GoMechanic नं केली ७० टक्के कर्मचारी कपातीची घोषणा -
देशाचा ७३ व्या प्रजासत्ताक दिन बुधवारी असून उपायुक्त हरि बालाजी यांनी ७३ किलोमीटर अंतर धावून अनोख्या पद्धतीने राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. गेल्यावर्षी अमरावतीमध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर अंतर कापले होते.
वांद्रे कुर्ला संकुलापासून ही मोहीम सुरू झाली. यावेळी परिमंडळ १ चे उपायुक्त बालाजी यांच्यासोबत ९ आणखी धावपटू सहभागी झाले होते. तेथून ते मुलुंडला गेले. तेथून पुन्हा वांद्रे कुर्ला संकुल परिसरात परतले. तेथून नरिमन पॉईंटपर्यत ते व त्यांच्या सोबतचे धावपटू धावले. तेथून ते पुन्हा गेट वे ऑफ इंडियाला आले. त्यातील बालाजी यांच्यासह एकूण तीन धावपटूंनी संपूर्ण ७३ किलोमीटरचे अंतर पार पाडले. उर्वरीत सहा जणांनी ५५ किलोमीटर अंतर कापले. शेवटच्या २१ किलोमीटर अंतरात ७० धावपटू सहभागी झाले होते.
त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे देशाचा तिरंगा झेडा फडकावून अभिवादन करण्यात आले. बालाजी यांनी मध्यरात्री १२ वाजता धावायला सुरूवात केली होती.ते सकाळी साडे आठच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाला पोहोचले. बालाजी यांनी गेल्यावर्षीही अमरावतीमध्ये कार्यरत असताना ७२ किलोमीटरचे अंतर धावून पार पाडले होते.
देशात करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणू संसर्गाची साथ समूह संसर्गाच्या टप्प्यात असून अनेक महानगरांमध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याची माहिती ‘इन्साकॉग’ने प्रसिद्ध केली आहे.
‘इन्साकॉग’ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात ओमायक्रॉनच्या साथीबद्दलची माहिती देण्यात आली आहे. ओमायक्रॉनचे बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत, परंतु सध्या मात्र रुग्णालयात दाखल होणारे आणि अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धोका कायम आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे. संसर्गक्षमता अधिक असलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीए.२’ या उपप्रकाराचेही अनेक रुग्ण देशात आढळल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
ओमायक्रॉन आता समूह संसर्गाच्या टप्प्यावर आहे आणि अनेक महानगरांमध्ये तो प्रबळ असून तेथे बाधितांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. ओमायक्रॉनचा उपप्रकार ‘बीए.२’च्या रुग्णांची संख्या देशात लक्षणीयरीत्या वाढत आहे. परंतु आरटीपीसीआर चाचणीमध्ये विषाणूच्या तीन जनुकांपैकी एक जनुक आढळत नसल्याने (एस-जीन ड्रॉप आऊट) निष्कर्ष नकारात्मक येण्याची शक्यता या अहवालात वर्तवली आहे. अगदी अलीकडे आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बी.१.६४०.२’ या उपप्रकाराचे निरीक्षण केले
जात आहे. त्याचा जलद फैलाव झाल्याचा कोणताही पुरावा नाही आणि त्यात रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची क्षमता असली तरी, सध्या तरी हा प्रकार चिंताजनक नाही. आतापर्यंत, भारतात त्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असेही ‘इन्साकॉग’ने स्पष्ट केले आहे.
भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीला टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. सातव्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन फोरीस्टने त्याच्यावर मात केली. तसेच विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने भारताच्या आर. प्रज्ञानंदला पराभूत केल्याने विदितला अग्रस्थान गमवावे लागले.
सातव्या फेरीच्या सामन्यात वॅन फोरीस्टने बचावात्मक खेळ करताना विदितला धोका पत्करण्यास भाग पाडले. विदितने ३६व्या चालीत केलेल्या चुकीचा फायदा घेत वॅन फोरीस्टने विजय मिळवला. विदितचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला.
कार्लसनने ३४ चालींत प्रज्ञानंदवर मात केली आणि पाच गुणांसह अग्रस्थान पटकावले. अझरबैजानचा शख्रियार मामेदेरोव्ह दुसऱ्या, तर विदित, आंद्रे इसिपेन्को, अनिश गिरी, रिचर्ड रॅपपोर्ट संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आहेत.
चॅलेंजर विभागात भारताच्या अर्जुन इरिगेसीला कझाकस्तानच्या रिनात जुमाबायेव्हने बरोबरीत रोखले. या निकालानंतर अर्जुन सहा गुणांसह अग्रस्थानी कायम आहे.
राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती दिली गेली.
राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळांसोबतच महाविद्यालयेही सुरू करण्याची तयारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. ते जालन्यात बोलत होते.
“सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा,” अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मनं एक सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षणात ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचं समोर आलंय. यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनाच्या आधी सराव म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘बिटिंग रिट्रिट’च्या कार्यक्रमात यंदा ड्रोन्सची कमाल पहायला मिळाली. नवी दिल्लीमध्ये एकाच वेळी एक हजार ड्रोन्सच्या प्रकाशाने आकाशामध्ये अद्भूत दृष्य पहायला मिळालं.
सालाबादप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवसांआधीपासून दिल्लीमधील प्रमुख सरकारी इमारती ज्यामध्ये संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवसस्थान, इंडिया गेट यासारख्या ठिकाणांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईबरोबरच यंदा या सरावामध्ये हवेतील रोषणाईचा नजारा पहाला मिळाला. एकाच वेळी एक हजार ड्रोन्स राजपथावरुन उडताना दिसले.
रात्रीच्या आकाशामध्ये हिरव्या, पांढऱ्या, भगव्या आणि निळ्या रंगामध्ये चमकणारे हे ड्रोन्स एखाद्या पक्षांच्या थव्याप्रमाणे लयबद्ध पद्धतीने हवेमध्ये संचार करत होते. एकाच वेळी या सर्व ड्रोन्सच्या लाईट्स बदलत होत्या. कधी तिरंगा तर कधी केवळ केशरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगात दिसणारे हे ड्रोन्स राजपथावर जणू सैनिकांप्रमाणे पथसंचलन करत होते असा भास होत होता.
सध्या सोशल नेटवर्किंगवर या ड्रोन्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. दिल्लीच्या आकाशामध्ये असं दृष्य पहिल्यांदाच पाहणारे अनेक दिल्लीकर थांबून या ड्रोन्सचे व्हिडीओ शूट करतानाचे चित्र पहायला मिळालं.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.