पुरस्कारासाठी ७५ युवकांची निवड
अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला यांचाही समावेश
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेसाठी पूर्व नियोजित उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार असल्याने आयोगाने छपाई केलेल्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणे शक्य नसल्याने २९ जानेवारी, ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
या संदर्भात अंतिम न्यायनिर्णय येईपर्यंत परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पत्रक शेअर केलं आहे. या पत्रकात आयोगाने म्हटलं आहे की, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या दिनांक २५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरतालिकेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार, याचिकाकर्त्या ८६ उमेदवारांना दिनांक २९, ३० जानेवारी २०२२ रोजी आयोजित परीक्षेसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देऊन नियोजित दिनांकास परीक्षेचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने आयोगाकडून या ८६ उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था तातडीने करण्यात आली होती.
“कोणत्याही परीक्षेकरता प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येच्या मर्यादेत आयोगाच्या कार्यालयाकडून उत्तरपत्रिका आणि प्रश्नपुस्तिकांची छपाई करण्यात येते. यामध्ये ऐनवेळी कोणत्याही कारणामुळे प्रवेश द्यायच्या उमेदवारांच्या संख्येत अल्प प्रमाणात होणारी संभाव्य वाढ विचारात घेतली जाते. या परीक्षेच्या अनुषंगाने राज्यातल्या विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशामुळे उमेदवारांच्या पूर्वनिश्चित संख्येपेक्षा खूप जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली़. त्यात अनेक उद्योजकांचाही समावेश असल्याचं दिसत आहे. मात्र या यादीमध्ये दोन नावांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही नाव म्हणजे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई. या दोघांनाही पद्मभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील या दोन्ही दिग्गजांची नावं यंदाच्या १७ पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांच्या यादीत आहे. या पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर सत्या नाडेला यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त करताना सर्व भारतीयांचे आभार मानलेत.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांनी सत्या नाडेला यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “पद्मभूषण पुरस्कार जाहीर होणं आणि एवढ्या विशेष लोकांच्या यादीत आपला समावेश असणं हा फार मोठा सन्मान आहे. मी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीय नागरिकांचा आभारी आहे. तंत्रज्ञानाच्या वापर करुन भविष्यातही भारतीयांना अधिक यश मिळावं यासाठी काम करण्यास मी उत्सुक आहे,” असं सत्या नाडेला यांनी म्हटलंय.
६९ वर्षांनंतर, एअर इंडिया ही कंपनी गुरुवारी त्याच्या संस्थापक पित्याकडे, टाटा समूहाकडे परत आली. मिठापासून सॉफ्टवेअपर्यंतच्या व्यवसायात असलेल्या या समूहाने या विमान कंपनीचा ताबा घेतल्यामुळे, करदात्यांच्या पैशांवर इतकी वर्षे तरंगत ठेवण्यात आलेली ही तोटय़ातील कंपनी विकण्याची अनेक वर्षे सुरू असलेले व अपयशी ठरलेले प्रयत्न संपुष्टात आले आहेत.
टाटा समूहाचे संस्थापक जेआरडी टाटा यांनी देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी म्हणून सर्वप्रथम १९३२ साली या कंपनीची स्थापना केली होती. त्यावेळच्या अविभाजित, ब्रिटिशशासित भारतातील कराची आणि मुंबई या शहरांदरम्यान ही कंपनी टपालाची वाहतूक करत होती. या कंपनीचे नंतर राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
दोन दशकांहून अधिक काळानंतर आणि तीन प्रयत्नांनंतर अखेर सरकारला ही तोटय़ात असलेली कंपनी विकण्यात यश आले आहे.
जहांगीर रतनजी दादाभाई (जेआरडी) टाटा यांनी १९३२ साली ही कंपनी स्थापन करून तिचे नाव टाटा एअरलाइन्स असे ठेवले. १९४६ साली टाटा सन्सच्या हवाई वाहतूक विभागाचेचे नामकरण ‘एअर इंडिया’ असे करण्यात आले व १९४८ साली युरोपला जाणाऱ्या विमानांसह ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ सुरू करण्यात आली.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये अंशतः सूट देण्यात आली आहे. दिल्ली सरकारने विकेंडला असलेली संचारबंदी हटवली असून सम-विषम तारखेला दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय मात्र कायम आहे. यासोबतच आणखी काही दिवस काही निर्बंध लागू राहतील.
दिल्ली सरकारने आज याबद्दलची घोषणा केली. त्यानुसार आता रेस्तराँ, चित्रपटगृह आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. लग्न समारंभासाठी आता २०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर सरकारी आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था अजूनही बंदच राहणार आहेत. त्याचबरोबर रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) कायम राहणार आहे.
राजधानी दिल्लीतल्या करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची बैठक झाली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
१९६४च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे संघनायक चरणजीत सिंह यांचे गुरुवारी उना (हिमाचल प्रदेश) येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजारपण आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.
१९६०च्या ऑलिम्पिकमध्ये चरणजीत यांनी अप्रतिम कामगिरी केली. परंतु दुखापतीमुळे त्यांना अंतिम सामन्याला मुकावे लागले आणि पाकिस्तानकडून भारताने ०-१ असा निसटता पराभव पत्करला. मग १९६४मध्ये चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला १-० असे नमवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले होते.
१९६२च्या आशियाई स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघामध्येही त्यांचा समावेश होता. हॉकीमधून निवृत्तीनंतर ते हिमाचल प्रदेश विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात संचालक म्हणून कार्यरत होते.
देशातील करोनाची साथ वेगाने वाढल्यामुळे लांबणीवर पडलेली प्रतिष्ठेची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यांत आयोजनाची योजना आखली जात आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली.
देशातील ३८ प्रथम श्रेणी संघांचा समावेश असलेली रणजी स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होणार होती. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.
‘बीसीसीआय’ची २७ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटला (आयपीएल) प्रारंभ करण्याची योजना आहे. त्यामुळे रणजी स्पर्धा एकाच टप्प्यात खेळवणे कठीण आहे. त्यामुळे अनेक राज्य संघटनांच्या विनंतीवरून स्पर्धेच्या आराखड्यासाठी ‘बीसीसीआय’ने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह उपस्थित होते.
‘‘रणजी स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध पर्यायांचा आम्ही आढावा घेत आहोत. पुढील महिन्यात पहिला टप्पा आणि ‘आयपीएल’नंतर दुसरा टप्पा खेळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे धुमाळ यांनी सांगितले. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत पहिला टप्पा आणि जून-जुलैमध्ये दुसरा टप्पा घेण्याबाबत ‘बीसीसीआय’ आग्रही आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.