हत्याकांडात मोठी वाढ ..
मुंबईत ३ हजार १७४ गुन्हे
युरोपियन पार्लमेंटच्या निवडणुका कशा होतात?
रिलायन्स उद्योग समूहाची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) कडून जर्मन रिटेलर मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी याबाबतचा करणार करण्यात आला असून हा करार २८५० कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याची माहिती रिलायन्स उद्योग समूहाकडून जारी प्रसिद्धीपत्रकारद्वारे देण्यात आली आहे. ‘मेट्रो इंडिया’ कंपनी खरेदी केल्यानंतर ‘रिलायन्स रिटेल’ची आता डीमार्ट (D-Mart) आणि हायपर मार्केटशी थेट स्पर्धा असणार आहे.
मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने २००३ मध्ये भारतात आपल्या उद्योगाला सुरुवात केली होती. कॅश-अँड-कॅरी उद्योग प्रकारात व्यवसाय सुरू करणारी ही भारतातील पहिली कंपनी होती. सद्यस्थितीत कंपनीचे भारतातील २१ शहरांमध्ये ३१ मोठे स्टोअर्स आहेत. तसेच या कंपनीत तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत.
आज झालेल्या करारानुसार मेट्रो कंपनीचे भारतातील ३१ स्टोअर्स रिलायन्सच्या ताब्यात येणार आहेत. या स्टोअर्सच्या माध्यमातून मल्टी ब्रॅण्ड रिटेल चेन तयार करण्यात येणार आहे. मेट्रोची भारतातील ३१ घाऊक वितरण केंद्रे तसेच लँड बँक आणि इतर किरकोळ दुकाने रिलायन्सच्या मालकीची होतील. मेट्रोचा वार्षिक महसूल एक अब्ज डॉलरच्या घरात आहे.
करोनाचा त्रास जगातल्या काही देशांना भेडसावू लागला आहे. चीनमध्ये करोना व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंट BF7 ने हाहाकार माजवला आहे. या व्हेरिएंटचे रूग्ण चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. अशात याच व्हेरिएंटचा एक रूग्ण गुजरातच्या बडोदा या ठिकाणी आढळला आहे. गुजरातच्या बडोदा या शहरात BF7 या व्हेरिएंटचा एक रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गुजरातमध्ये BF7 या व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळल्याची चर्चा आहे. अशात एक प्रकरण कन्फर्म झालं आहे. एक NRI महिला या व्हेरिएंटने संक्रमित झाली आहे. गुजरातमध्ये या व्हेरिएंटचा रूग्ण आढळण्याच्या आधी BF7 चे इतर रूग्णही आढळले आहेत.
ऑक्टोबर महिन्यातही एक रूग्ण आढळला होता. मात्र चीनमध्ये या व्हेरिएंटने कहर माजवला असताना गुजरातमध्ये एक रूग्ण आढळल्याची बातमी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
अॅशले गार्डनरची (३२ चेंडूंत नाबाद ६६ आणि २० धावांत २ बळी) अष्टपैलू कामगिरी आणि हिदर ग्रॅहमच्या (८ धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने मालिकेतील अखेरच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ५४ धावांनी पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिका ४-१ अशी जिंकली. अॅशले गार्डनर सामन्यासह मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची स्थिती १० षटकांत ४ बाद ६७ अशी बिकट झाली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. गार्डनर आणि हॅरिस जोडीने पाचव्या गडय़ासाठी नाबाद १२९ धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ४ बाद १९६ अशी भक्कम मजल मारून दिली. गार्डनरने आपल्या खेळीत ११ चौकार, तर हॅरिस ३५ चेंडूत सहा चौकार, चार षटकारांसह ६४ धावा करून नाबाद राहिली.
आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचे गडी ठराविक अंतराने गडी बाद झाले. दीप्ती शर्माची ३४ चेंडूतील ५३ धावांची खेळी हाच काय तो भारताला मिळालेला दिलासा होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात अखेरचा बदल म्हणून संधी मिळालेल्या हिदर ग्रॅहमने चमकदार कामगिरी करत भारताचा डाव अखेरच्या चेंडूवर १४२ धावांत संपुष्टात आला.
चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला.
चीनमध्ये करोनाच्या नव्या उत्परिवर्तनामुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी तज्ज्ञांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ‘‘करोनासाथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी करोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे’’, असे मंडाविया यांनी सांगितले.
जास्तीत जास्त करोना रुग्णांचे नमुने जनुक्रीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्याची सूचनाही आरोग्यमंत्री मंडाविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली. चीनसह अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे नमुने विमानतळावर तपासण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. देशातील २७-२८ टक्के पात्र नागरिकांनी करोनाची वर्धक मात्रा घेतली आहे, याकडे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी बैठकीतील उपस्थितांचे लक्ष वेधले. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीच्या वापराचा आग्रह त्यांनी धरला.
देशात सध्या करोनाचे ३,४०८ उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात करोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी चीनसह अन्य देशांत मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात करोनाचे सरासरी ५.९ लाख दैनंदिन रुग्ण आढळत आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी हंगामात प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) हा नियम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाचा पहिला प्रयोग यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत झाला होता. हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यामुळे ‘आयपीएल’मध्येही हा नियम वापरला जाईल.
‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’ स्पर्धेत सहभागी दहाही संघांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली. प्रभावी खेळाडू हा केवळ भारतीय असेल असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले आहे. ‘आयपीएल’ संघांना एका सामन्यात चार परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा असते. परंतु सामन्याच्या सुरुवातीला संघात तीनच परदेशी खेळाडूंना स्थान दिल्यास प्रभावी खेळाडू म्हणून सामन्यादरम्यान चौथा परदेशी खेळाडू मैदानावर आणण्याची संघाला परवानगी असेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत परदेशी खेळाडूंचा आकडा चारपेक्षा अधिक होऊ शकत नाही, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.
कर्णधाराला प्रभावी खेळाडूचे नाव सांगावे लागेल. डावाच्या सुरुवातीला, षटकाच्या समाप्तीनंतर, फलंदाज बाद झाल्यास किंवा फलंदाजाला दुखापतीमुळे बाहेर जावे लागल्यास प्रभावी खेळाडूला मैदानावर येता येईल. प्रभावी खेळाडू उर्वरित पूर्ण सामना खेळेल आणि तो ज्या खेळाडूची जागा घेईल, त्या खेळाडूला पुन्हा सामन्यात भाग घेता येणार नाही. तसेच प्रभावी खेळाडू कर्णधारपदही भूषवू शकणार नसल्याचे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ डिसेंबर २०२१
काही राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी राज्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांसाठी धोरणे राबवण्याच्या शिफारशी करण्यात आल्याचे भूषण यांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यामध्ये एका आठवड्यात रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक असेल किंवा ४० टक्के खाटा रुग्णांनी व्यापल्या असतील तर त्या जिल्ह्यामध्ये निर्बंध आणि कठोर नियमावली जारी करावी.
रुग्णसंख्या अधिक झाल्यास रात्रीची संचारबंदी, मेळाव्यांवर निर्बंध, विवाह सोहळा, अंत्यंसंस्कार यांसाठी उपस्थित असणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा, कार्यालयीन उपस्थिती आणि सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवासी संख्या यांवर मर्यादा अशा प्रकारची नियमावली जारी करावी.
कंटेन्टमेंट झोनमध्ये नियमांचे पालन करणे सक्तीचे करणे. त्याशिवाय बाधितांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी कोणताही विलंब न करता प्रयोगशाळांकडे पाठवणे.
देशभरात ओमायक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या २०० झाली आहे. देशभरातील १२ राज्यांत ओमायक्रॉनचे रुग्ण आतापर्यंत आढळले असून ७७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने मंगळवारी दिली.
सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्णांचे नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली असून या दोन्ही राज्यांत प्रत्येकी ५४ रुग्णांची नोंद झाली आहे. तेलंगणामध्ये २०, कर्नाटक १९, राजस्थान १८, केरळ १५ आणि गुजरात १४ रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासांत ५,३२६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या ५८१ दिवसांतील रुग्णसंख्येतील सर्वात कमी नोंद आहे. देशभरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता तीन कोटी ४७ लाख ५२,१६४ झाली आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्या ७९,०९७ असून गेल्या ५७४ दिवसांतील ही सर्वात कमी नोंद आहे. गेल्या २४ तासांत ४५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या चार लाख ७८,००७ झाली आहे.
महिलांचे विवाहाचे कायदेसंमत वय १८ ऐवजी २१ करणारे बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्ती विधेयक केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी लोकसभेत सादर केले. पण विरोधकांनी घेतलेल्या अनेक आक्षेपांनंतर हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आले. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने या दुरुस्ती विधेयकाला मान्यता दिली होती.
वेगवेगळ्या धर्मांमध्ये मुलींच्या लग्नाचे किमान वय वेगवेगळे असून या दुरुस्तीद्वारे सहा व्यक्तिगत कायद्यांमध्ये बदल केले जातील आणि मुलींच्या लग्नाचे कायदेसंमत वय मुलांप्रमाणे २१ वर्षे केले जाईल. भारतीय ख्रिश्चन, पारशी, मुस्लीम, हिंदू या धर्मांतील लग्न व घटस्फोट कायदे, तसेच विशेष विवाह कायदा आणि परदेशी विवाह कायदा आदी कायद्यांमध्ये या विधेयकाद्वारे दुरुस्ती केली जाणार आहे. या दुरुस्तीमुळे विवाहविषयक सर्व कायद्यांमध्ये बदल होणार असून लग्नाच्या कायदेसंमत वयामध्ये समानता येणार असल्याचे इराणी म्हणाल्या.
मात्र काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, एमआयएमचे असादुद्दीन ओवैसी आदींनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध केला. इतक्या घाईघाईने हे विधेयक मांडण्याची गरज का होती, असा आक्षेप या सदस्यांनी घेतला. चर्चा न करता विधेयक संमत करण्याचा केंद्राचा हेतू स्पष्ट होतो, असे अधीर रंजन म्हणाले.
दोनदा वा तीनदा केंद्र सरकारने विरोधकांशी चर्चा न करता लोकसभेत विधेयक मांडले आहे. कामकाज सल्लागार समितीतही या विधेयकावर सहमती झाली नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडला.
राष्ट्रविरोधी माहिती आणि खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने २० यूट्यूब वाहिन्या आणि दोन संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
माहिती प्रसारण खात्याने सोमवारी याबाबत दोन आदेश काढले. यूट्यूबला आदेश देऊन २० वाहिन्या बंद करण्यास सांगितले, तर दोन संकेतस्थळांवरही बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत.
यूट्यूबवरील २० वाहिन्या पाकिस्तानातून चालवल्या जात असून त्यांद्वारे भारतासंबंधी संवेदनशील विषयांबाबत चुकीची आणि तथ्यहीन माहिती आणि बातम्या प्रसारित केल्या जातात.
काश्मीर प्रश्न, भारतीय सैन्य, अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर, जनरल बिपिन रावत यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर भावना भडकवणारी आणि दिशाभूल करणारी माहिती या वाहिन्या व संकेतस्थळांवरून देण्यात येत असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे माहिती प्रसारण खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा परीक्षा २०२१ साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी स्वतःची नोंदणी केली आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही राज्य सेवा प्राथमिक परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली आहे. एकूण १०० गुणांसाठी परीक्षा घेतली जाईल. प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसण्याची संधी दिली जाईल.
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) आगामी हंगाम लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांच्या समावेशासह होणार आहे. बीसीसीसीआय दोन्ही संघांना आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात उत्तम संघ तयार करण्याची संधी देईल.
जुन्या आठ फ्रेंचायझींनी काही खेळाडूंना कायम ठेवले, कारण त्यांना जास्तीत जास्त चार खेळाडू निवडण्याची परवानगी होती. बीसीसीआयने अद्याप मेगा लिलावाची तारीख जाहीर केली नसली, तरी आता एका नवीन अहवालानुसार आयपीएल २०२२चा लिलाव फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो.
बीसीसीआय CVC कॅपिटल पार्टनर्सच्या स्वीकृती स्थितीवर चर्चा करत आहे, जे अहमदाबाद फ्रेंचायझी विकत घेतल्यानंतर वादात सापडले होते. CVC कॅपिटलने अहमदाबाद फ्रेंचायझीसाठी अदानी समूहाला मागे टाकण्यासाठी ५,६०० कोटी रुपयांची दुसरी सर्वोच्च बोली लावली, परंतु सट्टेबाजी कंपन्यांशी त्यांच्या कथित संबंधांमुळे ते लवकरच बोर्डाच्या देखरेखीखाली आले.
एका अहवालानुसार, आयपीएल २०२२ मेगा लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल आणि बंगळुरू आणि हैदराबाद हे मेगा इव्हेंट आयोजित करण्यासाठी आघाडीवर आहेत. cricket.com वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, “हा लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. बंगळुरू आणि हैदराबाद ही दोन शहरे आहेत, आयपीएल लिलावासाठी आघाडीवर आहेत.”
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.