प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन झालं आहे. त्या ८० वर्षांच्या होत्या. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध कवी आणि लेखक महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
मीना देशपांडे या प्रसिद्ध लेखिका असण्यासोबतच आचर्य अत्रे यांच्या कन्या होत्या. मीना देशपांडे यांना करोनाची लागण झाली होती असं सांगण्यात येत आहे.
आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह), अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८), पपा – एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह) ,मॅरिलीन मन्रो (अनुवादित कादंबरी), मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै), ये तारुण्या ये (कथासंग्रह), हुतात्मा (कादंबरी).
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ महिला पत्रकार सागरिका घोष यांनी केली आहे.
देशातील सुमारे २७ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून बाहेर काढल्याने मनमोहन सिंग या पुरस्काराचे मानकरी असल्याचं घोष यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या आपल्या ब्लॉगमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे हा मुद्दा उपस्थित केला आहे.
घोष यांनी म्हटलं की, भारताचे १३वे राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं नुकतचं निधन झालं तेव्हा मनमोहन सिंग आपल्या माजी सहकार्याची प्रशंसा करताना थांबत नव्हते. त्यांनी मुखर्जी यांना स्वतंत्र भारतातील महान नेत्यांपैकी एक म्हटलं आहे. घोष पुढे म्हणाल्या, प्रणव मुखर्जींनी दीर्घकाळ सरकारमध्ये असणं ही एक असाधारण गोष्ट आहे. मात्र, एक प्रश्न असाही आहे की, मनमोहन सिंग हे आपल्या सहकाऱ्याच्या तुलनेत भारतरत्नसाठी अधिक योग्य आहेत?
मनमोहन सिंग सन १९९१ मध्ये जेव्हा अर्थमंत्री बनले, तेव्हा त्यांनी अनेक बदल घडवून आणले. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पाठिंब्याने त्यांनी दशकांपासून सुरु असलेल्या मजबूत नियंत्रित अर्थव्यवस्थेला मुक्त केले. २००६ ते २०१६ दरम्यान २७१ मिलियन म्हणजेच २७.१ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढले. या काळात मोठ्या कालावधीसाठी मनमोहन सिंग हेच देशाचे पंतप्रधान राहिले. भारतातील करोडो लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढल्याची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली आहे. आत्ताच्या गरिबांसाठीच्या अनेक योजना जशा वित्तीय समावेशन, मनरेगा आणि आधार कार्ड त्यांच्याच कार्यकाळातील देणं आहे, असं घोष यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी होण्यास मदत होत आहे. करोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी टेली आयसीयू संपूर्ण राज्यात सुरू करण्याचा विचार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथे टेली आयसीयूच्या ऑनलाइन लोकार्पणप्रसंगी टोपे बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त एन. रामस्वामी, आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. साधना तायडे, मेड स्केप इंडियाच्या संस्थापक आणि ‘वुई डॉक्टर कॅम्पेन’च्या डॉ. सुनीता दुबे, सीआयआय फाउंडेशनचे बी. थायगाराजन, डॉ. संदीप दिवाण, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, औरंगाबाद आणि जालन्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, आयसीयू प्रमुख यांची ऑनलाइन उपस्थिती होती.
टोपे म्हणाले, ‘मेड स्केप इंडिया’च्या मदतीने राज्यात सहा ठिकाणी टेली आयसीयू सुरू आहेत. त्याचे काम उत्कृष्ट सुरू आहे. टेली आयसीयूद्वारे करोनाच्या काळात रुग्णांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळत आहे. त्याचा अत्यवस्थ रुग्णांना लाभ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून संपूर्ण राज्यात टेली आयसीयू सुरू करण्याचा विचार आहे.
टेली आयसीयू हे नवीन तंत्रज्ञान आहे, यामुळे आणखी प्रशिक्षणाची गरज आहे. करोना रुग्णांना इतर औषधे दिली जात आहेत. टेली आयसीयूमुळे कोणत्याही प्रकारच्या रुग्णांना सर्वोत्तम डॉक्टरचा सल्ला घेता येतोय, ग्रामीण भागात याचा उपयोग झाला पाहिजे. यात आणखी काही सुधारणा अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात करोनाची साथ वेगाने पसरत असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) यंदा देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे आयोजन करणे जवळपास अशक्य आहे. इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजन करणाऱ्या ‘बीसीसीआय’ला सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत चालू हंगामातील कोणतीही स्थानिक स्पर्धा घेणे कठीण जाईल.
सर्व भागधारकांना आर्थिक लाभ देऊ शकतील, अशा काही स्थानिक स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील आहे, असे संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुलीने सर्व राज्य संघटनांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. याचप्रमाणे यंदाच्या स्थानिक क्रिकेट हंगामाला कात्री लावण्यात येईल. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या स्वरूपातही बदल केले जातील, असे संकेत दिले होते. परंतु देशातील करोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रणजी करंडक, देवधर करंडक, दुलीप करंडक, विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२०, २३ वर्षांखालील वयोगटांसाठीची सी. के. नायडू करंडक स्पर्धा अशा अनेक स्पर्धापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत ‘बीसीसीआय’ने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
‘‘करोनाच्या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत काही राज्यांमधील स्थिती वाईट आहे, तर काही राज्यांमध्ये अतिवाईट आहे. जिथे उद्याच्या स्थितीचा अंदाज मांडणे कठीण आहे, अशा परिस्थितीत तीन-चार महिन्यांच्या कालावधीच्या स्पर्धेची योजना कशी काय आखता येईल,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.