ASO 2016 - Main Paper 2 Questions And Answers:
वस्तु व सेवा कर (GST) विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. ते 122 वे घटनादुरुस्ती विधेयक होते.
ब. ते 101 वे घटनादुरुस्ती अधिनियम 2016 आहे.
क. जी.एस.टी. विधेयकाला मान्यता देणारे आसाम हे पहिले राज्य होते.
ड. जी.एस.टी. विधेयकाला मान्यता देणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी-रहित (Non-NDA) बिहार हे पहिले राज्य होते.
महाराष्ट्राच्या 'व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. सदरहू योजना ही खाजगी कंपन्यांच्या सहाय्याने खेडयांच्या सर्वांगीण विकास करण्याबाबत आहे.
ब. पहिला टप्प्यात 1000 गांवे ही मॉडेल व्हिलेज' करण्यासाठी निवडण्यात येतील.
क. त्यापैकी 50% गांवे ही सहभागी कॉर्पोरेट कंपन्या निवडणार आहेत.
ड. उर्वरीत 50% गांवे ही आदिवासी असतील.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या हरित रेल्वे कॉरिडॉर' चे उद्घाटन केले आहे ?
खालीलपैकी कोणत्या उद्यान/प्रकल्पाने '2016 चे भारत जैवविविधता पारितोषिक' (India Biodiversity Award) मिळविलेले आहे ?
जगातील सर्वाधिक उंच व लांब असा काचेचा पुल नुकताच चीनमध्ये प्रेक्षकांसाठी उघडण्यात आला जो
अ. 430 मीटर लांब
ब. 10 मीटर रुंद
क. 300 मीटर जमिनीपासून उंच
ड. दररोज जास्तीत जास्त 8000 प्रेक्षकांना तो पार करण्यासाठी परवानगी
खालील विधाने विचारात घ्या :
अ. न्यायमूर्ति मंजूळा चेल्लूर यांची नुकतीच बॉम्बे (मुंबई) उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ति म्हणून नियुक्ती झाली आहे.
ब. न्यायमूर्ति चेल्लूर या बॉम्बे (मुंबई) उच्च न्यायालयाच्या दुस-या महिला मुख्य न्यायमूर्ति ठरतील.
क. न्यायमूर्ति चेल्लूर या मद्रास (चेन्नई) उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ति होत्या.
ड. न्यायमूर्ति चेल्लूर या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ति होत्या.
खालीलपैकी कोणत्या भारतीयाच्या जन्मशताब्दी स्मरणार्थ संयुक्त राष्ट्राने तिकीट काढले आहे ?
कोणत्या मिसाइल निर्देशित विध्वंसक युद्धनौकेचे मुंबईमधे 17 सेप्टेंबर, 2016 ला जलावतरण करण्यात आले ?
एस.बी.आय. म्युच्युअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ति करण्यात आली आहे ?
योग्य कथने ओळखा :
अ. जनगणना 2011 नुसार, महाराष्ट्रामध्ये साक्षरता दर 8291% आहे.
ब. जनगणना 2011 नुसार, महाराष्ट्रामध्ये जनसंख्येची घनता 365 प्रति चौ. किमी. आहे.
क. जनगणना 2011 नुसार, केरळमध्ये साक्षरता दर 93-91% आहे.
सात मुली वर्तुळाकारात केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. तानी, वाणी, रइसा, कॅटी, जया, पन्ना आणि साथी आझी त्यांची नावे असून ही यादी त्यांच्या बैठकीच्या क्रमानुसार आहे, असे नाही. तानी आणि जया वगळता कोणीतरी साथी व कॅटीच्या दरम्यान बसली आहे. पन्ना ही वाणीच्या डावीकडून दुसरी आहे आणि रइसा पन्नाच्या उजवीकडून पाचवी आहे. जया, पन्ना किंवा वाणी बरोबर जोडी करू शकते. जर जया व रइसा यांनी जागांची अदलाबदल केली तर पुढे दिलेल्या कोणत्या दोन मुली एकत्र काम करण्यासाठी जोडी करू शकणार नाहीत ?
एका स्त्रीचा परिचय करून देताना व्यक्ती म्हणते, ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या आईच्या नव-याची बहीण माझी आत्या आहे. मला भाऊ वा बहीण नाही. जर ही व्यक्ती पुरुष असेल तर
या स्त्रीशी त्याचे नाते काय आहे ?
“निनाच्या आजोबांचा मुलगा हा निनाच्या भाच्याचा आजोबा असू शकतो” या विधानासंबंधात जर फक्त थेट नातेसंबंधाचाच विचार केला, तर योग्य निष्कर्ष निवडा.
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
दिलेल्या आकृतीतील संख्या विशिष्ट सुत्रानुसार आहेत.
तान्याच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ?
मणीने त्याचा मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी स्वत:च्या घरापासून आग्नेय दिशेला 3 किमी गाडी चालवली. तेथून 5 किमी नैऋत्य दिशेने गाडी चालवून ते दोघे हेमूला त्याच्या घरी भेटले. तेथून ते तिघे मित्र 11 किमी ईशान्येला, 3 किमी वायव्येला आणि शेवटी 11 किमी नैऋत्येला गेले आणि तेथे ते थांबले. स्वत:च्या घराच्या सर्वात जवळ कोण आहे ?
कुटुंबात M, N, 0, P, Q आणि R हे सहा सदस्य आहेत. 0 हा N चा मुलगा आहे, परंतु N ही व्यक्ती 0 ची आई नाही. N व P हे विवाहित जोडपे आहे. R हा N चा भाऊ आहे आणि ९ ही P ची बहीण आहे. जर उरलेले सर्व सदस्य विवाहित जोडप्याची मुले असतील, तर P च्या अपत्यांची संख्या सांगणारा पर्याय निवडा.
शिबिरार्थीनी एका क्षेत्रात A, B, C, D, E, F, G, H वे I हे 9 तंबू उभारले आहेत. G हा H च्या पश्चिमेला 1 किमी आहे तर D हा G च्या पूर्वेला 3 किमी अंतरावर आहे आणि F हा G च्या उत्तरेला 2 किमी अंतरावर आहे. I हा B व C यांच्या मधोमध आहे, तर E नेमका हा H व D यांच्या मधोमध आहे. C हा B च्या पूर्वेला 2 किमी अंतरावर आहे. A हा B च्या उत्तरेला 1 किमी अंतरावर आहे आणि H हा A च्या दक्षिणेला 2 किमी अंतरावर आहे Gच्या संदर्भात I जवळपास ज्या दिशेला आहे, ती दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
20 माणसांसाठी भाताचे 20 वाडगे उपलब्ध आहेत. प्रत्येक माणसाने तीन वाडम्यांपेक्षा कमी वा जास्त वाडगे भात खायचा नाही, असे ठरवले. सर्व स्त्रियांनी ठरवले की त्यांच्यापैकी प्रत्येकीने अर्ध्यापेक्षा जास्त किंवा कमी वाडगा भात खायचा नाही. मुलांना दोनपेक्षा कमी किंवा जास्त वाडगा भात खायचा नाही. अशी मुभा दिली. तर अनुक्रमे पुरुष, स्त्रिया व मुले असे एकूण 20 व्यक्ती असलेली असा गट निवडा, की जो भाताचे सर्व वाडगे संपवेल.
मनू, मानी, मंजू व माली यांनी अर्थविज्ञान व इतिहास चाचण्या दिल्या. पुढे दिलेली तथ्ये वापरून इतिहासात
सर्वात कमी गुण मिळवणारी व्यक्ती निवडा. तथ्ये :
- मनू एकटीच अर्थविज्ञानात अनुत्तीर्ण असून तिने इतिहासात सर्वाधिक गुण मिळवून त्याची कसर भरून
काढली आहे.
- मानीने अर्थविज्ञानात मंजूवर मात केली आहे तर मंजू इतिहासात मानीपेक्षा उत्तम ठरली आहे.
- मालीने तिची अर्थविज्ञानातील कामगिरी सुधारून त्यात ती इतिहासापेक्षा एक क्रम वर आली आहे व मंजूला लागून वर आहे.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.