PSI Main 2013 - Paper 1

PSI Main 2013 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

योग्य पर्याय निवडा.   

(अ) अभिधा, लक्षणा व व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत. 

(ब) यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रगट होतात. 

42.

'तट्टीका' या संधीचा विग्रह करा.

43.

पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा.

44.

शब्दाच्या आधी काही अक्षरे जोडली जातात. व्याकरणाच्या भाषेत  __________ त्यांना असे नाव आहे.

रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा :

45.

“पानपतवर सव्वा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?

46.

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. दिपकला जांभळाची खूप झाडे दिसली'

47.

‘साप' हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ? 

48.

खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. 

“थोरांकडून सत्य बोलले जाते 

49.

स्वातंत्र्य युद्धाच्या काळात देशभक्तांनी भोगलेला तुरंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

50.

जिच्या गळ्यात गंधार आहे असं दीनानाथ म्हणायचे, तीच ही स्वरसम्राज्ञी लता या वाक्यातील गौण वाक्य कोणते  ते शोधून काढा :

51.

'र' या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पध्दती आहेत ?

52.

'तोंडी लावणे' हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

53.

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

त्याने आता घरी जावे.'

54.

पुढीलपैकी पूर्वरूप संधी' चे योग्य उदाहरण कोणते ? 

55.

‘अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही' या वाक्यातील उद्देश्य कोणते ? 

पुढील उतारा वाचून त्यावर आधारित 56 ते 60 प्रश्नांची उत्तरे द्या.

         समर्पित जीवन हा यशवंतरावांचा आदर्श होता. कारण -
        "जीवन पराकोटीचे समर्पित असेल, तर ते जीर्ण होत नाही. चंद्र कधी जुना होत नाही, सूर्याला म्हातारपण येत नाही, दर्या कधी संकोचत नाही. यांतील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचे समर्पण आहे. पण अनंतयुगे लोटली, तरी विनाश त्यांच्याजवळ पोहोचलेला नाही. काळाने त्यांना घेरलेले नाही. त्यांचा कधी कायापालट नाही. स्थित्यंतर नाही. ते निष्वसन अखंड आहे.

            ” हे जग कलात्मक आनंदाकरताच निर्माण करण्यात आलेली शक्ती आहे. या कलेत स्फूर्ती आहे, माणुसकी आहे. केवळ वैज्ञानिक हिशोब म्हणजे जग नव्हे. कला आणि पावित्र्य यांचा हा सुरेख संगम आहे.” अशी कलासक्त धारणा मनात बाळगून जगणारे यशवंतराव सतत मीपण विसरून स्वर्गीय आनंद देणा-या प्रसंगांच्या अखंड शोधात असायचे. असा क्षण मिळणे हाच त्यांना विरंगुळा वाटायचा. असे क्षण जेवढे जास्त मिळतील, तेवढे जीवन सुखी अशी त्यांची धारणा होती. सुखाच्या या क्षणांचे वर्णन ते करतात :

            “जीवनात सुखाचे क्षण येतात, ते सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखे सोनेरी व सतेज असतात. ते क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात. परंतु ज्या वेळी हे किरण कोवळे दिसतात, त्या वेळी त्यांचे ते तेज, ते रम्य स्वरूप पाहुन मनाला आल्हाद वाटतो, गंमत वाटते. नदीच्या खोल डोहात दगड टाकला, की पाण्यावर तरंग उठतात, एकातून एक अशी वर्तुळे उठतात आणि पाहणा-याला मोठी मजा वाटते. जंगलातल्या वाटेने जात असताना उन्हाच्या वेळी एखादा झरा दिसला, की त्याचे पाणी पिताना केवढा आनंद होतो... ओढ्याच्या काठी भरगच्च जांभळांनी भरलेल्या झाडाची चार जांभळे तोंडात टाकली की, ती किती गोड लागतात... जीवनामधील आनंदाचे क्षण हे असे असतात.”

56.

यशवंतराव चव्हाणांच्या मते समर्पित जीवन हे -

57.

सुखी जीवन म्हणजे -

58.

योग्य विधान निवडा. 

59.

या उता-यावरून यशवंतराव हे -

60.

प्रस्तुत उता-यास योग्य शीर्षक द्या. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2013 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.