राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

तहकुबी ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे?

(a) सभागृहाचे नेहमीचे कामकाज बाजुला ठेवण्याची एक असामान्य पद्धत आहे.

(b) सार्वजनिक हिताच्या तातडीच्या बाबीकडे सभागृहाचे लक्ष वेधणे हा याचा प्रमुख उद्देश आहे

(c) राज्यसभा या पद्धतीचा उपयोग करू शकते.

(d) हा ठराव मांडण्यासाठी त्यास 1/10 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो.

पर्यायी उत्तरे : 

2.

राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या आयोगासंदर्भात खालील विधानांपैकी अचूक विधान/विधाने कोणती?

(a) हा आयोग 2004 मध्ये अस्तित्वात आला.

(b) अनुसूचित जमातीचे हक्क संरक्षण करण्यासाठी अनुसूचित जमातींचा स्वतंत्र राष्ट्रीय आयोग निर्माण करण्यात आला. 2003 च्या 89 व्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे विभाजन करुन ही निर्मिती करण्यात झाली.

(c) अनुसूचित जमातींसंदर्भात असलेल्या सर्व महत्वाच्या धोरणांसंदर्भात निर्णय घेतांना केंद्र व राज्य शासनांना आयोगाचा सल्ला आवश्यक असतो.

पर्यायी उत्तरे : 

3.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

(a) लोकसेवा आयोग या सल्लागार संस्था आहेत. त्यांच्या शिफारशी स्विकारावयाच्या की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हे सरकारसाठी खुले असते.

(b) एखाद्या विशिष्ट प्रकरणात आयोगाची शिफारस का नाकारण्यात आली हे सरकारला स्पष्ट करणे बंधनकारक आहे.

पर्यायी उत्तरे :

4.

लोकसभेच्या सभापती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?

(a) तो/ती राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो/राहते.

(b) तो/ती आपला राजीनामा उपसभापतीस सादर करतो/करते.

(c) तो/ती कामकाज सल्लागार समिती आणि नियम समितीच्या प्रमुखाची नियुक्ती करतो/करते

(d) तो/ती निवडीच्या वेळी सभागृहाचा सदस्य नसला तरी चालतो परंतू निवडीनंतर सहा महिन्याच्या कालावधीत त्याने/तिने सभागृहाचे सदस्य बनले पाहिजे.

पर्यायी उत्तरे :

5.

चुकीचे विधान/निवडा :  

(a) 1947 मध्ये सिक्कीम हे भारताचे ‘संरक्षित क्षेत्र' बनले.

(b) 1974 मध्ये सिक्कीमला भारतीय संघातील 'सहयोगी राज्य' हा दर्जा देण्यात आला.

(c) सिक्कीमला भारतीय संघातील पूर्ण घटक राज्याचा दर्जा देण्यासाठी 36 वी घटना दुरुस्ती अधिनियम मंजूर करण्यात आला.

पर्यायी उत्तरे :

6.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

7.

राष्ट्रीय संविधान कार्य पुनर्विलोकन आयोगाची (NCRWC) स्थापना न्यायमूर्ती एम एन व्यंकटचलैया यांच्या अध्यक्षतेखाली ____________ यांच्या शासन काळात झाली होती.

8.

खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली ?

9.

विधान (A) :

राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला (म्हणजेच केंद्र शासनास) साध्या पद्धतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत.

कारण (R) :

भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती.

पर्यायी उत्तरे : 

10.

भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येवू शकते, त्यासाठी घटना दुरुस्ती द्वारे मंजूर होणे आवश्यक असते.

11.

जनहितार्थ याचिकेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या :

(a) राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 मध्ये जनतेला न्याय-संस्थेशी प्रत्यक्ष जोडण्याचे साधन समाविष्ट आहे.

(b) जनहितार्थ याचिकेमध्ये दावा दाखल करण्याचा अधिकार हा जनतेला न्यायिक सक्रियतेद्वारा दिला गेला.

(c) जनहितार्थ याचिका सर्वप्रथम दाखल करून घेणारे न्यायमूर्ती पी. एन. भगवती आणि व्ही. आर. कृष्णा अय्यर हे होत.

(d) कल्याणेश्वरी वि. भारत सरकार खटल्यात न्यायालयाने जनहितार्थ याचिकांचा व्यावसायिक वादामध्ये गैर वापर होत असल्याचे उद्धधृत केले होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

12.

अनुच्छेद - 21 च्या विस्ताराचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य हे आहे की अनु. 21 वरील न्यायिक सक्रीयतेच्या या जादूच्या छडीने घटनेच्या भाग IV मध्ये समाविष्ट असलेल्या गैरन्यायिक मार्गदर्शक तत्वांपैकी अनेकांना आता मूलभूत अधिकाराच्या स्वरूपात लागू करण्यायोग्य पुर्जिवीत केले आहे. या संदर्भातील खटले आणि त्यात दिलेल्या निवाड्या बाबत जोड्या लावा : 

13.

एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधात खालील विधाने विचारात घ्या :

(a) न्यायालयाने सांगितले की, राष्ट्रपतीने संसदेने मान्यता दिल्यानंतरच राज्य विधानसभा विसर्जित करावी.

(b) जर संसदेने घोषणेला मान्यता दिली नाही तर विधानसभा पुनर्जीवित करण्यात यावी.

(c) राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या समर्थनार्थ योग्य ती सुसंबद्ध कारणे आहेत, ती सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्राचा आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?

14.

विधान (A) :
ज्यघटनेच्या अनुच्छेद 76 मध्ये भारताच्या महालेखापरिक्षकाच्या नेमणूकी बाबत आणि सेवाशर्ती बाबत तरतूदी आहेत.

कारण (R):

त्याला घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही. 

पर्यायी उत्तरे :

15.

यादी -1 व यादी - II यांची खाली दिलेल्या संकेतांआधारे जोड़ी जुळवून योग्य उत्तराचा पर्याय निवडा.

16.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही.

(b) सर्वोच्च न्यायालयाने बेरूबारी खटल्यात (1960) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले.

(c) केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले.

(d) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (1995) सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

17.

यादी -1 व यादी - II यांची खाली दिलेल्या संकेतानुसार बिनचुक जोडी जुळवा : 

18.

विधान (A) : 

राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे.
कारण (R): 

जर घटना दुरुस्तीची प्रक्रिया ताठर असेल तरच राज्य घटनेने केलेले सत्ता विभाजन आणि राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व राखले जाईल. 

पर्यायी उत्तरे :

19.

राज्याची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट आहेत ?

20.

खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोचा वापर केला आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.