इमारत २,००० कोटींहून अधिक किमतीची
उद्धव सरकारने १४५० कोटी देऊ केले होते
२०२१ मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली
आर्थिक मंदीचा फटका बसत असल्याने खर्च कमी करण्यासाठी अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. काही कंपन्यांनी दोन वेळा कर्मचारी कपात केली आहे. Google मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करण्यात आली होती.
गुगलने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगलच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाच्या विरोधात लंडनमधील गुगलच्या कार्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांनी वॉकआउट केले. या वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल २,९०,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. संपूर्ण टेक क्षेत्रामध्येच नोकर कपातीची लाट पसरली आहे.
गुगलच्या लंडन कर्मचार्यांचे प्रतिनिधित्व करणार्या ट्रेड युनियन युनाइटने कर्मचार्यांच्या चिंतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युनाइटचे प्रादेशिक अधिकारी मॅट व्हेली म्हणाले की , Google ला याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत Google त्यांच्या कामगारांना सन्मानाने वागवत नाही तोपर्यंत ते आणि युनाइट मागे हटणार नाही.
गुगलचे यूकेमध्ये ५,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. गुगलने जानेवारीमध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. सुंदर पिचाई यांच्या घोषणेनंतर अमेरिकेत छाटणीचा टप्पा सुरू झाला. सर्च इंजिन कंपनी गुगलने केलेल्या घोषणेनंतर सुमारे ४५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि उदयोन्मुख खेळाडू मालविका बनसोड यांनी संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवत मंगळवारी कोरिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.
लक्ष्यने कोरियाच्या चोई जी हूनला १४-२१, २१-१६, २१-१८ असे पराभूत केले, तर मालविकाने चीनच्या हान युईला २०-२२, २२-२०, २१-१० असे नमवत आगेकूच केली. स्विस खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या एचएस प्रणॉयने मलेशियाच्या चीम जून वेईकडून १७-२१, १७-२१ अशी हार पत्करली.
दुहेरीच्या लढतीत कृष्ण प्रसाद गरगा आणि विष्णूवर्धन गौड या पुरुष दुहेरीच्या जोडीला इंडोनेशियाच्या प्रमुद्या कुसुमावर्दना आणि येरेमिया एरिचकडून १४-२१, १९-२१ असे पराभूत व्हावे लागले.
टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांना संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी ‘ट्विटर’ने घेतला. अमेरिकेच्या रोखे व्यवहार आयोगाला (सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशन) तशी कागदपत्रे ‘ट्विटर’द्वारे सुपूर्द करण्यात आली आहेत. मस्क हे २०२४ पर्यंत ‘ट्विटर’चे वर्ग -२ संचालक असतील. कंपनीचा मालकीहक्क बदलू नये यासाठी केलेली ही उपाययोजना दिसते. नव्या नियुक्तीनुसार मस्क ट्विटरचे १४.९ भागांपेक्षा जास्त भाग भांडवल घेऊ शकणार नाहीत.
‘ट्विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये मस्क यांच्या संचालक मंडळावरील संभाव्य नियुक्तीस दुजोरा दिला. त्यांनी नमूद केले, की मस्क यांची प्रभावी सेवा पुरवण्यावर अतीव श्रद्धा असून, त्याबाबत ते कडवे टीकाकारही आहेत. ‘ट्विटर’च्या संचालक मंडळाला ते उंची प्राप्त करून देतील.
‘ट्विटर’ने आयोगाकडे सुपूर्द केलेल्या कागदपत्रांत नमूद केले आहे, की मस्क यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करणार असून, ते वर्ग -२ संचालक म्हणून कंपनीच्या भागधारकांच्या २०२४ मध्ये होणाऱ्या वार्षिक सभेपर्यंत कार्यरत राहतील. या कार्यकाळात आणि त्यानंतरचे तीन महिने मस्क स्वत: अथवा त्यांच्या समूहाचे सदस्य म्हणून कंपनीच्या १४.९ भागांपेक्षा जास्त भागभांडवलाची मालकी घेऊ शकणार नाहीत.
‘ट्विटर’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्से यांनी मस्क यांच्या ट्विटरच्या संचालक मंडळावरील नियुक्तीचे स्वागत करून, मस्क यांना जग व त्यातील ट्विटरच्या भूमिकेविषयी विशेष काळजी आहे व तशी ते समर्थपणे घेतील, असे सांगितले. डोर्से यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये पदभार सोडला असला तरी ते मेपर्यंत ‘ट्विटर’च्या संचालकपदी असतील.
पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शासकीय वन्यजीव उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर) पुणे-बंगळूरू महामार्गावरील वराडे (ता. कराड) येथे मंजूर झाले आहे. त्यासाठी शासनाकडून उपवनसंरक्षक सातारा यांचे कार्यालयाकडे नुकताच ७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी वर्ग झाला असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मंत्री पाटील म्हणाले, की पश्चिम महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतीने सुसज्य असे वन्यजीव उपचार केंद्र मंजूर झाले आहे. याचा फायदा सातारा जिल्हयाबरोबरच कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्यजीवांवर तात्काळ उपचार करण्यासाठी होणार आहे.
सद्यस्थितीमध्ये जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. परंतु, मूलत: वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी वेगळय़ा सुविधांची आवश्यकता असते, वन्यप्राण्यांवर उपचार करताना कमीत कमी मानवी संपर्क व तातडीने उपचार करून लवकरात लवकर त्यांना मूळ अधिवासामध्ये सोडणे आवश्यक असते.
या दृष्टीने आवश्यक उपचारपद्धती जसे की रेडिओथेरपी, पोर्टेबल एक्स-रे यासारख्या अद्ययावत सुविधांनी हे उपचार केंद्र सुसज्ज असणार आहे. सदर उपचार केंद्रामध्ये मांसभक्षी प्राणी-पक्षी व प्राणी-पक्षी, तसेच जलचर प्राण्यांसाठी वेगवेगळय़ा पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात येईल. त्यांना आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक अधिवासाशी मिळते-जुळते वातावरणही येथे तयार करण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. सर्व मल्लांनी खिलाडू वृत्तीने मैदान गाजवावे असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सातारा तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मंगळवारी संध्याकाळी सुरवात करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ,सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई,यावेळी कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, सातारा तालिम संघाचे संस्थापक साहेबरावभाऊ पवार, धनाजी फडतरे, अमोल बुचडे, बलभीम शिंगरे, दीपक पवार, संदीप साळुंखे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल आदींच्या उपस्थितीत आज ६४व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगाने साताऱ्यातील शाहू स्टेडियमला वेगळी झळाळी आली आहे.आज उदघाटना दिवशी ५७,७० आणि ९२ किलो वजनी गटातील कुस्त्या करून सुरवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आज शुभारंभाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. सुधीर पवार यांनी प्रास्ताविक केले.या आखाड्यात राज्यभरातून ९०० मल्ल ११० प्रशिक्षक पंच सहभागी होणार आहेत.या स्पर्धेसाठी राज्यभरातून कुस्ती शौकिन उपस्थित राहतील असे सांगण्यात आले.
कुस्ती खेळणाऱ्यांना मदत करुन चालणार नाही तर ज्यांनी आपलं आयुष्य कुस्तीसाठी घालवल अशा सेवानिवृत्त कुस्तीगिरांना मदत शासनाने केली पाहिजे. त्यांना पद दिले गेले पाहिजे. शासनाला हा निर्णय घ्यायला लागणार आहे असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा अशी ज्येष्ठ नेते शरद पवारांची इच्छा होती आणि त्यांच्या आग्रहावरून साताऱ्याला ही स्पर्धा होत आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ४ पाकिस्तानी YouTube चॅनेलसह २२ YouTube चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.
हे चॅनल राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात खोट्या बातम्या सतत पसरवत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच मंत्रालयाने ३ ट्विटर अकाउंट, १ फेसबुक पेज आणि १ वेबसाइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. त्यात म्हटलंय की, “माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयटी नियम, २०२१ अंतर्गत २२ YouTubeवरील न्यूज चॅनेल, ३ ट्विटर अकाउंट, १ फेसबुक अकाउंट आणि १ न्यूज वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी आपत्कालीन अधिकारांचा वापर केला आहे.
या YouTube चॅनेलचे एकूण सब्स्क्रायबर्स लाखांमध्ये होते. या चॅनलवर राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था या संवेदनशील विषयांवर खोट्या बातम्या दाखवल्या.”
आयआयटी कानपूर महाविद्यालयाला तब्बल १०० कोटींची देणगी मिळाली आहे. प्रथमच एका माजी विद्यार्थ्याने एखाद्या महाविद्यालयाला एवढी मोठी आर्थिक मदत केली आहे. हा निधी स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीसाठी वापरला जाणार असून आयआयटी कानपूरमध्ये यासाठी एक इमारत तयार केली जात आहे. इतकी मोठी रक्कम देणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांचे नाव आहे राकेश गंगवाल.
आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांनी सोमवारी मुंबईत गंगवाल यांची भेट घेतली, जिथे गंगवाल यांनी त्यांच्या पूर्वीच्या महाविद्यालयासाठी १०० कोटींची देणगी जाहीर केली. आयआयटी कानपूर या प्रकल्पासाठी निधी उभारत आहे, ज्यासाठी ६०० कोटी खर्च येणार आहे. योजनेनुसार, या नवीन संस्थेमध्ये एकूण ९ प्रगत संशोधन केंद्रे बांधली जातील.
आयआयटी कानपूर या उपक्रमाद्वारे वैद्यकशास्त्राला अभियांत्रिकीसह एकत्रित करण्याचा आणि क्रॉस-डिसिप्लिनरी लर्निंगला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. शाळा आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे क्षेत्रफळ सुमारे दहा लाख चौरस फूट असेल. या प्रकल्पाचा पहिला टप्पा तीन ते पाच वर्षांत पूर्ण होईल.
पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचं न ऐकता रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची भेट घेतल्यामुळे त्यांना त्याची किंमत मोजावी लागत आहे, असा आरोप रशियाने केलाय. या भेटीसाठीच इम्रान खान यांना शिक्षा दिली जात असल्याचं रशियाने म्हटलंय.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारिया झकारोव्हा यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं, “२३-२४ फेब्रुवारीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या भेटीची घोषणा केल्यानंतर अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांनी जोरदार दबाव आणला. तसेच हा रशिया दौरा रद्द करण्याबाबत अल्टिमेटम दिला. आपल्या स्वार्थी हेतूंसाठी एका स्वायत्त देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा अमेरिकेचा निर्लज्ज प्रयत्न आहे. वरील घटनाक्रम याला दुजोरा देतो.”
विशेष म्हणजे पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी देखील यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप केलाय. आपल्या रशिया दौऱ्यामुळे परकीय शक्ती विचलित झाल्याचं ते म्हटले. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याच दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला मॉस्कोमधील क्रेमलिन येथे ब्लादिमीर पुतिन यांना भेटले होते. अशी भेट घेणारे इम्रान मागील २३ वर्षांमधील पाकिस्तानचे दुसरे पंतप्रधान ठरले. त्याआधी नवाज शरीफ यांनी एप्रिल १९९९ मध्ये रशिया दौरा केला होता.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.