ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचा मालकीहक्क मिळवलेल्या अब्जाधीश एलॉन मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे ट्विटर खरेदीसाठी त्यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स मोजलेले असताना दुसरीकडे त्यांनी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या टेस्ला या कंपनीचे तब्बल ३.९५ अब्ज डॉलर्स किमतीचे १९.५ दशलक्ष शेअर्स विकले आहेत.
एलॉन मस्क यांनी त्यांच्या टेस्ला या कारनिर्मिती करणाऱ्या कंपनीचे तब्बल १९.५ दशलक्ष शेअर्स विकले आहेत. या शेअर्सची किंमत ३.९५ अब्ज डॉलर्स आहे. मस्क यांच्याकडे टेस्ला कंपनीचे सर्वाधिक शेअर्स आहेत. मात्र काही शेअर्स विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद भांडवली बाजारात उमटले. या निर्णयांतर मस्क यांची संपत्ती २०० अब्ज डॉलर्सच्या खाली घसरली आहे.
मालकीहक्क मिळवल्यापासून मस्क ट्विटरमध्ये जास्त व्यस्त आहेत, अशी धारणा भागधारकांची झाली आहे. याच कारणामुळे टेस्ला कंपनीचे शेअर्सही पडले आहेत. भागधारक टेस्लाचे शेअर्स विकत आहेत. टेस्लाचा शेअर मागील ५२ आठवड्यातील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. संपत्तीत घट झालेली असली तरी जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क सर्वोच्च स्थानावर आहेत.
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. धनंजय चंद्रचूड आगामी दोन वर्षे सरन्यायाधीश म्हणून न्यायदानाचे काम करतील. १० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या पदावरून निवृत्त होतील. धनंजय चंद्रचूड यांचे वडीलदेखील देशाचे सरन्यायाधीश होते. धनंजय चंद्रचूड हे दिवंगत माजी सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांचे पूत्र आहेत. वाय व्ही चंद्रचूड यांनी सात वर्षे देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायदान केलेले आहे.
देशाचे मावळते सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ संपल्यानंतर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. आज (९ ऑक्टोबर) राष्ट्रपतीभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. धनंजय चंद्रचूड यांना १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांनी याआधी अयोध्येतील बाबरी मशीद तसेच गोपनियतेचा अधिकार यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायदानाचे काम केलेले आहे.
याआधी धनंजय चंद्रचूड यांनी बॉम्बे उच्च न्यायालय तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेली आहे. तसेच अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापन केलेले आहे.
टी२० विश्वचषक २०२२ चे बाद फेरीचे सामने सुरु होत आहेत. बुधवारी पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यात तर गुरुवारी दुसरा उपांत्य सामना भारत-इंग्लंड यांच्यात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टी२० विश्वचषकाकडे आहेत, पण त्याच दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग २०२३ साठीची खलबतेही तीव्र होत आहेत.
स्पोर्ट्स स्टारच्या मते, आयपीएल २०२३ चा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. त्याच वेळी, ही ग्रँड लीग मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. जगातील अनेक देशांचे स्टार खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसत आहेत.
या आयपीएल लिलावासाठी सर्व फ्रँचायझींच्या मालकांनी रक्कम ही वाढवल्या जाऊ लागल्या आहेत. वास्तविक, सर्व संघांचे एकूण बजेट ९० कोटींवरून ९५ कोटींपर्यंत वाढू शकते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात आयपीएलसाठी मेगा लिलाव झाला होता, त्यावेळी सर्व संघांनी एकूण २०४ खेळाडूंना खरेदी केले होते.
आयपीएल २०२२ प्रमाणेच आयपीएल २०२३ मध्ये एकूण १० संघ खेळतील. आता १५ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक संघाला ते त्यांच्या संघातून कोणते खेळाडू सोडत आहेत याची माहिती द्यावी लागेल. जे खेळाडू सोडले जातील त्यांना लिलावात जाण्याची संधी मिळणार आहे.
रशियासोबत आमच्या अटींवर शांतता चर्चा होऊ शकते, अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी मांडली. आतापर्यंत व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत बोलण्यास अजिबात तयार नसलेल्या झेलेन्स्कींनी एक पाऊल मागे घेतले आहे. अर्थात त्यांच्या अटी पुतिन मान्य करणार का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक समुदायाने पुतिन यांना खऱ्याखुऱ्या शांतता चर्चेसाठी तयार करावे, असे आवाहन झेलेन्स्की यांनी केले. रशियाने हल्ला केल्यापासून ते ‘रशियाशी चर्चा केवळ अशक्य आहे,’ असेच सांगत होते. मात्र अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमुळे चित्र काहीसे बदलले आहे.
अमेरिकेचे सेनेट आणि हाऊसमध्ये रिपब्लिकन पार्टीचे प्राबल्य झाल्यास युक्रेनला आतासारखी आर्थिक आणि लष्करी मदत सुरू राहणे अवघड असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी आपली भाषा बदलली असली तरी त्यांनी घातलेल्या अटी या अत्यंत जाचक असल्यामुळे पुतिन तयार होण्याची शक्यता कमी आहे.
झेलेन्स्कींच्या अटी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये जी-२० समूहाचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही अभिमानाची आणि प्रचंड संधी उपलब्ध करून देणारी बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्या हस्ते भारताच्या अध्यक्षपदाचे चिन्ह, संकल्पना (थिम) आणि संकेतस्थळाचे अनावरण झाले.
‘स्वातंत्र्यानंतर भारताच्या विकासात सर्व सरकारे आणि नागरिकांचे आपापल्या परीने योगदान राहिले आहे. जेव्हा लोकशाही ही संस्कृती होते, तेव्हा संघर्षांला विराम देता येऊ शकतो, हे भारत जगाला दाखवून देऊ शकतो,’ असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या अध्यक्षपदाचे चिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळ यातून जगाला संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. जी-२० अध्यक्षपद भारताकडे येणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
जगातील सर्वात मोठय़ा विकसित आणि विकसनशील देशांचा जी-२० हा समूह आहे. जगाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ८५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ७५ टक्के हिस्सा या २० देशांमध्ये विभागला गेला आहे. समूहाचे अध्यक्षपद हे फिरते असते. १५ आणि १६ नोव्हेंबरला बालीमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये इंडोनेशियाकडून भारताला अध्यक्षपद बहाल केले जाईल. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३पर्यंत भारताकडे अध्यक्षपद असेल. पुढली जी-२० परिषद दिल्लीमध्ये होईल.
प्रगती आणि प्रकृती (निसर्ग) हे एकत्र नांदू शकतात. त्यातून कायमस्वरूपी विकास साधता येईल.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.