युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिननुंगाने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दोन विक्रम मोडीत काढत भारतासाठी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २०१८च्या युवा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जेरेमीने पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले. सामोआचा वैपाव्हा नेव्हो इओआने याने २९३ किलो (१२७ किलो आणि १६६ किलो) वजनासह रौप्यपदक पटकावले. तर नायजेरियाचा एडिडिओंग जोसेफ उमोआफिआने २९० किलोसह (१३० किलो आणि १६० किलो) कांस्यपदक मिळवले.
१९ वर्षीय जेरेमीने स्नॅच (१४० किलो) आणि एकूण वजन (३०० किलो) या विभागांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचा विक्रम रचला. क्लीन अॅण्ड जर्कमध्ये वजन उचलताना त्याला दोन वेळा त्रास झाला; पण त्यातून सावरत त्याने सोनेरी यश मिळवले. जेरेमीने स्नॅचमध्ये १४० किलो वजन उचलत सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी एडिडिओंगविरुद्ध आघाडी घेतली. यानंतर अखेरच्या प्रयत्नात त्याने १४३ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. २०२१च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या जेरेमीने क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १५४ किलो वजनासह सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने १६० किलो वजन उचलले. मग १६५ किलोचा त्याचा तिसरा प्रयत्न सदोष होता.
मीराबाई चानू (सुवर्ण), संकेत सरगर (रौप्यपदक), बिंद्याराणी देवी (रौप्यपदक) आणि गुरुराजा पुजारी (कांस्यपदक) यानंतर भारताचे वेटलिफ्टिंगमधील हे पाचवे पदक आहे.
अखेरच्या प्रयत्नात वजन उचलण्यात अपयश आल्यामुळे मला अश्रू अनावर झाले. मी इतरांची कामगिरी पाहिली नाही. अखेर मी प्रशिक्षकांना विचारले, तेव्हा त्यांनी मला सुवर्णपदक जिंकल्याचे सांगितले. माझ्या प्रशिक्षकांनी वजनाची विभागणी चांगल्या पद्धतीने केली होती. त्यामुळे मला पदकापासून वंचित राहावे लागले नाही. युवा ऑलिम्पिकनंतर वरिष्ठ स्तरावरील माझी ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे. यात सुवर्ण कामगिरी केल्याचा आनंद आहे.
देशातील अनेक रेल्वे स्थानके स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी निगडित आहेत. अशा जवळच्या रेल्वे स्थानकाला भेट देऊन स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नागरिकांना केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या संदर्भात त्यांनी हे आवाहन केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून, रेल्वेने १८ ते २३ जुलै दरम्यान ‘स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि रेल्वे स्थानक’ सप्ताह साजरा केला. यात देशातील २४ राज्यांतील २७ रेल्वेगाडय़ा आणि ७५ रेल्वे स्थानकांचा समावेश होता. स्वातंत्र्यलढय़ात भारतीय रेल्वेच्या भूमिकेची लोकांना जाणीव करून देणे, हा या प्रयत्नांमागील उद्देश असल्याचे मोदींनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘देशात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत, जी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी निगडित आहेत. या स्थानकांबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
या स्थानकांपैकी मोदींनी झारखंडमधील नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमो, लखनौजवळील काकोरी रेल्वे स्टेशन, तामिळनाडूच्या तूत्तुक्कुडि जिल्ह्यातील वान्ची मणियाच्ची जंक्शनचा उल्लेख करून, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. ही यादी खूप मोठी असल्याचे सांगून ते म्हणाले, की २४ राज्यांत स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासाशी संबंधित ७५ रेल्वे स्थानके या अमृतमहोत्सवानिमित्त निवडण्यात आली आहेत.
मंकीपॉक्सीचे रुग्ण वाढत असल्याने न्यूयॉर्कमध्ये ही साथ सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हे शहर आजाराच्या उद्रेकाचे कारण ठरून दीड लाख शहरवासीयांना संसर्ग होण्याची शक्यता आहे, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली.
न्यूयॉर्कचे महापौर एरीक अॅडम आणि न्यूयॉर्क शहर आरोग्य विभागाचे आयुक्त अश्वीन वासन यांनी शनिवारी मंकीपॉक्सच्या उद्रेकामुळे सार्वजिनक आरोग्य आणीबाणी घोषित केली.
गेल्या काही आठवडय़ांपासून आम्ही नागरिकांना लस आणि चांगले उपचार देण्यासाठी प्रयत्न करून त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील दीड लाख नागरिकांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या ९१ व्या भागातून हर घर तिरंगा अभियाना सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. ‘मन की बात’चा आजचा भाग विशेष आहे. कारण यंदा आपण भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. आपण सर्वजण एका अतिशय अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. हे महान भाग्य देवाने आपल्याला दिले असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली.
शहीद उद्यम सिंह यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान म्हणाले, “आजच्या दिवशी आपण सर्व देशवासी, शहीद उद्यम सिंह यांच्या हौतात्म्याला नमन करतो. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या इतर सर्व महान क्रांतिकारकांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरुप - स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरुप मिळाल्याचे बघून मला आनंद होत आहे. समाजातील सर्व स्तरातील आणि समाजातील प्रत्येक घटकातील लोक या महोत्सवाशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. स्वातंत्र्याच्या संघर्षात भारतीय रेल्वेचे योगदान सगळ्यांना कळावे यासाठी आझादीची रेल्वे आणि रेल्वे स्टेशन नावाच उपक्रम केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे. झारखंडचे गोमो जंक्शनचे आता नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमो मध्ये नामांतरण करण्यात आले आहे. या स्थानकावर कालका मेलमध्ये चढून ब्रिटिश अधिकाऱ्यांना चकमा देण्यात नेताजी सुभाष यशस्वी झाले होते. देशभरातील २४ राज्यांमध्ये अशा ७५ रेल्वे स्थानकांची ओळख पटली आहे. या ७५ स्थानकांची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली असून यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजराती भाषेतील काव्यसंग्रह ऑगस्ट महिन्यात इंग्रजीतही उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून लिहिलेले आणि ‘आंख आ धन्या छे’ या शीर्षकाचा हा गुजराती काव्यसंग्रह २००७ मध्ये प्रथम प्रकाशित झाला होता.
त्याचा इंग्रजी अनुवाद चित्रपट क्षेत्रातील पत्रकार आणि इतिहासकार भावना सौम्या यांनी केला आहे.
भावना सौम्या यांनी सांगितले, की या कविता प्रगती, निराशा, परीक्षा, धीरोदात्तता आणि करुणेचे दर्शन घडवतात. मोदींच्या काव्यात सहजता आणि गूढतेचे प्रतिबिंब आहे. त्यांची कविता संदिग्धतेचा उल्लेख करत त्याची उकल करण्याचा प्रयत्न करते. त्यांची हीच लेखनशैली आपले वेगळेपण सिद्ध करते. त्यांच्याकडे भावनाशीलता, विचारमंथन, ऊर्जा आणि आशावाद आहे. अभिव्यक्ती स्वच्छंद असल्याने ती प्रभावी ठरते.
भारताच्या सहाही संघांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवताना रविवारी विजयाची हॅट्ट्रिक साकारली. खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाने ग्रीसवर ३-१ अशी मात केली. पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाने दिमित्रियस मास्ट्रोवासिलिसचा पराभव केला. तसेच युवा अर्जुन इरिगेसीने अथानासिओस मास्ट्रोवासिलिसला ५१ चालींमध्ये नमवले. विदित गुजराथी आणि के. शशिकिरण यांना मात्र बरोबरीवर समाधान मानावे लागले.
भारताच्या ‘ब’ संघाने सलग तिसऱ्यांदा प्रतिस्पर्ध्याला ४-० अशा फरकाने नमवण्याची कामगिरी केली. त्यांनी स्वित्र्झलडचा धुव्वा उडवला. त्यांच्याकडून डी. गुकेश, निहाल सरिन, आर. प्रज्ञानंद आणि रौनक साधवानी या युवकांनी आपापले सामने जिंकले. यापैकी सरिनने सेबॅस्टियन बोग्नरला केवळ २७ चालींमध्येच पराभूत केले. भारताच्या ‘क’ संघाने आइसलँडवर ३-१ अशी मात केली. एस. पी. सेतुरामन आणि अभिजित गुप्ता यांना विजय मिळवण्यात यश आले. मात्र, सूर्यशेखर गांगुली आणि अभिमन्यू पुराणिक यांना संघर्षांनंतरही बरोबरीवर समाधान मानावे लागले.
महिला विभागातील अग्रमानांकित भारताच्या ‘अ’ संघाने इंग्लंडचा ३-१ असा पराभव केला. द्रोणावल्ली हरिकाला योव्हांका हौस्काने बरोबरीत रोखले. मात्र, आर. वैशाली आणि अनुभवी भक्ती कुलकर्णीने मिळवलेले विजय निर्णायक ठरले. तानिया सचदेवची लढत बरोबरीत सुटली. भारताच्या ‘ब’ संघाने इंडोनेशियाला, तर ‘क’ संघाने ऑस्ट्रियाला नमवले. ‘ब’ संघातील वंतिका अगरवाल आणि सौम्या स्वामीनाथन यांना विजय मिळवण्यात यश आले. ‘क’ संघातील पी. व्ही. नंधिधा आणि प्रत्युशा बोड्डा यांनी आपापले सामने जिंकले.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस बजाविली होती. तेव्हा पवार यांनी स्वत:च ईडीच्या कार्यालयात जाऊन जबाब देण्याची तयारी दर्शविली. पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचे जाहीर करताच राज्यात सर्वत्र केंद्र सरकार व भाजप सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले होते.
तत्कालीन फडणवीस सरकार पार बिचकून गेले. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून ईडी कार्यालयात जाऊ नका, अशी विनंती केली होती. तेव्हापासून आजतागायत पवारांचा ईडीने कधी जबाबही घेतला नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली; पण पुढे काहीच प्रक्रिया झालेली नाही.
२०१४ मध्ये केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून आतापर्यंत राज्यातील चार विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात ‘ईडी’ने कारवाई केली आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.