राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

घटनेच्या 19(1)(अ) व्या कलमामधे मान्य केलेल्या नागरिकांच्या अधिकारावर खालील

कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात :

अ. देशाचे सार्वभौमत्व

ब. देशाची एकता 

क. प्रांताची सुरक्षितता

ड. सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी

योग्य पर्याय निवडा :

2.

खालीलपैकी कोणते विषय घटनेच्या समवर्ती सूचीत अंतर्भूत आहेत ?

अ. शिक्षण

ब, व्यवसाय कर

क. वजन माप मानके (प्रमाण)

ड. वीज

इ. वने

योग्य पर्याय निवडा :

प्रश्न क्र. 3 ते 7 मधे दोन वाक्ये दिली आहेत. त्यापैकी पहिले प्रतिपादन (A) म्हटले आहे आणि दुसरे कारण (R) म्हटले आहे. दोन्ही वाक्यांचे परीक्षण करा आणि खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा.

(1) दोन्ही, A आणि R बरोबर आहेत आणि R हे A चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

(2) A आणि R बरोबर आहेत, परंतू R हे A चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

(3) A बरोबर आहे, R बरोबर नाही.

(4) A बरोबर नाही, R बरोबर आहे.
 

3.

प्रतिपादन (A) : नियोजन आयोग ही घटनात्मक संस्था नाही आणि वैधानिक संस्थाही नाही.

कारण (R) : केंद्रीय कॅबिनेट च्या कार्यकारी ठरावानुसार नियोजन आयोगाची स्थापना झाली आहे. 

4.

प्रतिपादन (A) : केशवानंद भारती वि. केरळ राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे जाहीर केले की घटनेच्या मूलभूत संरचनेत दुरुस्ती करता येणार नाही.

कारण (R) : सर्वोच्च न्यायालयाने, संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयीन पुनर्विलोकन यामधे संतुलन
आणले.

5.

प्रतिपादन (A) : मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही.

कारण (R) : देशाच्या शासनकारभारात मार्गदर्शक तत्त्वे ही मूलभूत आहेत. 

6.

प्रतिपादन (A) : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये हेबियस कॉर्पस रिट (प्राधिलेख) निर्गमित करू शकतात.

कारण (R) : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये दोन्हींना रिट निर्गमित करण्याचा समान अधिकार

7.

प्रतिपादन (A) : अर्थ विधेयक हे प्रथम लोकसभेत मांडले जाते. 

कारण (R) : लोकसभेच्या सभापतींना, एखादे विधेयक हे अर्थ विधेयक आहे की नाही, हे ठरविण्याचा अंतिम अधिकार आहे. 

8.

राज्य विधानमंडळाने मान्य केलेले सर्वसाधारण विधेयक जेव्हा राज्यपालांकडे पाठवले जाते, तेव्हा त्यांच्यापुढे खालील पर्याय असतात :

अ. ते विधेयकाला अनुमती देऊ शकतात.

ब. ते विधेयकाला अनुमती नाकारू शकतात.

क. राष्ट्रपतींच्या अनुमतीकरता विधेयक आरक्षित ठेऊ शकतात.

ड. राज्य विधानमंडळाकडे पुनर्विलोकनाकरिता विधेयक पाठवू शकतात.

इ. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे त्यांच्या सल्ल्याकरिता विधेयक पाठवू शकतात.

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा : 

9.

घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदी प्रमाणे, राज्या-राज्यांमधे लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षा नंतर होऊ शकते ?

10.

केंद्र सरकारच्या राज्यांना निर्देश देण्याच्या अधिकारात ___________ गोष्टींचा समावेश होतो.

अ. लष्करी दृष्टया महत्त्वाच्या दळणवळणाच्या साधनांचे बांधकाम आणि दुरुस्ती

ब. राज्यातील काही लोक वापरत असलेल्या भाषेला मान्यता 

क. राज्यामधील रेल्वेमार्गाचे संरक्षण

ड. मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी

इ. राज्य सूचीतील विषयांवर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

11.

खालीलपैकी कोणत्या बाबी राज्याच्या महसुलाचा भाग नाहीत ? 

अ. जमीन महसूल

ब. मालमत्ता कर 

क. आय कर

ड. मनोरंजन कर 

इ. संपत्ती कर

12.

भारतात न्यायालयीन पुनर्विलोकनात खालील बाबींचा समावेश होतो :

अ. एखादा कायदा सनदशीर आहे, असे जाहीर करणे. 

ब. एखादा कायदा बेसनदशीर आहे, असे जाहीर करणे. 

क. पुनर्विलोकन आयोगाची स्थापना करणे. 

ड. घटनेच्या तरतुदींचा अर्थ लावणे.

इ. न्यायनिर्णयाचे पुनर्विलोकन करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

13.

खालीलपैकी कोणत्या राज्यांमधे विधान परिषद अस्तित्त्वात नाही ? 

अ. पश्चिम बंगाल

ब. गुजरात

क. बिहार

ड. मध्य प्रदेश

इ. कर्नाटक

14.

कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे ?

15.

उच्च न्यायालयाच्या त्याखालच्या न्यायालयांवरील प्रशासकीय नियंत्रणात पुढील बाबींचा समावेश होतो. 

अ. नेमणुका 

ब. निवृत्तीवेतन 

क. बदल्या

ड. पगार 

इ. सक्तीची निवृत्ती

योग्य पर्याय निवडा : 

16.

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ___________ आहे.

अ. राज्यघटनेचे हृदय

ब. राज्यघटनेचा आत्मा 

क. राज्यघटनेचे डोके

ड. यापैकी नाही

योग्य पर्याय निवडा :

17.

‘मार्गदर्शक तत्त्वे कोच्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे.' असे कोणी म्हटले आहे ?

18.

भारतीय राज्य घटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ? 

अ. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायदयाचा आदर करणे.

ब. स्त्रीयांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे.

क. सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.

ड. आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.

योग्य पर्याय निवडा :

19.

भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ? 

20.

भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.