सर्वात जलद त्रिशतक -
कोण आहे तन्मय अग्रवाल?
७ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार
९ जणांना पद्मभूषण, ९१ जणांना पद्मश्री
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर
मुलायमसिंह यादव (मरणोत्तर)
दिलीप महालनाबीस (मरणोत्तर)
झाकीर हुसेन
एसएम कृष्णा
श्रीनिवास वर्धन
बालकृष्ण दोशी
यंदा सलग दुसऱ्या वर्षी, वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प यावर्षी ‘पेपरलेस’ होणार आहे. करोनामुळे कामाच्या ताणामुळे तसेच सुरक्षिततेच्या कारणांमुळे सरकारने बजेटच्या प्रती छापणे टाळण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकृत सूत्राने फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले. त्यामुळे बजेट डिजिटल स्वरूपात उपलब्ध करवून दिले जाईल आणि फक्त काही हार्ड कॉपी छापल्या जाणार आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.
अर्थसंकल्प सादर होईपर्यंत १०० हून अधिक लोकांना साधारणपणे पंधरा दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात (ज्यामध्ये वित्त मंत्रालय आहे) प्रिंटिंग प्रेसमध्ये राहावे लागते. सध्या करोनाचं संक्रमण होण्याची भीती आहे, त्यामुळे अर्थसंकल्प न छापण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतंत्र भारतात प्रथमच, गेल्या वर्षी सरकारला अर्थसंकल्प छापण्याची ही प्रथा थांबवावी लागली. प्रिंटिंग प्रेसमध्ये जागा कमी असते आणि कामसाठी १०० पेक्षा जास्त लोक लागतात, त्यामुळे सुरक्षित अंतर राखणं कठीण असतं.
म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण जेव्हा अर्थसंकल्प मांडतील. त्या दिवशी संसदेच्या परिसरात या वेळी बजेट पेपरने भरलेले ट्रक दिसणार नाहीत. यापूर्वी सरकारने २०१६-१७ मध्ये अर्थसंकल्पाच्या हार्ड कॉपीची छपाई कमी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु गेल्या वर्षी प्रथमच छपाई पूर्णपणे थांबवली.
सरकारने सुरुवातीला पत्रकार आणि विश्लेषकांना वितरित केलेल्या प्रतींची संख्या कमी केली होती आणि नंतर खासदारांना उपलब्ध केलेल्या प्रती कमी केल्या होत्या. त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी बजेट पेपरलेस सादर केलं जाणार आहे.
सौदी अरेबिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये तब्बल ३० वर्षानंतर पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. सौदीने मंगळवारी थायलंडसोबतचे राजकीय संबंध पूर्णपणे नव्याने सुरु करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. एका हिऱ्याच्या चोरीवरुन (Thailand Saudi Arabia Blue Dimond Issue) या दोन देशांमधील राजकीय नातं पूर्णपणे संपुष्टात आलं होतं. या दोन्ही देशांमध्ये कोणत्याही पद्धतीची चर्चा मागील ३० वर्षांमध्ये झाली नाही. मात्र आता या दोन्ही देशांनी नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय.
सन १९८९ मध्ये राजा फैसल बिन फहद यांच्या राजवाड्यातून ९१ किलो वजनाचे दागिने आणि काही मौल्यवान रत्नं चोरीला गेले होते. या चोरीमध्ये थायलंडच्या एका नागरिकाचा हात होता. क्रिआंगक्राई टेकामोंग असं ही चोरी करण्याऱ्याचं नाव होतं. ही व्यक्ती राजवाड्यामध्ये नोकर म्हणून काम करायचीय. चोरी केल्यानंतर सर्व दागिने या व्यक्तीने एका व्हॅक्यूम क्लिनरच्या बॅगमध्ये लपवले. यामध्ये ५० कॅरेटचा मौल्यवान असा ब्लू डायमंडही होता.
हे सर्व मौल्यवान सामान क्रिआंगक्राईने थायलंडमधील लैम्पांग प्रांतामध्येही पाठवलं. मात्र एवढ्या महागड्या संपत्तीची विल्हेवाट लावणं त्याला जमलं नाही. त्यामुळे तो कमी किंमतीला हे दागिने विकू लागला. मात्र काही दिवसांमध्येच त्याच्याबद्दल शंका घेण्यात आल्या आणि तो तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला. रॉयल थाय पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आला. क्रिआंगक्राईला दोषी ठरवून त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोची (CIDCO) ५७३० घरांची लॉटरी आज (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी काढण्यात आली. या गृहनिर्माण प्रकल्पाची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सिडकोचा हा गृहनिर्माण प्रकल्प तळोजा नोडमध्ये उभारण्यात येणार आहे.
घर खरेदी करण्यासाठी इच्छुकांना २४ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करता येणार आहे. एकूण ५७३० घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत १५२४ घरं उपलब्ध असणार आहेत. उर्वरित ४२०६ घरं साधारण प्रवर्गासाठी उपलब्ध असणार आहेत.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या माध्यमातून ५७३० घरांच्या निर्मितीचा शुभारंभ यावर्षीच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी करण्यात येतोय. सिडकोतर्फे सातत्याने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यात येतात. किफायतशीर दर, दर्जेदार बांधकाम आणि पारदर्शक व सुलभ ऑनलाईन प्रक्रियेमुळे सिडकोच्या आजपर्यंतच्या सर्व गृहनिर्माण योजना लोकप्रिय ठरल्यात.”
दोहा येथे अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स (AFG vs NED) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. अफगाणिस्तानने सर्व सामन्यांमध्ये विजय नोंदवत ही मालिका सहज जिंकली.
पण गेल्या सामन्यात नेदरलँड्सचा वेगवान गोलंदाज व्हिव्हियन किंग्मा याने सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड (ball tampering) केली. तिसर्या सामन्याच्या ३१व्या षटकात व्हिव्हियन किंग्माने चेंडूशी छेडछाड केली आणि चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याला आयसीसीने चार सामन्यांची शिक्षा सुनावली.
आयसीसीने म्हटले, ”व्हिव्हियन किंग्माने खेळाडू आणि खेळाडूंच्या वैयक्तिक समर्थनासाठी आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २.१४चे उल्लंघन केल्याचे आढळले. चार सामन्यांच्या बंदीसोबतच, किंग्माच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये पाच डिमेरिट गुण देखील जोडले गेले आहेत. २४ महिन्यांच्या कालावधीतील ही त्याची पहिली चूक होती.”
विराट कोहली पुन्हा एकदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) कर्णधारपद स्वीकारताना दिसू शकतो. आगामी हंगामात विराट संघाचे नेतृत्व करू शकतो. यापूर्वी श्रेयस अय्यर किंवा ग्लेन मॅक्सवेल यांना आरसीबीचा कर्णधार बनवण्याची चर्चा होती. पण आरसीबीच्या अध्यक्षांनी विराटबाबत लक्ष्यवेधी विधान केले आहे.
आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा म्हणाले, ”विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामने जिंकले. आम्ही त्याला कर्णधारपदी ठेवण्यास प्राधान्य देऊ शकतो. आम्ही त्याला कर्णधारपद परत घेण्यासाठी विनंती करू. आयपीएल २०२२चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे. गेल्या वर्षी विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.
मिश्रा यांनी सांगितले, की जर विराट कोहली कर्णधारपदासाठी सहमत असेल तर तो आरसीबीचा कर्णधार असेल. अन्यथा लिलावाद्वारे कर्णधार शोधावा लागेल. विराट कोहलीने २०१३ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारले होते.
कोहलीने ८ हंगामात आरसीबीचे नेतृत्व केले. मात्र तो संघाला एकदाही ट्रॉफी मिळवून देऊ शकला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली संघ गेल्या आयपीएलमध्ये एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला होता.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.