली आहे.

UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, बार्टीच्या मोफत प्रशिक्षणार्थींच्या संख्येत वाढ, मंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय :
  • सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टी अंतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत यूपीएससी परीक्षा पूर्वतयारीच्या जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) मार्फत दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक २०० विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही संख्या १०० ने वाढवून ३०० करण्याचा निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

  • दरवर्षी बार्टीमार्फत विशेष चाचणी परिक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना दिल्ली येथे मोफत प्रशिक्षणासाठी निवडले जाते. दिल्ली येथे नामांकित प्रशिक्षण केंद्रात प्रवेश आणि उमेदवारांना निवास व भोजन व्यवस्था देखील बार्टी मार्फत पुरवली जाते. २०० विद्यार्थ्यांसाठी ९ कोटी रुपये खर्च येत होता. आता १०० विद्यार्थी वाढल्याने तो १० कोटींपेक्षा जास्त होणार आहे.

  • मागील दोन वर्षात लॉकडाऊन काळात देखील उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करत बार्टी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले. बार्टीचे २०२० मध्ये ९ विद्यार्थी, तर २०२१ मध्ये ७ उमेदवार यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी बनले आहेत. याचाच विचार करून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशिक्षणासाठी निवड होणाऱ्या विद्यार्थी संख्येत १०० ने वाढ केली. त्यामुळे यावर्षी ३०० विद्यार्थी यूपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण घेणार आहेत.

  • या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन महासंचालक गजभिये यांनी केले आहे.

राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार, विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत कधीपासून येणार? वाचा :
  • राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यात येणार आहे. यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णया जारी करण्यात आला. यानुसार येत्या १३ जूनपासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. १५ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्याबाबत निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

  • जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होऊन चौथ्या सोमवारी (२७ जून २०२२) विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • शासनाचे नेमके कोणते निर्देश - १३ ते १४ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबींच्या अनुषंगाने प्रबोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत २४ ते २५ जून २०२२ रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येईल. २७ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.

  • शासन, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले आणि यापुढे देण्यात येणारे निर्देश / सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे/ पालकांचे कोविड-१९ प्रार्दुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात यावे, असे निर्देशही मांढरे यांनी दिले आहेत.

“हा निर्णय सरकारने पुढे ढकलला तर १० कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल”; पत्राद्वारे ‘अमूल’ची पंतप्रधान मोदींना विनंती :
  • दुग्ध उद्योग क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असणाऱ्या अमूल कंपनीने १ जूनपासून लागू करण्यात आलेला छोट्या आकाराच्या प्लास्टिक नळ्यांवर (स्ट्रॉवर) बंदी आणण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची विनंती केंद्र सरकारकडे केलीय. या निर्णयामुळे शेतकरी आणि दुग्धव्यवसायात असणाऱ्यांवर नकारात्कम परिणाम होईल असं कंपनीचं म्हणणं आहे.

  • अमूलने यासंदर्भात सरकारने फेरविचार करावा अशी मागणी करणारं पत्र २८ मे रोजी लिहील्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं होतं. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाला उद्देशून लिहिण्यात आलेलं. १ जूनपासून छोट्या आकारातील ज्यूस आणि डेअरी प्रोडक्टसोबत मिळणाऱ्या नळ्यांवर (स्ट्रॉ) बंदी घालण्यात आलीय. हा अशाप्रकारच्या व्यवसायाची व्यप्ती ही ७९० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. अमूल कंपनी सुद्धा त्यांच्या अनेक प्रोडक्टसोबत अशाप्रकारच्या छोट्या आकाराच्या नळ्या देते.

  • मोदी सरकारच्या या निर्णयामुळे अमूलबरोबरच पेप्सीको, कोका-कोला यासारख्या कंपन्यांनाही फटका बसलाय. यापूर्वीच सरकारने आपली यासंदर्भातील भूमिका ठाम असून त्यात कोणताही बदल होणार नसल्याचं एकदा स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच याचा परिणाम उद्योगावर होईल अशी कंपन्यांना भिती आहे.

  • आठ बिलीयन डॉलर्सचा व्यवसाय असणाऱ्या अमूल समुहाचे कार्यकारी निर्देशक आर. एस. सोढी यांच्या स्वाक्षरीसहीत हे पत्र पाठवण्यात आलंय. मोदी सरकारने प्रदूषणाच्या समस्येवरील उपाय म्हणून एकल वापर प्लास्टिकच्या वापरावर १ जुलैपासून संपूर्ण बंदी घातली आहे. मात्र ही बंदी पुढील वर्षांपासून लागू करावी अशी मागणी अमूलने केलीय.

१० जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.