महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या हंगामासाठी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरकडे मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.हरमनप्रीतने नुकतेच १५० आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने पूर्ण केले. गेल्या दशकभरात भारतीय संघाने मिळवलेल्या यशात हरमनप्रीतने महत्त्वाचे योगदान दिले आहे. अर्जुन पुरस्कारप्राप्त हरमनप्रीतच्या नावे महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक नाबाद १७१ धावांचा विक्रमही आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - 02 मार्च 2022
सौरभ चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करताना पहिल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मंगळवारी भारताचे खाते उघडले.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सौरभने १६ अचूक लक्ष्यवेध करताना प्रथम क्रमांक पटकावला, तर जर्मनीच्या मायके शिवाल्डने (६) दुसरा क्रमांक पटकावला. रशियाच्या आर्टिम शेरनॉसोव्हने कांस्यपदक पटकावले.
मात्र हे पदक युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियाच्या खात्यावर जमा होणार नाही. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या १९ वर्षीय सौरभने पात्रता फेरीत ५८४ गुण कमावले. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या आठ नेमबाजांपैकी त्याची कामगिरी तिसऱ्या क्रमांकाची ठरली.
राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सुमारे १३०० कोटींनी घट झाली आहे. ओमायक्रॉनच्या लाटेत लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
फेब्रुवारी महिन्यात राज्यात वस्तू आणि सेवा कराचे १९ हजार ४२३ कोटींचे संकलन झाले. जानेवारी महिन्यात राज्यात २० हजार ७०४ कोटींचे संकलन झाले होते. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात संकलनात १२८२ कोटींची घट आली. राष्ट्रीय पातळीवर जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत ५.६ टक्के घट झाली. महाराष्ट्रातही हा कल कायम राहिला.
फेब्रुवारीत २८ दिवस असल्याने जानेवारीच्या तुलनेत संकलन कमीच होते. पण याबरोबरच ओमायक्रॉनच्या लाटेमुळे जानेवारीअखेरीस व फेब्रुवारीत लागू करण्यात आलेले निर्बंध तसेच रात्रीची संचारबंदी याचा संकलनावर परिणाम झाल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांची तुलना केल्यास फेब्रुवारीतील संकलन घटले आहे.
ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ व सातारा येथील युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण ऊर्फ पी. एन. जोशी (वय ९०) यांचे साताऱ्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील नामवंत जाणकार म्हणून त्यांची देशभर ओळख होती. त्यांनी रिझव्र्ह बँक, सारस्वत बँक, बँक ऑफ इंडियात विविध पदांवर काम केले. सातारच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. निवृत्तीनंतर ते साताऱ्यात स्थायिक झाले होते. सातारच्या सामाजिक, सांस्कृतिक व इतर कामांत त्यांचा मोठा सहभाग होता.
बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील सरकारच्या धोरणांवर त्यांनी वेळोवेळी लोकसत्ता आणि विविध माध्यमांतून लिखाण केले. त्यांची ‘माय मेमरीज-गिलीम्सेस ऑफ चेंजिंग बँकिंग सिनॅरिओ’, ‘बँकिंग आणि वित्त धोरण – एक परामर्श’, ‘बदलत्या बँकिंगच्या छटा - माझ्या आठवणी’ (मराठी) व ‘नॅशनल बँकिंग पॉलिसी फॉर इनक्लुसिव्ह डेव्हलपमेंट’ ही पुस्तकं गाजली. खासगी बँक संघटनेचे ते पहिले अध्यक्ष होते. त्यांचे आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व अर्थशास्त्रात नियमित वाचन होते. बँकिंग साक्षरतेसाठी त्यांनी राज्यभर लोकजागृती करण्याचे मोठे काम केले.
करोनानंतर आता विविध निर्बंध दूर होत असताना पर्यटन क्षेत्रेही खुली होत असून महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला राष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी अमर्याद महाराष्ट्र (महाराष्ट्र अनलिमिटेड) ही मोहीम राबवण्यात येणार असून समुद्रकिनाऱ्यांपासून ते थंड हवेची ठिकाणे व जंगलांपर्यंत तुम्ही नाव घ्या आमच्याकडे ते आहे या संकल्पनेभोवती ही मोहीम आखण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रांची राष्ट्रीय पातळीवर चांगली प्रसिद्धी व्हावी यासाठी दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, जयपूरसारख्या शहरांतील पर्यटनावर लेखन-यूटय़ूबसह विविध समाजमाध्यमांवरून कार्यक्रम करणारे ब्लॉगलेखक-प्रवासी-खवय्ये आदींसाठी महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रांचा दौरा ९ मार्चपासून आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर देशातील विविध ९ शहरांत-राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या पर्यटनाची प्रसिद्धी करणारे रोड शो ९ मार्चपासून होणार आहेत.
त्याचबरोबर जुन्नर द्राक्ष महोत्सवसह १८ ते २० फेब्रुवारी या काळात पार पडला. त्याचधर्तीवर नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाई, पन्हाळा महोत्सव असे जवळपास २० महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. या महोत्सवांच्या माध्यमातून राज्यस्तरीय प्रसिद्धीबरोबरच स्थानिकांना रोजगार व उत्पन्न मिळण्याची सोय उपलब्ध व्हावी असा विचार आहे. तसेच ५ वाहिन्या, मुद्रित माध्यमे, १० एअर इंडियाची विमाने, ५०० टक्सी आदी विविध माध्यमांद्वारे महाराष्ट्र पर्यटनाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाने दिली.
‘‘अब्बास विधानसभेत गेल्यावर मुख्तार अन्सारी विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न करतील. मग, पिता-पुत्र दोघेही उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात दिसतील’’, असे खुरहाट गावातील एका शाळा व्यवस्थापकाचे म्हणणे होते.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाशी (एसबीएसपी) आघाडी केली आहे. माफिया व आमदार मुख्तार अन्सारी यांचे पुत्र अब्बास हे ‘एसबीएसपी’च्या चिन्हावर मऊ-शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी मुख्तार अन्सारी यांची पक्षातून हकालपट्टी केल्यावर ते ‘सप’मध्ये गेले. पण, त्यांना ‘एसबीएसपी’च्या चिन्हावर उमेदवारी दिली गेली. ऐनवेळी मुख्तार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पुत्र अब्बास यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मऊचा ‘राजकीय वारसा’ अब्बास यांच्याकडे दिला तर मुलगा राजकारणात जम बसवेल, असे मुख्तार अन्सारींना वाटते.
‘’पंचवीस वर्षे काहींनी स्वत:चा विकास करून घेतला, आम्हाला काय मिळाले? अखिलेश-राजभर यांची आघाडी झाली नसती तर अन्सारींचे वर्चस्व संपले असते’’, अशी खंत मऊमधील मध्यमवयीन विणकर इमाम उल्ल हक यांनी व्यक्त केली.
मऊ-शहर विधानसभा मतदारसंघात माफिया व आमदार मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी, भाजपचे अशोक सिंह आणि ‘बसप’चे प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांच्यामध्ये संघर्ष रंगलेला आहे. मऊ शहरात साडेचार लाख मतदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाकडून लढणाऱ्या मुख्तार अन्सारी यांना ९६ हजार, भाजप आणि ओम प्रकाश राजभर यांच्या ‘एसबीएसपी’ युतीचे उमेदवार महेंद्र राजभर यांना ८८ हजार आणि सपचे उमेदवार अल्ताफ अन्सारी यांना ७२ हजार मते मिळाली होती.
अन्सारी यांना ८ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळाला होता. पण, या वेळी ओम प्रकाश राजभर यांनी भाजपशी काडीमोड घेऊन अखिलेश यादव यांच्याशी युती केली आहे. मऊ-शहरात सुमारे ५० हजार राजभर मतदार आहेत. दीड लाख मुस्लीम मतदार असून या वेळी मुस्लीम ‘सप’कडे वळले आहेत. त्यामुळे ‘एसबीएसपी’च्या चिन्हावर उभ्या असलेल्या अब्बास अन्सारी यांचा पराभव करणे कठीण असल्याचे सांगितले जाते.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.