सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने तिसऱ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडला पराभूत करत सहाव्यांदा ‘एटीपी’ दौऱ्यातील अखेरची स्पर्धा जिंकली. जोकोव्हिचने रूडवर ७-५, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवत २०१५ नंतर पहिल्यांदा स्पर्धेचे जेतेपद मिळवले आणि फेडररच्या सहा जेतेपदांची बरोबरी साधली.
जोकोव्हिचने गेल्या दोन हंगामांतही अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्याला पराभूत व्हावे लागले. ‘‘सात वर्षांचा कालावधी खूप मोठा असतो.
या जेतेपदासाठी मी सात वर्षे प्रतीक्षा केली. त्यामुळे हे जेतेपद महत्त्वाचे आहे,’’ असे जोकोव्हिच म्हणाला. जोकोव्हिचने टेल अव्हिव्ह आणि अस्ताना येथे झालेल्या स्पर्धाचे जेतेपद पटकावले, तर पॅरिस मास्टर्सच्या अंतिम फेरीत धडक मारली. याशिवाय त्याने विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले.
मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. तुरळक ठिकाणी करोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या नियमांत मोठा बदल केला आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांना करोना लसीसंदर्भातील स्वयंघोषणा अर्ज भरण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. करोना संसर्गात सातत्याने होत असलेली घट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे.
नेमका निर्णय काय - नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना यापुढे एअर सुविधा पोर्टलवरील करोना लसीसंदर्भातील अर्ज भरणे बंधनकारक नाही. लसीसंदर्भातील स्वयंघोषणा अर्ज तूर्तास बंद करण्यात येत आहे. मात्र आगामी काळात करोना संसर्गाची स्थिती पाहता हा अर्ज भरणे बंधनकारक केले जाऊ शकते. मागील काही दिवसांपासून करोना संसर्गात सातत्याने घट होत आहे. तसेच भारत आणि जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरणात लक्षणीय वाढ झाली. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमांत हा बदल करण्यात आला आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
याआधी हवाई प्रवासाच्या माध्यमातून भारतात यायचे असेल तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एअर सुविधा पोर्टलवर करोना प्रतिबंधक लसीसंदर्भातील फॉर्म भरणे बंधनकारक होते. यामध्ये प्रवाशांना त्यांनी लस घेतलेली आहे की नाही, लसीचे किती डोस घेतलेले आहेत, अशी माहिती भरावी लागत होती. मागील आठवड्यात हवाई वाहतूक मंत्रालयाने हवाई प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारनक नसल्याचे जाहीर केले होते. मात्र करोना संसर्ग टाळण्यासाठी प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन हवाई मंत्रालयाने केले होते. याआधी हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक होते.
नासाचे ओरियन यान (कॅप्सुल) सोमवारी चंद्रापासून १३५ किलोमीटरवर पोहोचले. या यानात अंतराळविरांऐवजी चाचणीसाठी तीन मानवी प्रतिकृती ठेवल्या आहेत. हे यान चंद्राच्या पृथ्वीवरून दिसू न शकणाऱ्या विरुद्ध बाजूला पाठविण्यात आले आहे.
नासाने ५० वर्षांपूर्वी अपोलो मोहीम राबविली होती. त्यानंतर प्रथमच हे यान चंद्रावर पोहोचले आहे. बुधवारी सुरू केलेल्या चाचणी मोहिमेचे हे मोठे यश आहे. या मोहिमेवर ४१० कोटी डॉलर खर्च केले जात आहेत.
चंद्रानजीक यान पोहोचल्यावर सुमारे अर्धा तास त्याचा ह्युस्टनमधील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. या यानाने पृथ्वीचे एक छायाचित्रही पाठविले आहे.
मतदान करण्याची वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय न्यूझीलंड सरकार लवकरच घेणार आहे. आतापर्यंत १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला न्यूझीलंडमध्ये मतदान करण्याचा अधिकार होता, मात्र आता १६ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला मतदानाचा हक्क मिळणार असल्याचे संकेत पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन यांनी दिले. वय कमी करायचे की नाही याबाबत न्यूझीलंड प्रतिनिधीगृहाचे सदस्य मतदान करतील, असे ऑर्डन यांनी सांगितले.
न्यूझीलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच १६ आणि १७ वर्षांच्या नागरिकांना मतदान करण्यास परवानगी देऊ नये, असे म्हटले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी याबाबत मत व्यक्त केले. मतदानाचे वय कमी करण्यास वैयक्तिकरीत्या अनुकूल असून अशा बदलांसाठी कायदेमंडळाच्या ७५ टक्के सदस्यांची सहमती आवश्यक आहे.
मात्र आमच्याकडे तेवढी संख्या नसल्याचेही पंतप्रधान ऑर्डन यांनी सांगितले. मतदानाचे वय कमी करण्याबाबत अनेक देशांमध्ये वादविवाद आहेत. १६ वर्षांच्या नागरिकांना मतदान करण्यास परवानगी देणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रिया, माल्टा, ब्राझील, क्युबा, इक्वेडोर यांचा समावेश आहे.
‘रसना’चे संस्थापक अरिज पिरोजशॉ खंबाटा यांचं शनिवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. रसना ग्रुपच्यावतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “भारतीय उद्योग, व्यापार आणि सामाजिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले,” असेही निवेदनात म्हटले आहे.
अरिज खंबाटा बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्षही होते. तसेच ते WAPIZ (वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्ती) चे माजी अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतीचे अध्यक्षही राहिले होते.
उच्च किंमतीत विकल्या जाणाऱ्या शीतपेयांना पर्याय म्हणून खंबाटा यांनी १९७०च्या दशकात ‘रसना’ या घरगुती शीतपेयाची निर्मिती केली होती. अल्पावधीच हे शीतपेय लोकप्रिय झाले होते. आज देशभरातील १८ लाख रिटेल दुकांनांसह जगभरातील ६० देशांमध्येही रसनाची विक्री केली जाते. रसना ही आता जगातील सर्वात मोठ्या शीतपेय उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) आगामी निवडणुकीत प्रथमच खेळाडूंना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उमेश सिन्हा यांनी सोमवारी ‘आयओए’मध्ये मतदान करू शकणाऱ्या मतदारांची अंतिम यादी निश्चित केली. यामध्ये ७७ मतदार निश्चित करण्यात आले आहेत. निवडणुकीत प्रथमच खेळाडू मतदान करणार असून, हेच या निवडणुकीचे वैशिष्टय़ असेल. निश्चित करण्यात आलेल्या ७७ मतदारांमध्ये ३९ महिला आणि ३८ पुरुषांचा समावेश आहे. खेळाडूंमध्ये पी. व्ही. सिंधू, गगन नारंग, साक्षी मलिक, योगेश्वर दत्त, एम. एम. सोमय्या या ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा समावेश आहे.
लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या आठ खेळाडूंमध्ये योगेश्वर आणि सोमय्याची निवड नव्या खेळाडू समितीने (अॅथलीट कमिशन) केली आहे. साक्षीचे नाव भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या वतीने देण्यात आले. सिंधू आणि नारंग यांनाही खेळाडू समितीने संधी दिली आहे. निश्चित करण्यात आलेल्या मतदार यादीतील ७७ पैकी ६६ मतदार हे ३३ राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी असतील.
प्रत्येक राष्ट्रीय महासंघाकडून एका पुरुष आणि महिलेला प्राधान्य देण्यात आले आहे. लक्षवेधी कामगिरी करणारे आठ खेळाडू (चार पुरुष, चार महिला) हे खेळाडू समितीमधील दोन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या नीता अंबानी असे एकूण ७७ मतदार या वेळी मतदान करतील. ज्या खेळांचा ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत समावेश आहे अशाच क्रीडा महासंघांना मतदानाचा अधिकार नव्या घटनेनुसार मिळणार आहे.
मतदानाचा अधिकार मिळालेले खेळाडू
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.