चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 जानेवारी 2024

Date : 18 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
प्रज्ञानंदने जगज्जेत्या डिंग लिरेनचा केला पराभव, विश्वनाथन आनंदना मागे टाकत झाला क्रमांक एकचा भारतीय ग्रँडमास्टर
  • टाटा स्टील मास्टर्स इव्हेंटमध्ये जगज्जेता बुद्धिबळपटू डिंग लिरेनला प्रज्ञानंदने चौथ्या फेरीत हरवलं. त्यानंतर आता लाइव्ह रेटिंगमध्ये प्रज्ञानंद विश्वनाथन आनंद यांना मागे टाकत देशाचा क्रमांक एकचा भारतीय ग्रँडमास्टर झाला आहे. प्रज्ञानंदने मागच्या वर्षीही याच स्पर्धेत डिंग लिरेनला हरवलं होतं. काळ्या मोहऱ्यांसह शानदार बुद्धिबळाचा खेळ करत त्याने डिंग लिरेनला हरवलं. जगज्जेत्या बुद्धिबळपटूला हरवणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • प्रज्ञानंदच्या या कामगिरीनंतर उद्योजक गौतम अदाणी यांनी एक्स पोस्ट करुन त्याचं अभिनंदन केलं आहे. आम्हाला तुझा अभिमान वाटतो अशा शब्दात अदाणी यांनी प्रज्ञानंदचं कौतुक केलं आहे. डिंग लिरेन हा चीनचा बुद्धिबळपटू आणि सध्याचा जगज्जेता खेळाडू आहे. त्याला हरवून तू जी कामगिरी केलीस त्याबद्दल आम्हाला तुझा गर्व वाटतो या आशयाची पोस्ट गौतम अदाणी यांनी केली आहे.
  • आपल्या देशाचं मी जागतिक स्तरावर चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करु इच्छितो. मी जेव्हा खेळतो आणि जिंकतो तेव्हा तो मला माझ्यापेक्षाही आपल्या देशाचा मोठा सन्मान वाटतो. मी माझ्या क्षमता ओळखून आहे. तसंच मला मदत करणाऱ्या अदाणी समूहाचेही मी आभार मानतो असं प्रज्ञानंदने म्हटलं आहे.
  • २०२३ मध्ये प्रज्ञानंद बुद्धिबळ स्पर्धेच्या जागतिक चषक स्पर्धेत पोहचणारा सर्वात कमी वयाचा भारतीय बुद्धिबळपटू होता. २०२२ मध्ये प्रज्ञानंदने मॅग्नस कार्लसनला हरवलं होतं त्यामुळे तो चर्चेत आला होता. आता त्याने डिंग लिरेनचा पराभव केला आहे.
मेसीला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
  • अर्जेटिनाचा तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसी कारकीर्दीत आठव्यांदा ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. यात मेसीने नॉर्वे आणि मँचेस्टर सिटीचा आघाडीपटू अर्लिग हालँडला मागे टाकले. महिलांमध्ये स्पेनची खेळाडू ऐताना बोनामती या पुरस्काराची मानकरी ठरली.
  • ‘फिफा’ वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी पुरुष विभागात मेसी आणि हालँड यांच्यात चुरस पाहायला मिळाली. जगभरातील राष्ट्रीय संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक, निवडक पत्रकार व चाहत्यांच्या मतांनंतर मेसी आणि हालँड यांचे समान ४८ गुण होते. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. पहिल्या स्थानासाठी मेसीला १०७ मते, तर हालँडला ६४ मते मिळाली होती. त्यामुळे मेसी या पुरस्काराचा मानकरी ठरला. फ्रान्स आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा आघाडीपटू किलियन एम्बापे तिसऱ्या स्थानी राहिले. लंडन येथे झालेल्या पुरस्कार सोहळयासाठी हे तिघेही उपस्थित नव्हते.
  • चाहत्यांची सर्वाधिक मते ही मेसीला मिळाली, तर पत्रकारांनी हालँडला अधिक मते दिली. तसेच राष्ट्रीय संघाच्या कर्णधारांनी मेसी आणि प्रशिक्षकांनी हालँडला अधिक मते दिली. या पुरस्कारासाठी १३ महिन्यांपूर्वी कतार येथे झालेली विश्वचषकातील कामगिरी ग्राह्य धरली गेली नाही. विश्वचषकानंतर म्हणजेच १८ डिसेंबर २०२२ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीतील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करण्यात आला.
  • मेसी आणि एम्बापे यांनी पॅरिस सेंट-जर्मेनला लीग-१चे जेतेपद मिळवून दिले. मात्र, या संघाने चॅम्पियन्स लीगमध्ये निराशा केली. विश्वचषकानंतर मेसीने पॅरिससाठी २२ सामन्यांत नऊ गोल आणि सहा गोलसाहाय्य केले. गतहंगामानंतर मेसीने अमेरिकेतील इंटर मियामी संघाशी करार केला.
राज्यात वाहन परवान्यासाठी १९ निकष!
  • राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रस्ते अपघाताला काही प्रमाणात आळा बसावा यासाठी प्रगत देशांच्या धर्तीवर नवीन वाहन चालक परवाना मिळविताना १९ प्रकारचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. राज्याच्या परिवहन विभागाच्या वतीने यासाठी १७ ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग तयार केले जात असून २३ ठिकाणी वाहन योग्यता प्रमाणपत्र केंद्रे उभारली जात आहेत.
  • येत्या दोन महिन्यांत हे स्वयंचलित परवाना तपासणी मार्ग व केंद्रे सुरू केली जाण्याची शक्यता आहे अशी माहिती परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया यांनी दिली. राज्यात रस्ते अपघातात १५ हजारापेक्षा जास्त चालकांचा मूत्यू होत आहे ही चिंतेची बाब ठरली आहे. केंद्रीय रस्ते व परिहवन मंत्रालयाने गेल्या वर्षी सर्व प्रकारचे वाहन चालक परवाना देताना नियमात बदल केले आहेत. नवीन  परवाना घेणाऱ्या चालकाने ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याला देण्यात आलेल्या वेळेनुसार चाचणी द्यावी लागत आहे.  
  • राज्य सरकारच्या परिवहन विभागाने ३५ वर्षांनंतर वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. केवळ वाहन चालवता येत आहे हा निकष वाहन परवाना देण्यासाठी पुरेसा नाही. वाहन परवाना देण्यात  परिवहन विभागाचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही अशी प्रणाली या नवीन स्वयंचलित वाहन परवाना पद्धतीत अवलंबली जाणार आहे.
  • १९ नियम परिवहन विभागाने तयार केले आहेत. यापूर्वीच्या चाचणीत परिवहन निरीक्षकाचा (आरटीओ अधिकारी) शेरा हा परवाना मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता.  या चाचणीत मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळला जाणार असल्याचे परिवहनचे प्रधान सचिव जैन यांनी सांगितले.

‘आधार’शी जोडणी

  • * नवीन नियमानुसार वाहन परवाना देताना गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाणार आहे.  वाहन परवाना आधार कार्डशी जोडला जाणार आहे. * ऑनलाइन अर्ज केल्यानंतर स्वयंचलित मार्ग (ऑटोमेटेड टेस्ट) वेळ दिली जाणार आहे. या ऑटोमेटेड टेस्टच्या जागी सेंसर लावले जाणार असून सीसी टीव्ही कॅमेरांच्या देखरेखीत ही चाचणी होणार आहे. कमीत कमी २९ तासांचे वाहन प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.
जेएन.१ चा धोका वाढला! राज्यातली रुग्णसंख्या ४५१ वर पोहोचली; सर्वाधिक पुण्यात
  • राज्यात करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४५१ झाली असून, त्यातील तब्बल १८९ रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात करोनामुळे मागील २४ तासांत एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
  • राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही रुग्ण सापडले होते. राज्यातील जेएन.१ ची एकूण रुग्णसंख्या मंगळवारी २५० होती. त्यात बुधवारी एकाच दिवसांत २०१ रुग्णांची भर पडली आहे. पुण्यात बुधवारी जेएन.१ च्या ३९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १८९ झाली असून, राज्यातील जेएन.१च्या एकूण रुग्णांपैकी ४० टक्के पुण्यात आहेत. त्याखालोखाल ठाणे ८९, मुंबई ३७, छत्रपती संभाजीनगर ३१, नागपूर ३०, रायगड १३, सोलापूर ९, अमरावती ९, सांगली ७, कोल्हापूर ७, रत्नागिरी ५ , जळगाव ४, हिंगोली ४, अहमदनगर ३, बीड ३, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, अकोला १, सातारा १, सिंधुदुर्ग १, यवतमाळ १ आणि नंदुरबार १ अशी रुग्णसंख्या आहे.
  • राज्यात मागील २४ तासांत करोनाच्या ८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याच वेळी ९७ रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के असून, मृत्युदर १.८१ टक्के आहे. राज्यात मागील २४ तासांत १२ हजार २६९ चाचण्या झाल्या. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर ०.६६ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य सहसंचालक डॉ. बी. आर. पवार यांनी दिली.
अयोध्येला न जाता कसा पाहू शकता श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा? घरबसल्या कसे घेऊ शकता प्रभु रामाचे दर्शन?
  • अयोध्‍येमध्ये २२ जानेवारीला होणाऱ्या श्री राम मंदि रप्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी ८००० पेक्षा जास्त पाहुण्यांना आमंत्रिक केले होतो. विशेष म्हणजे या खास दिवशी पूर्ण अयोध्या शहर भव्य स्वरुपामध्ये सजवले जाईल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काय होणार, कोणते पाहूणे येणार आहेत, पूजा कशी होणार, मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत याची उत्सुकता सर्वांना आहे. अशा परिस्थितीत, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा प्रत्येक सेकंद तुम्ही घरी बसून कसा पाहू शकता. होय. तुम्ही अयोध्येला जाणार नसेल तरीही घरबसल्या तुम्ही प्रभु रामाचे दर्शन घेऊ शकता. कसे ते जाणून घ्या…

Doordarshan वर होणार थेट प्रक्षेपण

  • केंद्र सरकारच्या सुचनेनुसार पीआयबीच्या २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये देशभरातील लोकांपर्यंत पोहण्यासाठी दुरदर्शनद्वारे खास व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी दुरदर्शन अयोध्येत राम मंदीर आणि आसपास ४० कॅमेऱ्या लावणार आहे आणि ४के( 4K) डिस्प्लेवर थेट प्रसारण केले जाणार आहे. डीडी नॅशनल आणि डीडी न्युजवर याचे थेट प्रसारण होणार आहे.

युट्यब आणि इतर सोशल मीडिया अकांउटवर होईल थेट प्रसारण

  • फक्त २२ जानेवारीलाच नाही तर २३ जानेवारीला दुरदर्शनवर प्रभु रामााची विशेष आरतीचे आणि मंदिराचे उद्घाटनही थेट प्रक्षेपण केले जाईल. मुख्य मंदिर परिसराव्यतिरिक्त, दूरदर्शन आपल्या विविध चॅनेलवर शरयू नदीच्या घाटाजवळील राम की पायडी, कुबेर टिळा येथील जटायू पुतळा आणि इतर ठिकाणी थेट प्रक्षेपण करेल.

टीव्ही चॅनेल्सना फीड दिले जाईल

  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की,”दूरदर्शन व्यतिरिक्त खाजगी वाहिन्यांनाही दूरदर्शनद्वारे फीड मिळेल.” त्यांनी सांगितले की,”जी२० (G20) प्रमाणेच यावेळीही दूरदर्शन ४के (4K) मध्ये प्रसारित करेल. संपूर्ण कव्हरेज थेट आणि विविध भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या चॅनेलवर प्रसारित केले जाईल. चंद्रा म्हणाले की, “४के (4K) तंत्रज्ञानाद्वारे अतिशय स्पष्ट आणि चांगले थेट प्रक्षेपण केले जाते, ज्यामुळे उच्च दर्जाचे चित्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.”

 

महाराष्ट्रात होणार ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; ‘एवढ्या’ लोकांना मिळणार रोजगार
  • स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
  • उदय सामंत यांनी सांगितलं की, “डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’मध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच, महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.”
  • “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे १० हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे,” अशी माहिती सामंत यांनी दिली. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.
  • ‘या’ कंपन्यांनी केला सामंजस्य करार
    ग्रिनको एनर्जी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमीटेड – १२ हजार कोटींची गुंतवणूक
    हाथवेय होम सर्व्हिसेस ओरेन्डा इंडिया – १६ हजार कोटींची गुंतवणूक
    आयसीपी इनव्हेसमेंट/इंडस कॅपिटल – १६ हजार कोटींची गुंतवणूक
    रुखी फुड्स – २५० कोटींची गुंतवणूक
    निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेड लिमीटेड – १ हजार ६५० कोटींची गुंतवणूक

ऑस्ट्रेलिया खुली टेनिस स्पर्धा: नोव्हाक जोकोव्हिचचे विजयी पुनरागमन

  • करोना लस न घेतल्याने गतवर्षी ऑस्ट्रेलियातून माघारी परतावे लागलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकेव्हिचने यंदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. स्पर्धेतील दहाव्या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या जोकोव्हिचने मंगळवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत स्पेनच्या रोबेटरे कॅरबाल्लेस बाएनाला ६-३, ६-४, ६-० असे सहज नमवले. 
  • दुसरीकडे, अनुभवी अँडी मरेने इटलीच्या १३व्या मानांकित माटेओ बेरेट्टिनीला पराभवाचा धक्का दिला.जोकोव्हिचला पहिल्या फेरीच्या लढतीत चाहत्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हाच त्याच्या विजयापेक्षा लक्षवेधी ठरला. संपूर्ण लढतीदरम्यान स्टेडियम ‘नोला’च्या गजराने गुंजून गेले होते. तसेच सर्बियाचे ध्वजही मोठय़ा प्रमाणावर दिसत होते.
  • ब्रिटनच्या बिगरमानांकित मरेने आपल्या खेळातील चुणूक नव्याने दाखवताना बेरेट्टिनीचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-३, ६-३, ४-६, ६-७ (७-९), ७-६ (१०-६) असा पराभव केला. दुखापतीमधून सावरल्यावर पुनरागमन करणाऱ्या डॉमिनिक थिमला स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला. मात्र, पहिल्याच फेरीत रशियाच्या आंद्रे रुब्लेव्हने थिमवर ६-३, ६-४, ६-२ अशी मात केली. 
  • महिला एकेरीच द्वितीय मानांकित ओन्स जाबेऊरला विजयासाठी विजयासाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. जाबेऊरने तामरा झिदान्सेकचा ७-६ (१०-८), ४-६, ६-१ असा पराभव केला. एलिसे मेर्टेन्सने दोन ग्रँडस्लॅम विजेत्या गार्बिन मुगुरुझाला ३-६, ७-६ (७-३), ६-१ असे नमवले.

मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; ११ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती

  • मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा तसेच अन्य जगप्रसिद्ध कंपन्यांकडून कर्मचारीकपात केली जात आहे. असे असतानाच आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे. या कारवाईला आजपासूनच (१८ जानेवारी) सुरुवात होणार आहे.

होणार ५ टक्के कर्मचारीकपात

  • स्काय न्यूज आणि रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये जवळपास ५ टक्के कर्मचारीकपात केली जाणार आहे. या कारवाईअंतर्गत एकूण ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यात आहे. आजपासूनच त्याची सुरुवात होणार असून मुख्यत्वे मनुष्यबळ आणि इंजिनिअरिंग या विभागांत ही नोकरकपात केली जाऊ शकते.

गेल्या वर्षी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

  • मायक्रोसॉफ्ट कंपनीत जगभरात ३ लाख २१ हजार कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. यामध्ये एकट्या अमेरिकेत १ लाख २२ हजार कर्मचारी आहेत. तर ९९ हजार कर्मचारी हे जगभरात विस्तारलेले आहेत. मागील काही दिवसांपासून पर्सनल कॉम्प्यूटर विक्री क्षेत्रात मंदी आहे. त्याचा फटका मायक्रोसॉफ्ट या कंपनीला बसलेला आहे. याच कारणामुळे मायक्रोसॉफ्टकडून हा निर्णय घेण्यात येतोय. मायक्रोसॉफ्टने मागील वर्षी जुलै महिन्यातच काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. Axios या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यात जवळपास १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.

देशात करोनाबाधितांची संख्या १०० पेक्षा खाली, ४ दिवसांपासून एकाचाही मृत्यू नाही

  • मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. येथे रुग्णांची संख्या रोज वाढत असून रुग्णालये अपुरे पडू लागल्याचा दावा केला जात आहे. मात्र चीनमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात मात्र रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा १०० पेक्षा खाली गेला आहे. मार्च २०२० पासून सोमवारी पहिल्यांदाच नव्या करोनाग्रस्तांची संख्या १०० पेक्षा खाली गेली आहे. तसेच मार्च २०२० पासून पहिल्यांदाच सलग चार दिवस एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.
  • देशात करोनाचा संसर्ग सध्या अटोक्यात आहे. शासकीय आकडेवारीनुसार देशात मार्च २०२० पासून पहिल्यांदाच नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा १०० पेक्षा खाली गेला आहे. तसेच २०२० पासून पहिल्यांदाच सलग चार दिवसांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी भारतात ८३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. रविवारी हीच संख्या ११४ होती. याआधी भारतात १०० पेक्षा जास्त रुग्णसंख्येची नोंद २७ मार्च २०२० रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १०० पेक्षा खाली आलेली नव्हती.
  • सध्या दक्षिण भारतासह महाराष्ट्रात नव्याने करोनाबाधित आढळण्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. मागील आठवड्यात देशात १०६२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यातील ८३१ रुग्ण हे महाराष्ट्रातील होते. दिल्लीमध्ये सोमवारी एकही नवा रुग्ण आढळला नाही. मागील आठवड्यात दिल्लीमध्ये एकूण ३२ नवे रुग्ण आढळले.

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका: सातत्यपूर्ण कामगिरीचे भारताचे ध्येय

  • श्रीलंकेविरुद्ध निर्भेळ यश संपादन केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून बुधवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत त्यांचे कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य असेल. हैदराबाद येथे होणाऱ्या या सामन्यात इशान किशनला मधल्या फळीत संधी मिळणे अपेक्षित आहे. त्याचा या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न असेल.
  • या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने आता प्रत्येकच सामन्याचे महत्त्व वाढले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दर्जेदार कामगिरी केली. 
  • फलंदाजीत रोहित, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी, तर गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी चमक दाखवली. मात्र, आता तुल्यबळ न्यूझीलंडकडून भारताला अधिक आव्हान मिळणे अपेक्षित आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जानेवारी २०२२
देशात १२-१४ वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चपासून ? ; करोना गटाचे कार्याध्यक्ष डॉ. अरोरा यांचे संकेत :

मार्च महिन्यापासून १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिले. सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असून मार्चपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता अरोरा यांनी व्यक्त केली.

देशात १५-१८ वयोगटातील मुलांची संख्या सात कोटी ४० लाख ५७ हजार असून त्यापैकी तीन कोटी ४५ लाख मुलांनी कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतली आहे. जानेवारीच्या अखेपर्यंत बहुतेक मुलांची पहिली मात्रा पूर्ण होईल.

२८ दिवसांनी दुसरी मात्रा देण्यात येणार असल्याने त्यांचे लसीकरण मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे अरोरा म्हणाले. १५-१८ वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार आहेत. हे लसीकरण मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे, असे अरोरा म्हणाले.

आंतरराष्ट्रीय मंचावरून भाषण देताना टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने उडाला पंतप्रधान मोदींचा गोंधळ :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्दे उपस्थित केले. आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह करोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे, असं मोदींनी यावेळीस जगभरातील देशांना सांगितलं.

आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी या भाषणामधूनही छाप पाडून गेले. मात्र त्यांचा भाषणापेक्षा सध्या अधिक चर्चा होताना दिसतेय या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उडालेल्या गोंधळाबद्दल.

झालं असं की, भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असं मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले.

सौरव गांगुली BCCIच्या अध्यक्षपदावरून हटणार? जाणून घ्या कारण :

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून पायउतार होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त, बोर्ड सचिव जय शाह यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२२ मध्ये संपणार आहे.

अशा स्थितीत या दोघांच्या जागी बोर्डाचा नवा अध्यक्ष आणि सचिव नेमला जातो की गांगुली-शहा यांच्याकडे पुन्हा जबाबदारी येते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ऑक्टोबर-२०१९ मध्ये गांगुलीला बीसीसीआयचा अध्यक्ष बनवण्यात आले, त्याआधी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होता.

सौरव गांगुली २०१५ पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनशी संबंधित होता. न्यूज १८ हिंदीच्या वृत्तानुसार, त्याचा कार्यकाळ या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे. अशा स्थितीत मंडळाला नवा अध्यक्ष मिळू शकतो. गांगुलीच्या अध्यक्षपदाखाली भारताने अनेक द्विपक्षीय मालिकेतही यश संपादन केले.

गांगुलीच्या कार्यकाळातच राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण नव्या इंनिंगसाठी सज्ज झाले. द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुख म्हणून बंगळुरूमध्ये काम करत होता, त्यानंतर गांगुलीने त्याला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी घेण्यास राजी केले. याशिवाय, गांगुलीने लक्ष्मणशीही बोलून त्याला NCAमध्ये सामील होण्यासाठी राजी केले.

जर तुम्हीही एजंटकडून बुक करत असाल रेल्वे तिकीट, तर आताच व्हा सावध; अन्यथा भरावा लागेल दंड :

करोना महामारीच्या दरम्यान रेल्वेकडून तिकीट कन्फर्म झाल्यानंतरच प्रवास करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकीट बुक करून आणि ती कन्फर्म झाल्यानंतरच प्रवास करता येणार आहे. तथापि, काही सवलतींमध्ये आता प्लॅटफॉर्मवरून तिकीट घेऊन प्रवास करता येईल.

काही लोक त्यांच्या मोबाईल किंवा इतर डिव्हाईसवरून आगाऊ रेल्वे तिकीट बुक करतात तर काही लोक प्रवासासाठी दलालांसोबत संपर्क साधतात. अशातच, भारतीय रेल्वे आयआरसीटीसीने प्रवाशांनी बेकायदेशीररित्या तिकीट बुक न करण्याचा इशारा दिला आहे.

हे दलाल तिकीट बुकिंगच्या नावावर प्रवाशांकडून जास्त शुल्क आकारतात. तसेच अनेकदा चुकीचे तिकीट सुद्धा देतात. या गोष्टीचा विचार करून रेल्वेने याबाबत सक्ती करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच पश्चिम रेल्वेने अवैध पद्धतीने तिकीट बुक करणाऱ्या आणि प्रवाशांकडून जास्त पैसे घेणाऱ्या दलालांवर कारवाई सुरु केली आहे.

पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलांतर्फे सहा मंडळांमध्ये प्रत्येक दिवशी विशेष मोहीम चालवल्या जात आहेत. सामान्य नागरिकांनी देखील या गोष्टीपासून सावध राहावे असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आलंय.

पंजाब विधानसभेची निवडणूक १४ ऐवजी २० फेब्रुवारीला :

राज्य सरकार तसेच विविध राजकीय पक्षांनी केलेली मागणी मान्य करून, पंजाबमध्ये एकाच टप्प्यात होणारी निवडणूक गुरू रविदास जयंतीच्या कारणास्तव १४ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सोमवारी घेतला.

गुरू रविदास यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे लाखो अनुयायी १६ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जाणार असल्याने ते १४ फेब्रुवारीला मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन मतदानाची तारीख पुढे ढकलावी, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, भाजप व त्याचे मित्रपक्ष, बसप व इतर संघटनांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार, ही निवडणूक आता २० फेब्रुवारीला होईल, असे आयोगाने एका निवेदनात सांगितले. ही तारीख उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्याशी जुळणारी आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका तसेच पोटनिवडणुकांच्या तारखा बदलण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले.

ऑक्टोबर २०१३ मध्ये मिझोराममध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काही तारखा आयोगाने बदलून नोव्हेंबरमध्ये केल्या होत्या. एप्रिल २०१४ मध्ये मिझोराममधील एका पोटनिवडणुकीचे वेळापत्रक बदलण्यात आले होते, तसेच अशाच कारणांसाठी मार्च २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची तारीखही बदलण्यात आली होती.

१८ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.