हा विजय माझ्यासाठी खूप संस्मरणीय -
जीई आणि भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
AI चा नवा अर्थ उलगडला
अमेरिकेच्या संसदेत दुसऱ्यांदा भाषण
भारतीय महिला हॉकी संघाने वर्चस्वपूर्ण कामगिरी करत ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमधील दुसऱ्या सामन्यात अमेरिकेवर ४-० अशी मात करत पदार्पणाच्या हंगामातच तिसरे स्थान मिळवले. भारताने पहिल्या लढतीत ४-२ असा विजय नोंदवला होता.
भारताकडून वंदना कटारियाने (३९व्या मिनिटाला, ५४वे मि.) दोन गोल करत निर्णायक भूमिका पार पाडली. तिला सोनिका (५४वे मि.) आणि संगिता कुमारी (५८वे मि.) यांनी गोल करीत उत्तम साथ दिली. अर्जेटिनाने यापूर्वीच लीगचे जेतेपद मिळवले आहे, तर नेदरलँड्सचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व मिळवत अमेरिकेला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.
भारताच्या महिला संघाने २३ वर्षांखालील पाच देशांच्या हॉकी स्पर्धेत आपली विजयी लय कायम ठेवत बुधवारी युक्रेनवर ३-० अशा फरकाने विजय मिळवला. भारताकडून निकिता टोप्पो (३३व्या मिनिटाला), मंजू चोरसिया (४४वे मि.), ब्युटी डुंगडुंग (५५वे मि.) यांनी गोल केले. भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत युक्रेनवर दडपण आणले. युक्रेनकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले, मात्र भारताच्या बचावफळीने ते हाणून पाडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठव्या जागतिक योगदिनानिमित्त ऐतिहासिक म्हैसूर राजवाडा परिसरात हजारो नागरिकांसह योगासने केली. या वेळी त्यांनी योगामुळे दैनंदिन जीवनशैलीपासून आंतरराष्ट्रीय संघर्षांविषयी जागरूकता होऊन विश्वशांती निर्माण होऊ शकते. योगामुळे देशा-देशांत संबंध जोडले जाऊन, समस्या मिटू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
म्हैसूरमध्ये आयोजित जागतिक योग दिनाच्या मुख्य सोहळय़ाचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी या दिनानिमित्त देशवासीयांसह जगभरातील नागरिकांना शुभेच्छा देताना सांगितले, की योग समाज, राष्ट्र आणि विश्वासह अवघ्या ब्रह्मांडात शांती निर्माण होते. योगाविषयीची ही धारणा एखाद्याविषयी फक्त विचार असू शकतो. परंतु भारतातील संतांनी ‘यत् पिंडे तत् ब्रह्मांडे’ या मंत्रातून याला उत्तर दिले आहे. ऋषी, मुनी व आचार्याचे दाखले देत मोदी म्हणाले, की अवघ्या ब्रह्मांडाची सुरुवात आपल्या शरीर व आत्म्याद्वारे होते. म्हणजे आपल्यापासून ब्रह्मांडाचा प्रारंभ होतो. योगामुळे शांती निर्माण होते. ही शांती केवळ काही लोकांना नव्हे तर अवघ्या समाजाला मिळते.
योग राष्ट्रांसह विश्वात शांती प्रस्थापित करतो. ब्रह्मांडातही शांती निर्माण करतो. याची सुरुवात स्वजागरूकतेद्वारे होते. त्यानंतर विश्वजागरूकतेकडे योगाची वाटचाल होते. जेव्हा आपण स्वत:विषयी व जगाविषयी जागरूक होतो, तेव्हा ज्या गोष्टी बदलण्याची गरज आहे, त्याचा शोध आपण स्वत:त आणि जगात घेऊ लागतो. मग ती दैनंदिन जीवशैलीतील आव्हाने असो अथवा जल-वायू परिवर्तनासारखी जागतिक आव्हाने अथवा जागतिक संघर्ष असो, असे सांगून मोदी म्हणाले, की योगामुळे आपल्याला या आव्हानांची जाणीव होते, त्यांना तोंड देण्यासाठी आपण सक्षम व करुणावानही बनतो. त्याप्रमाणचे योग देशांना जोडतो.
समस्यांतून मार्ग काढण्यास मदत करतो. योग ही भारतीय संस्कृतीची जगाला मिळालेली देणगी आहे. आज जगभरात योग लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आता तो बहुसंख्यांची जीवनशैली झाला आहे. योग समस्त जगाला फक्त आरोग्याचा मार्ग दाखवत नाही, तर अखिल मानवतेसाठी एक वैश्विक पर्व बनले आहे. काही वर्षांपूर्वी योग घरांत आणि आध्यात्मिक केंद्रांत सीमित होता. आता तो जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचला आहे. भारतातील ज्या आध्यात्मिक केंद्रांनी योग-ऊर्जेचे पोषण केले, ती योग ऊर्जा आज जागतिक आरोग्याची दिशादर्शक बनली आहे. अवघ्या मानवी समाजात निरोगी जीवनविषयक विश्वास योगाने निर्माण केला आहे, असे मोदी म्हणाले.
माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षांचे राष्ट्रपती पदाचे सर्वसंमत उमेदवार असतील. दिल्लीत मंगळवारी झालेल्या बैठकीत एकमताने यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्बत करण्यात आले. यशवंत सिन्हा २७ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या वतीने यशवंत सिन्हा यांचे नाव अधिकृतपणे सुचवण्यात आले आणि काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी त्यांना पािठबा दिला. १५ जून रोजी झालेल्या बैठकीत पवार व त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांनी उमेदवारीसाठी नकार दिला होता. त्यामुळे महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांचे नाव तृणमूल काँग्रेसने सुचवले होते. मात्र, त्यांनीही नकार दिल्यामुळे विरोधकांपुढे उमेदवार निवडीबाबत पेच निर्माण झाला होता.
शरद पवार तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केल्यानंतर यशवंत सिन्हा यांच्या नावावर एकमत झाले. मात्र, उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य असू नये, अशी अट काही पक्षांनी घेतली होती. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. राष्ट्रहितासाठी पक्षापासून दूर होऊन काम करण्याची गरज असल्याचे ट्वीट यशवंत सिन्हा यांनी केले.
बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा केली. लोकशाही व सामाजिक एकतेला मोदी सरकारच्या धोरणांमुळे धक्का बसला असून देशाचे अधिक नुकसान टाळण्यासाठी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती पदासाठी संयुक्त उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे विरोधी पक्षांचे संयुक्त निवेदनही रमेश यांनी वाचून दाखवले. २९ जून हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होईल व २१ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.
भारतीय महिला क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजने काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तिच्या निवृत्तीनंतर भारतीय महिला संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करण्यास सज्ज झाला आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघ श्रीलंकेत दाखल झाला. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर तिन्ही प्रकारच्या संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तिच्या नेतृत्त्वाखाली भारतीय मुली उद्यापासून (२३ जून) आपली श्रीलंका मोहिम सुरू करणार आहेत. मात्र, तीन टी २० आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश असलेल्या या दौऱ्याला अद्यापपर्यंत प्रसारकच मिळालेला नाही.
उद्या होणाऱ्या पहिल्या टी २० सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना यांच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. हरमनप्रीतने १२१ टी २० सामन्यांमध्ये दोन हजार ३१९ धावा केलेल्या आहेत. क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारामध्ये मितालीला मागे टाकण्यासाठी तिला फक्त ४६ धावांची गरज आहे. तर, स्मृती मंधानाला टी २० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त २९ धावांची गरज आहे. तिने जर दोन हजार धावा पूर्ण केल्या तर अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरू शकते.
बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या महिलांच्या टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, आयसीसी महिला टी २० विश्वचषक स्पर्धेलाही केवळ आठ महिने बाकी आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाला आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात करावी लागणार आहे. महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय महिला संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे.
भारत आणि श्रीलंकेदरम्यानची टी २० मालिका सुरू होण्यासाठी २४ तासांपेक्षाही कमी कालावधीत शिल्लक आहे. असे असताना हे सामने भारतात प्रसारित होणार की नाही याची अद्याप काहीही माहिती नाही. कोणत्याही प्रसारकाने हे सामने डिजिटल प्लॅटफॉर्मवर किंवा दूरदर्शनवर प्रसारित करण्याचे अधिकार घेतलेले नाहीत.
राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परंतु गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्र्यांना आदिवासींच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढण्यासाठी जनजाती सल्लागार परिषदेची एकदाही बैठक घेण्यास वेळ मिळाला नाही. परिणामी, आदिवासींना घटनात्मक हक्कापासून वंचित राहावे लागले.
राज्य शासनाला आदिवासींच्या उत्थानाकरिता विकास कार्यक्रम देणे, योजना आखण्याचा सल्ला देणे, आदी कामे जनजाती सल्लागार परिषदेचे आहे. राज्य घटनेच्या पाचव्या अनुसूचीतील भाग-ख मधील परिच्छेद ४(१) अनुसार ही परिषद अस्तित्वात आली आहे. ही परिषद आदिवासी समाजाच्या कल्याण योजना, धोरण, कार्यक्रम राबवणे आणि आदिवासींच्या हितसंवर्धनासाठी राज्यपालांना सल्ला देत असते. या परिषदेची पुनस्र्थापना २३ जुलै २०२० रोजी करण्यात आली. परंतु एकही बैठक घेण्यात आली नाही. आदिवासी युवकांसाठी विशेष पदभरती मोहीम राबवणे, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करणे, आदिवासींना जमिनीचे पट्टे देणे, बनावट आदिवासींनी बळकावलेल्या सरकारी नोकरीचा प्रश्न तसेच आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींनी बळकावण्याचा प्रश्न, अनेक वर्षांपासून जातपडताळणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, असे अनेक प्रश्न या परिषदेच्या माध्यमातून निकाली निघणे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या २०१२ च्या अहवालातील सूचनेचेदेखील पालन झाले नाही. आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर एक महिन्याच्या आत जनजाती सल्लागार परिषदेची पुनस्र्थापना आणि वर्षांतून किमान चार बैठका घेणे बंधनकारक आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी करोना काळात ऑनलाइन आणि त्यानंतरही ऑफलाइन बैठक घेतली नाही.
करोना काळात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन बैठका घेत काही विषय निकाली काढले, परंतु आदिवासींचे प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटले नाही आणि बैठका घेण्याचा आग्रह परिषदेचे उपाध्यक्ष असलेल्या आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांना मुख्यमंत्र्यांकडे धरता आला नाही, असा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम यांनी केला.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.