काय म्हणाले जो बायडेन
सध्या जगभरामध्ये आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. एका बाजूने नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाच कर्मचारी कपातीचा वेग दुपटीने वाढला आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple, Amazon अशा आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. Amazon ने आपल्या दुसरी फेरीतील कपात देखील केली आहे. आता ग्रोसरी डिलिव्हरी करणारी कंपनी Dunzo बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या कंपनीमधील अनेक कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार आहे. कारण कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांनी कपात करणार आहे.
भारतातील बंगळुरू स्थित स्टार्टअप कंपनी Dunzo पुन्हा एकदा आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. रिलायन्स रिटेलच्या सहकार्याने चालणारी ही कंपनी आपल्या ३० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार किराणा वितरित करणारी Dunzo कंपनी आपल्या ३०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.
रिपोर्टनुसार Dunzo कंपनीचे संस्थापक आणि सीईओ कबीर बिस्वास यांनी ५ टाऊनहॉल येथे ५ एप्रिल रोजी झालेल्या बॅबिटकीत कर्मचाऱ्यांना कपातीच्या नवीन फेरीबद्दल माहिती दिली. तथापि, डंझोने अद्याप टाळेबंदीच्या नवीन फेरीबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीने दिल्ली-एनसीआरसह आसपासच्या अनेक भागात आपले काही डार्क स्टोअर्स बंद केले होते. या डार्क स्टोअर्स टीममधून कंपनीने २५ ते ३५ टक्के कर्मचारी काढून टाकले होते. कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कायमस्वरूपी आणि हंगामी अशा दोन्ही कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १४ सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात मुंबईचा पराभव झाला असून कोलकाताचा पाच गडी राखून विजय झाला आहे. या विजयासाठी श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स यांनी दिमाखदार खेळ करत विजय अक्षरश: खेचून आणला. पॅट कमिन्सने तर या डावात १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करुन नवा विक्रम रचला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान आणि कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठऱला आहे. त्याच्या या कामगिरीला पाहून मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यानेदेखील आश्चर्य व्यक्त केलंय.
मुंबईने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता संघ अडचणीत सापडला होता. कोलकाताची १०१ धावा पाच गडी बाद अशी स्थिती झाली होती. मात्र रसेल बाद झाल्यानंतर आलेल्या पॅट कमिन्सने पूर्ण सामनाच फिरवून टाकला. मैदावर येताच त्याने चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करून कोलकाताला विजय मिळवून दिला.
त्याच्या या कामगिरीमुळे कोलकाता संघाने मुंबईवर पाच गडी आणि तीन षटके राखून दणदणीत विजय मिळवला. या धमाकेदार फलंदाजीनंतर पॅट कमिन्सच्या नावावर अनोख्या विक्रमांची नोंद झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे. मात्र, तोपर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळ कारवाई करू शकते, असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून आता पुढील १० दिवसांत कामावर हजर न झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याची त्रिसदस्यीय समितीने केलेली शिफारस मान्य करण्यात आल्याचे राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्याचबरोबर दाखल केलेली अवमान याचिका मागे घेण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली. मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करून प्रयत्न सुरू केल्याकडे लक्ष वेधले.
त्याच वेळी दोन्ही बाजू, विशेषत: संपकरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकायचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. परंतु संपकरी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अॅड. गुणरतन सदावर्ते यांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली होती. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतातील अनेक दिग्गजांनी आपले स्थान निर्माण केले आहे. श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९०.७ अब्ज डॉलर आहे. अंबानी हे जगातील १० व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर, गौतम अदानी, आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर आहे आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ११ व्या क्रमांकावर आहेत.
HCL Technologies Limited चे संस्थापक शिव नाडर हे फोर्ब्सने जाहीर केलेल्या टॉप १० श्रीमंत भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या यादीतील पहिल्या तीन स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या यादीत सायरस पूनावाला चौथ्या स्थानावर आहे. त्यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनाची लस कोव्हशील्ड बनवली आहे. पूनावाला यांची एकूण संपत्ती २४.३ अब्ज डॉलर्स आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल) बैठकीचे इतिवृत्त मागवतानाच पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव नाकारण्याच्या नॅशनल असेम्ब्लीच्या उपाध्यक्षांच्या वादग्रस्त निर्णयाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण प्रकरणाची सुनावणी एका दिवसाने, म्हणजे गुरुवापर्यंत लांबणीवर टाकली. हा अविश्वास ठराव सरकार उलथून पाडण्याच्या एका ‘विदेशी कारस्थानाशी’ संलग्न असल्यामुळे तो दखलपात्र नाही असा निर्णय नॅशनल असेम्ब्लीचे उपाध्यक्ष कासिम सुरी यांनी रविवारी दिला होता. यानंतर काही वेळातच, अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान खान यांच्या शिफारशीवरून नॅशनल असेम्ब्ली विसर्जित केली.
सर्वोच्च न्यायालयाने काही तासांतच या घडामोडीची स्वत:हून दखल घेतली आणि पाच सदस्यांच्या खंडपीठाने सोमवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू केली. सरन्यायाधीश उमर अता बंडियाल यांच्या अध्यक्षतेखालील या खंडपीठात इजाझुल अहसान, मोहम्मद अली मझहर, मुनीब अख्तर व जमाल खान मंडोखेल या न्यायाधीशांचा समावेश आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीच्या सुनावणीत बाबर अवान हे पाकिस्तान तेहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्यावतीने, तर अली झफर हे अध्यक्ष अल्वी यांच्या वतीने उपस्थित होते.
पीटीआयप्रणीत सरकारला हटवण्यासाठीच्या विदेशी कारस्थानाचा पुरावा दर्शवणाऱ्या पत्रावर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) नुकत्याच झालेल्या ज्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती, तिच्या इतिवृत्ताबाबत सरन्यायाधीश बंडियाल यांनी अवान यांना विचारणा केली.
उपाध्यक्षांनी ज्या आधारावर हा निर्णय दिला, त्याबाबत न्या. बंडियाल यांनी प्रश्न विचारल्याचे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले. ‘वस्तुस्थिती न मांडता अध्यक्ष असा निर्णय जाहीर करू शकतात काय?’ असे विचारतानाच, या घटनात्मक मुद्यावर न्यायालयाला निर्णय घ्यायचा असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले. ‘ठोस’ पुराव्यासह अध्यक्षांच्या निर्णयाचे समर्थन करावे, असा सल्ला त्यांनी पीटीआयच्या वकिलांना दिला आणि एनएससीचे इतिवृत्त न्यायालयात सादर करण्यास सांगितले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.